शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वनजमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला पकडण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:46 PM

विश्लेषण

सुशील देवकर

जळगाव: जळगाव तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवार व परिसरातील वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचे प्रकार घडले असून आतापर्यंत सुमारे २२८८ एकर जमिनची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही मुख्य सूत्रधार मुकुंद ठाकूर यास अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आधीच एका प्रकरणात फरार असलेल्या मुकुंद ठाकूर याच्यावर पोलिसांकडून कारवाई झालेली नसताना वनजमीन विक्री प्रकरणात गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे शेतजमिनीच्या व्यवहारात आम्हा सर्व खरेदी देणार व घेणार अशा सर्वांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार मुकुंद बलविरसिंह ठाकूर, शिवानी इस्टेट ब्रोकर हाच असल्याचा आरोप वनजमीन खरेदी-विक्री केलेल्या नेहा कांतीलाल शर्मा, अभिमन्यू अर्जुन पाटील, दिलीप पंडीत सोनवणे, संदीप सुरेश पाटील, रमेश आनंदा पाटील यांनी चौकशी समितीसमोर २८ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेल्या जबाबात केला आहे. या वनजमीन घोटाळ्याचा सूत्रधार मुकुंद ठाकूर असला तरीही त्याच्या नावावर वनजमीन वर्गच झालेली नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे तो सहज सुटुन जाईल, असा दावाही केला जात होता. मात्र चौकशी समितीसमोर काही खरेदीदारांनी दिलेल्या जबाबात विखरण ता.एरंडोल येथील राष्टÑीय महामार्ग क्र.६ लगत असलेला रामेश्वरी नंदलाल शर्मा यांच्या मालकीच्या शेतगट नं.२८४ क्षेत्र ०.३३ हे.आर. या शेतजमिनीची खरेदी रूपेश भिकचंद तिवारी यांनी दुय्यम निबंधक एरंडोल येथे १४ फेब्रुवारी २०१४ रोजी केलेली असून हा गट त्यानंतर रूपेश भिकचंद तिवारी यांनी २० जून २०१४ रोजी दस्त क्र.२०९५/२०१४ अन्वये दि.२० जून २०१४ रोजी नवनाथ दारकुंडे यांना विक्री केला.त्यानंतर दारकुंडे यांनी २५ फेब्रुवारी २०१५ रोजी मुकुंद ठाकूर व उमाकांत त्र्यंबक कोल्हे यांना विक्री केला आहे. हा व्यवहार रोख स्वरूपात झालेला असल्याचा दावा केला आहे. खरेदीखतही सादर झाले आहे. त्यामुळे मुकुंद ठाकूर विरूद्ध पोलिसांकडे या प्रकरणात सहभागी असल्याचा लेखी पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता तरी पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करून त्यास अटक करण्याची मागणी या प्रकरणात फसवणूक झालेल्यांकडून होत आहे. मुख्य सूत्रधाराला अटक झाली तरच या प्रकरणातील पडद्याआड असलेले राजकीय धेंडांची नावेही अधिकृतपणे समोर येतील.