शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

बाल साहित्य हे आयुष्य घडविण्याचे ‘साधन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:45 IST

जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले ...

जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले एकाकी होत आहेत. पुढे चालून या बालकांचा यंत्र होऊ द्यायचा नसेल तर त्यांच्या हातात चांगली पुस्तके वाचायला द्या. ही बाल साहित्यांची पुस्तके क्रिया नसून, तर आयुष्य घडविण्याचे खरे साधन आहे. असे मत नामवंत लेखक डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांनी रविवारी मांडले.सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावतर्फे रविवारी भास्कर मार्केट जवळील अखिल भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात एक दिवसीय सुर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सावंत हे बोलत होते.तत्पूर्वी सकाळी संमेलनाचे उद्घाटन जळगावातील बाल साहित्यिक गिरीश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर कवयित्री माया धुप्पड , संघपती दलुभाऊ जैन, उज्ज्वला टाटीया, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन उपस्थित होते. दरम्यान,यावेळी संमेलनस्थळाला कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह, व्यासपीठाला साने गुरुजी व्यासपीठ तर प्रवेशद्वाराला बालकवी नगर,धो. वे. जोगी प्रवेशद्वार असे देण्यात आले होते.यापुढे डॉ. सुरेश सावंत यांनी सांगितले की, कोवळ््या मुलांना संस्कारित करण्यासाठी आतापासूनच संस्कार रुजविणे गरजेचे आहे. ‘शब्द’ लिहायला किंवा वाचायला शिकविणारे शिक्षक आपल्याला खूप सापडतील. पण शब्द जगायला शिकविणारे शिक्षक सापडणे, दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत बाल साहित्यातील ‘शब्दच’ मदतीला धावून येत असल्याचे सांगितले. यावेळी बाल साहित्यिक योगेश पाटील यांनी, सामाजिक विकृतींना आळा घालण्यासाठी साहित्यनिर्मिती करणे, ही आपली जबाबदारी असून, लेखणी नावाचे शस्त्र आपल्याकडे आहे. कारण लेखनीने मने जिंकता येतात, युद्धे नाहीत आणि युद्धाने जग जिंकता येते, माणसे नाहीत. असे सांगत बदलत्या काळानुसार साहित्य प्रवाह कायम टिकून रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात कथाकथन झाले. यामध्ये सुभाषचंद्र वैष्णव (ह.मु. गोवा) व एकनाथ आव्हाड (मुंबई)यांनी सहभाग घेतला. तिसºया सत्रात शब्द झंकार या कविसंमेलनात डॉ. अशोक कोळी यांच्यासह विविध कविंनी कविता सादर केल्या.मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरणसंमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत यांच्याहस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सूर्योदय बालमित्र पुरस्कार सुभाषचंद्र वैष्णव व एकनाथ आव्हाड यांना देण्यात आला. तर सुर्योदय बालनाट्य पुरस्कार मुंबई येथील ज्योती कपिले यांच्या ‘कोडी झाली नाटुकली’ या बालनाट्य लेखास देण्यात आला. तसेच सुर्योदय बालकाव्य पुरस्कार औरंगाबाद येथील गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बालकाव्य संग्रहास देण्यात आला. सूत्रसंचालन वैदेही नाखरे तर आभार सतिश जैन यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव