शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

बाल साहित्य हे आयुष्य घडविण्याचे ‘साधन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:45 IST

जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले ...

जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले एकाकी होत आहेत. पुढे चालून या बालकांचा यंत्र होऊ द्यायचा नसेल तर त्यांच्या हातात चांगली पुस्तके वाचायला द्या. ही बाल साहित्यांची पुस्तके क्रिया नसून, तर आयुष्य घडविण्याचे खरे साधन आहे. असे मत नामवंत लेखक डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांनी रविवारी मांडले.सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावतर्फे रविवारी भास्कर मार्केट जवळील अखिल भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात एक दिवसीय सुर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सावंत हे बोलत होते.तत्पूर्वी सकाळी संमेलनाचे उद्घाटन जळगावातील बाल साहित्यिक गिरीश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर कवयित्री माया धुप्पड , संघपती दलुभाऊ जैन, उज्ज्वला टाटीया, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन उपस्थित होते. दरम्यान,यावेळी संमेलनस्थळाला कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह, व्यासपीठाला साने गुरुजी व्यासपीठ तर प्रवेशद्वाराला बालकवी नगर,धो. वे. जोगी प्रवेशद्वार असे देण्यात आले होते.यापुढे डॉ. सुरेश सावंत यांनी सांगितले की, कोवळ््या मुलांना संस्कारित करण्यासाठी आतापासूनच संस्कार रुजविणे गरजेचे आहे. ‘शब्द’ लिहायला किंवा वाचायला शिकविणारे शिक्षक आपल्याला खूप सापडतील. पण शब्द जगायला शिकविणारे शिक्षक सापडणे, दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत बाल साहित्यातील ‘शब्दच’ मदतीला धावून येत असल्याचे सांगितले. यावेळी बाल साहित्यिक योगेश पाटील यांनी, सामाजिक विकृतींना आळा घालण्यासाठी साहित्यनिर्मिती करणे, ही आपली जबाबदारी असून, लेखणी नावाचे शस्त्र आपल्याकडे आहे. कारण लेखनीने मने जिंकता येतात, युद्धे नाहीत आणि युद्धाने जग जिंकता येते, माणसे नाहीत. असे सांगत बदलत्या काळानुसार साहित्य प्रवाह कायम टिकून रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात कथाकथन झाले. यामध्ये सुभाषचंद्र वैष्णव (ह.मु. गोवा) व एकनाथ आव्हाड (मुंबई)यांनी सहभाग घेतला. तिसºया सत्रात शब्द झंकार या कविसंमेलनात डॉ. अशोक कोळी यांच्यासह विविध कविंनी कविता सादर केल्या.मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरणसंमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत यांच्याहस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सूर्योदय बालमित्र पुरस्कार सुभाषचंद्र वैष्णव व एकनाथ आव्हाड यांना देण्यात आला. तर सुर्योदय बालनाट्य पुरस्कार मुंबई येथील ज्योती कपिले यांच्या ‘कोडी झाली नाटुकली’ या बालनाट्य लेखास देण्यात आला. तसेच सुर्योदय बालकाव्य पुरस्कार औरंगाबाद येथील गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बालकाव्य संग्रहास देण्यात आला. सूत्रसंचालन वैदेही नाखरे तर आभार सतिश जैन यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव