शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चाळीसगावकरांनो पिण्याचे पाणी जपून वापरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:02 IST

निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा ५०.२३ टक्क्यांवर आला आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याची सलामी : गिरणा ५०.२३ तर मन्याडमध्ये ३० टक्के जलसाठा पिण्याच्या पाण्याचे यापुढे मिळणार दोनच आवर्तने

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा ५०.२३ टक्क्यांवर आला असून मन्याडमध्येही ३० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चाळीसगावकरांनो, पाणी जपूनच वापरा, असा सायरन वाजला आहे. या वर्षातील सिंचनासाठी दिली जाणारी तीन आवर्तने पूर्ण झाली असून यापुढे पिण्याच्या पाण्यासाठी दोनच आवर्तने मिळणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमध्ये गणना होणाऱ्या गिरणा धरणावरुनच निम्म्या जिल्ह्यासह चाळीसगाव शहर, मालेगाव, नांदगाव आदी ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धरणातील साठा निम्म्यावर आला आहे. अजून तीव्र उन्हाळ्याचे एप्रिल व मे हे महिने पार करावयाचे असून जूनमध्ये पावसाच्या सुरुवातीवरही बरेचसे गणित अवलंबून असते. त्यामुळे शिल्लक जलसाठा तीन महिने पुरवावा लागणार आहे. पाऊस लांबल्यास हे गणित बिघडूही शकते. तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होते. आवर्तन सोडल्यानंतर देखील बाष्पीभवनामुळे पाणी वाहण्याचा वेग मंदावतो. यावर्षी शतकी सलामी देणाऱ्या मन्याड मध्येही ३० टक्केच जलसाठा उरला आहे.

गिरणा धरण निम्मे : ५०.२३ टक्के जलसाठा

२१५०० दलघफू जलसाठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणात गुरुवार अखेर १२२९३.४५ जलसाठा असून यातील तीन हजार दलघफू मृतसाठा वगळल्यास ९२९३.४५ जलसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५०.२३ अशी आहे. उपयुक्त जलसाठा १८५०० दलघफू गणला जातो. धरणातून मालेगाव, चाळीसगाव व नांदगावसह दहीवाळ तसेच २५ गावे याबरोबरच जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १५४ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. गतवर्षी १६ सप्टेंबर रोजी गिरणा धरणाने सेंच्युरी ठोकली होती. यानंतर गत सहा महिन्यात धरणातील ४९.७७ टक्के जलसाठा संपला असून सद्यस्थितीत ५०.२३ जलसाठा उरला आहे. या साठ्यावर अजून पुढचे चार महिने अवलंबून आहे.

मन्याड ३० टक्क्यांवर

१९०५ दलघफू साठवण क्षमता असणाऱ्या मन्याड धरणात गुरुवार अखेर ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ४८३ दलघफू जलसाठा मृतसाठा म्हणून गणला जातो. या धरणाचा परिसरातील ३० गावांना मोठा फायदा होतो. २०१६ नंतर तब्बल तीन वर्षांनी म्हणजेच २०१९ मध्ये मन्याड ओव्हरफ्लो झाले होते. गेल्यावर्षी दोन ऑगस्ट रोजी त्याने शतकी सलामी दिली. गत सात महिन्यात या धरणातील ७० टक्के जलसाठा वापरला गेला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने

गिरणा धरणावर अवलंबित्व असणाऱ्या मोठ्या शेती क्षेत्राला सिंचनाचे या वर्षातील तीन आवर्तने यापूर्वीच दिली गेली असून यापुढे पिण्याच्या पाण्यासाठीच दोन आवर्तने सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत आहे. तापमानातही वाढ होत असून येत्या काळात पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. आवर्तन सोडल्यानंतरही उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावwater shortageपाणीकपात