शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात वातावरण बदलाने हळदीचे उत्पादन निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:52 IST

शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही

ठळक मुद्देबाजारपेठेत मात्र भाव चढेच जिल्ह्यातील माल सांगलीला

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - बदलत्या वातावरणामुळे हळदीच्या पिकावर परिणाम होऊन झाडांची वाढ अपेक्षेपेक्षा दुप्पट झाल्याने हळदीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. इतकेच नव्हे शेतकºयांना मिळणारे भावही निम्म्यावर आले तर दुसरीकडे बाजारपेठेत भाव वाढलेले आहे. विशेष म्हणजे उत्पादन कमी झाल्याने बाजारात तयार हळदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात नवीन हळद येण्यास सुरुवात होते. यंदा मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने हळद उत्पादक हवालदिल झाले आहेत. तसे पाहता सांगली ही हळदीची मोठी बाजारपेठ असली तरी जळगाव जिल्ह्यातही यावल, रावेर या भागात हळदीचे उत्पादन घेण्याºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील केळी व कापूस या मुख्य पिकांसह या भागातील शेतकरी हळदीचेही उत्पादन घेऊ लागले आहेत. यंदा कापसावर बोंडअळीचा प्रार्दुभाव व तुरीच्या उत्पादनात आलेली घट या दोन संकटात शेतकरी सापडला असताना आता हळद उत्पादक शेतकरीही निसर्गाच्या लहरीपणात भरडला गेला आहे.दमट वातावरणामुळे दुप्पट वाढहळदीच्या पिकाला पाणी कमी असले तरी चालते. त्यामुळे पाऊस कमी झाल्याचा परिणाम न होता हळदीवर दमट वातावरणाचा परिणाम झाल्याचे हळद उत्पादक शेतकºयांनी सांगितले. तसे पाहता हळदीच्या झाडाची उंची साधारण तीन फुटापर्यंत असते, मात्र यंही ही झाडे साडेपाच फुटापर्यंत वाढली. यात केवळ उंची वाढली, मात्र उत्पादन थेट निम्म्यावर आले. गेल्या वर्षी यावल, रावेर परिसरातील शेतकºयांना एकरी १५० क्विंटल हळदीचे उत्पादन झाले होते, त्यात यंदा घट होऊन ते थेट ८० क्विंटल प्रति एकरावर आले आहे.दुहेरी संकटयावल, रावेर या भागात दीड हजार एकरावर हळदीची लागवड करण्यात आली असून या पिकातून शेतकºयांना मोठी अपेक्षा होती. मात्र एक तर उत्पादनात घट व दुसरीकडे शेतकºयांच्या मालाला भाव नसल्याने हळद उत्पादक हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी तयार हळदीला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता, तो यंदा केवळ ५ हजार ८०० रुपयांवर आला आहे. तसे पाहता काही दिवसांपूर्वी हा भाव ११ हजार रुपये प्रति क्विंटल होता, मात्र त्यात जवळपास निम्माने घट झाल्याचे शेतकºयांनी सांगितले.जिल्ह्यातील माल सांगलीला व सांगलीचा माल बाजारपेठेतजिल्ह्यात हळदीचे उत्पादन घेऊन ती तयार करण्यासाठी शेतकºयांची या दिवसात लगबग असते. १०० किलो हळदीपासून तयार हळदीचा केवळ २० टक्के उतारा येतो. यात ८० टक्के घट तर येतेच त्यात यंदा उत्पादनात घट झाल्याने हळद उत्पादक चिंतीत झाले आहे. जिल्ह्यात तयार झालेली हळद सांगली येथे पाठविली जाते. तेथे जळगाव जिल्ह्यातील हळदीला मुळातच भाव कमी दिला जातो व त्यात वाहतुकीचा खर्च वेगळा असतो. येथील माल सांगलीला विक्री करावा लागतो तर जळगावच्या बाजारपेठेत सांगलीचा माल आयात केला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील मालाला चांगला भाव मिळण्यासाठी जिल्ह्यातच हळद खरेदीचा बाजारपेठ तयार व्हावी, अशी मागणी शेतक-यांची आहे.बाजारपेठेत भाव तेजीतएकीकडे शेतकºयांच्या मालाला भाव नाही व दुसरीकडे उत्पादन कमी आल्याने व वातावरणाच्या परिणामामुळे दर्जावरही परिणाम झाल्याने चांगल्या मालाचे भाव बाजारपेठेत तेजीत आहे. सध्या बाजारात भाव १८० ते २३० रुपये किलो आहे. त्यात फेब्रुवारी ते मे महिन्यात लोणचे व मसाल्यासाठी हळदीची खरेदी केली जाते. त्यामुळे मागणी वाढून आणखी भाव वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.निर्यात वाढलीहळदीच्या औषधी गुणधर्मामुळे जपान व अरब राष्ट्रांमध्ये हळदीला मागणी वाढल्याने या देशांमध्ये निर्यात वाढल्याने हळदीचे भाव वाढत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.वातावरणातील बदलामुळे हळदीच्या पिकाची वाढ जास्त झाली व उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यात भावही कमी मिळत आहे. वाहतूक खर्च वाचून हळदीला चांगला भाव मिळण्यासाठी जिल्ह्यातच हळदीची खरेदी केली जावी-हेमराज फेगडे, हळद उत्पादक, यावलनवीन हळदीची आवक सुरू आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने सध्या असलेल्या भावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.-अशोक धूत, व्यापारी.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव