जळगाव- कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात बांद्रा येथील चेतना इन्स्टिट्यूटच्या संचालिका स्रेहजा प्रेमानंद रुपवते (६५, मुंबई) यांचा मृत्यू झाला. यात चालकासह अन्य तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना जळगावजवळच्या पाळधी येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. स्नेहजा या विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या कन्या व दादासाहेब रुपवते यांच्या सून तसेच रावेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी होत्या. रावेर येथे रविवारी शिरीष चौधरी यांच्या मुलीचे लग्न होते. हे लग्न आटोपून त्या मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. यात चालकासह अन्य तीन जण जखमी झाले आहेत.स्नेहजा रुपवते या काँग्रेस नेते व बहुजन शिक्षण संघ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त दिवंगत अॅड. प्रेमानंद रूपवते (७३) यांच्या पत्नी होत्या. त्यांच्यामागे आई सुशीलाबाई, मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. संघराज, वैमानिक परित्याग व संग्राम असे तीन भाऊ, बहिणी अॅड. युगप्रभा बल्लाळ, डॉ. स्मृतिगंधा गायकवाड व डॉ. क्रांती कोळगे, मुली उत्कर्षा व बंधमुक्ता, जावई, मेहुणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
चेतना इन्स्टिट्यूटच्या संचालिका स्रेहजा रुपवतेंचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 19:47 IST