शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

सांगलीतील पूरग्रस्तांना सहकार विभागाकडून मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 14:15 IST

राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देराज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले.शासन आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुर्तता होत आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस, सुखवाडी व विठ्ठलवाडी या तीन गावांना महापुराचा अधिक फटका बसला,

जळगाव - राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने त्यांची तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या निवाऱ्यांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. शासन आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुर्तता होत आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातील सहकार विभागाकडून या आसमानी संकटाचा सामना करण्यासाठी आपला सुध्दा किमान खारीचा वाटा असावा. यासाठी सांगली जिल्ह्यातील पलूस, सुखवाडी व विठ्ठलवाडी या तीन गावांना महापुराचा अधिक फटका बसला आहे. तेथील कुटुंबे अधिक बाधीत झालेली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आधार व्हावा, म्हणून त्या गावांतील 371 कुटुंबांना किमान एक महिना पुरेल एवढे किराणा सामान व सोबतच 21 जीवनावश्यक वस्तुंचे एक किट याप्रमाणे 371 किट तयार करून आज 15 ऑगस्ट, 2019 रोजी एका विशेष ट्रकद्वारे रवाना केले. या वाहनाला जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था मेधराज राठोड व जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. 

याप्रसंगी जिल्हा उप निबंधक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मदत कार्यात  सहकार विभागाचे एम. आर. शहा, अरूण खैरे, भाऊसाहेब महाले, एम.बी.गाढे, वाहेद तडवी, धिरज पाटील, शशीकांत साळवे, महेंद्र देवरे, भालचंद्र देशपांडे आदि अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावSangli Floodसांगली पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस