शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

जळगावात अल्पकालावधीत कामे मार्गी लावण्याच नवीन पालकमंत्र्यांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:33 IST

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पालकत्वच हरवलेल्या जिल्ह्याला गिरीश महाजन यांच्या रूपाने अखेर जिल्ह्यातीलच ...

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पालकत्वच हरवलेल्या जिल्ह्याला गिरीश महाजन यांच्या रूपाने अखेर जिल्ह्यातीलच पालकमंत्री मिळाल्याने जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागण्याची शक्यता असल्याने अवघ्या अडीच महिन्यांच्या अल्प कालावधीत अधिकाधिक विषय मार्गी लावण्याचे आव्हान नवीन पालकमंत्र्यांसमोर आहे.राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यावर तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना जळगाव जिल्ह्याचे तर महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळाले. मात्र खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर जिल्ह्यातीलच असलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना हे पालकमंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र खडसे-महाजन यांच्यातील पक्षांतर्गत वादामुळे मुख्यमंत्र्यांनी खडसे यांची नाराजी टाळण्यासाठी महाजन यांना पालकमंत्रीपद देणे टाळले. तत्कालीन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले.मात्र बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासाबद्दल आस्थाच नसल्याने त्यांच्याकडून केवळ औपचारीकता पार पाडण्याचे काम केले जाते.एकच बैठकत्यानुसार फुंडकर यांनी जेमतेम एकाच बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री असलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली. चंद्रकांत पाटील हे खडसेंच्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी पक्षातील नंबर दोनचे नेते बनले. तसेच त्यांच्याकडे अनेक महत्वाची खाती, कोल्हापूरचाही असलेला पालकमंत्रीपदाचा पदभार यामुळे जळगावकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता.दोन-तीन महिन्यांनी येऊन बैठकांचे सोपस्कार पाडून निघून जात असत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठा फटका बसला. जिल्ह्यातीलच पालकमंत्री हवा, अशी मागणी होत होती. विरोधकांकडूनही या मुद्यावरून टीका केली जात होती.विविध पातळ्यांवरील यशामुळे मिळाले पालकमंत्रीपदजिल्ह्यात खडसे-महाजन गटात असलेल्या अंतर्गत शह-काटशहच्या राजकारणामुळेच पक्षनेतृत्वाकडून महाजन यांना पालकमंत्रीपद देणे टाळले जात होते. मात्र गिरीश महाजन यांनी मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यातील नगरपालिका, जि.प. निवडणुकांमध्ये एकहाती यश मिळवून दिले. जळगाव मनपावर असलेली खाविआची गेल्या ३५ वर्षांची सत्ता उलथवून भाजपची सत्ता आणून दाखविली.विधानपरिषद निवडणूक, तसेच नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत तर उत्तर महाराष्टÑातील जबाबदारी सोपविण्यात आलेल्या सर्व ८ जागांवर त्यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणले. त्यामुळे पुन्हा पालकमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली होती. महाजन यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केल्याने त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार, असे संकेत मिळाले होते. त्यावर या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे.दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावीजिल्ह्यातील मंत्र्याकडे पालकमंत्रीपद आल्याने विकासाचा बॅकलॉग भरून निघेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम अडीच महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे या अल्प कालावधीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जिल्ह्याच्या विकासाचे विषय, प्रश्न मार्गी लावावे लागणार आहेत. अगदी मनपा निवडणुकीच्यावेळी दिलेल्या शेकडो कोटींच्या विकासकामांची आश्वासने देखील पूर्ण करावयाची आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील समांतर रस्ते, महामार्गाचे चौपदरीकरण, विमानसेवा, जामनेरला जाहीर केलेले टेक्सटाईल पार्क यासह खडसे यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यासाठी मंजूर करून आणलेले मात्र नंतर मंत्रीपद गेल्याने सुरू न होऊ शकलेले अनेक प्रकल्प अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत मार्गी लावण्याचे आव्हान या नवीन पालकमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. मात्र त्यापेक्षा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणेवर पकड मिळविण्यासाठी हे पालकमंत्रीपद दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव