शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सांगलीतील पूरग्रस्तांना सहकार विभागाकडून मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 14:15 IST

राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देराज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले.शासन आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुर्तता होत आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस, सुखवाडी व विठ्ठलवाडी या तीन गावांना महापुराचा अधिक फटका बसला,

जळगाव - राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने त्यांची तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या निवाऱ्यांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. शासन आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुर्तता होत आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातील सहकार विभागाकडून या आसमानी संकटाचा सामना करण्यासाठी आपला सुध्दा किमान खारीचा वाटा असावा. यासाठी सांगली जिल्ह्यातील पलूस, सुखवाडी व विठ्ठलवाडी या तीन गावांना महापुराचा अधिक फटका बसला आहे. तेथील कुटुंबे अधिक बाधीत झालेली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आधार व्हावा, म्हणून त्या गावांतील 371 कुटुंबांना किमान एक महिना पुरेल एवढे किराणा सामान व सोबतच 21 जीवनावश्यक वस्तुंचे एक किट याप्रमाणे 371 किट तयार करून आज 15 ऑगस्ट, 2019 रोजी एका विशेष ट्रकद्वारे रवाना केले. या वाहनाला जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था मेधराज राठोड व जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. 

याप्रसंगी जिल्हा उप निबंधक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मदत कार्यात  सहकार विभागाचे एम. आर. शहा, अरूण खैरे, भाऊसाहेब महाले, एम.बी.गाढे, वाहेद तडवी, धिरज पाटील, शशीकांत साळवे, महेंद्र देवरे, भालचंद्र देशपांडे आदि अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावSangli Floodसांगली पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस