शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता नागरिकांनी स्वतः कुटुंबाची खबरदारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST

फोटो.... चर्चेतील व्यक्तींशी थेट संवाद लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे‌. त्यामुळे ...

फोटो....

चर्चेतील व्यक्तींशी थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे‌. त्यामुळे त्याचे गांभीर्य, दु:ख किती व काय आहे, हे तेच कुटुंब सांगू शकते. प्रशासन एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच मदत करणार आहे, त्यामुळे नागरिकांनीच स्वत: व कुटुंबाची खबरदारी घ्यावी व मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केलेले आहे.

प्रश्न : पोलीस दलात कोरोनाची काय स्थिती आहे?

डॉ. मुंढे : दुसऱ्या लाटेत १९ अधिकारी व १८४ अंमलदार यांना कोरोनाची लागण झाली तर एकाचा मृत्यू झालेला आहे. यापैकी फक्त चार जण सध्या उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व जण कोरोनामुक्त होऊन घरी परत गेले असून कर्तव्यावर हजर झालेले आहेत.

प्रश्न : पोलीस दलात लसीकरणाचे प्रमाण कसे आहे व त्याचा काय परिणाम झाला?

डॉ. मुंढे : एकूण ३२२३ पैकी तीन हजारांच्या वर अंमलदारांनी पहिला डोस घेतला आहे. त्याशिवाय १९६ पैकी १८३ अधिकाऱ्यांनीही पहिला डोस घेतलेला आहे. जवळपास ९५ टक्के लसीकरण पहिल्या टप्प्यात झालेले आहे. दुसरा डोसही ७० टक्के जणांनी घेतलेला आहे. गरोदर महिला व इतर अडचणी असलेले कर्मचारी फक्त राहिलेले आहेत. या लसीकरणाचा फायदा असा झाला की, कुटुंबात कोरोनाबाधित व्यक्ती असतानाही अंमलदाराला त्याची लागण झालेली नाही. जे बाधित झाले, त्यापैकी यावेळी एकालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही, हे लसीकरणाचे फायदे आहेत.

प्रश्न : रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये तणावाच्या घटना वाढलेल्या आहेत?

डॉ. मुंढे : हो हे खरं आहे. गेल्या आठवड्यातच शहरात अशा काही घटना घडल्या. एखाद्या रुग्णाचा मृत्यू व वाद होऊ शकतो याचा अंदाज हॉस्पिटल प्रशासनाला आलेला असतो. त्यामुळे संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आधीच पोलिसांना कळविणे अपेक्षित आहे. याबाबत आपण या संघटनेला पत्र देणार आहोत. जेणेकरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. रुग्णाच्या नातेवाइकांचे देखील योग्य वेळी समुपदेशन करणे शक्य होईल.

प्रश्न : कोरोना, लसीकरण बंदोबस्त व तपास यामुळे होणारी कसरत याबाबत काय सांगाल?

डॉ. मुंढे : संचारबंदी व जमावबंदी यामुळे सकाळ, संध्याकाळ पोलीस बंदोबस्ताचे फिक्‍स पॉइंट लावण्यात आलेले आहेत. त्याशिवाय लसीकरण केंद्रावर होणारा गोंधळ लक्षात घेता, तेथेही पोलिसांना पाचारण केले जात आहे. त्यामुळे पोलिसांची प्रचंड कसरत होत आहे. गुन्ह्यांचा तपास व गुन्हे घडू नये यासाठी नेहमी गस्त करावीच लागत आहे, त्यातून सुटका नाहीच. परिस्थितीच अशी ओढवली आहे की त्या ठिकाणी पोलिसांना अहोरात्र काम करावे लागत आहे.

कोट...

सध्या कोरोना हे एकमेव संकट आपणा सर्वांवर उभे ठाकले आहे. त्यामुळे त्याच्याशी सामना करताना प्रत्येक नागरिकाने स्वतः व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे अपेक्षित आहे. शेवटी प्रशासन नियम तयार करते. त्याची अंमलबजावणी केली जाते. मात्र त्यालाही विशिष्ट मर्यादा आहेत. त्याही पुढे जाऊन आपले कुटुंब महत्त्वाचे हेच प्रत्येकाने लक्षात घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक