शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावकरांनो पिण्याचे पाणी जपून वापरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:02 IST

निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा ५०.२३ टक्क्यांवर आला आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याची सलामी : गिरणा ५०.२३ तर मन्याडमध्ये ३० टक्के जलसाठा पिण्याच्या पाण्याचे यापुढे मिळणार दोनच आवर्तने

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा ५०.२३ टक्क्यांवर आला असून मन्याडमध्येही ३० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चाळीसगावकरांनो, पाणी जपूनच वापरा, असा सायरन वाजला आहे. या वर्षातील सिंचनासाठी दिली जाणारी तीन आवर्तने पूर्ण झाली असून यापुढे पिण्याच्या पाण्यासाठी दोनच आवर्तने मिळणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमध्ये गणना होणाऱ्या गिरणा धरणावरुनच निम्म्या जिल्ह्यासह चाळीसगाव शहर, मालेगाव, नांदगाव आदी ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धरणातील साठा निम्म्यावर आला आहे. अजून तीव्र उन्हाळ्याचे एप्रिल व मे हे महिने पार करावयाचे असून जूनमध्ये पावसाच्या सुरुवातीवरही बरेचसे गणित अवलंबून असते. त्यामुळे शिल्लक जलसाठा तीन महिने पुरवावा लागणार आहे. पाऊस लांबल्यास हे गणित बिघडूही शकते. तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होते. आवर्तन सोडल्यानंतर देखील बाष्पीभवनामुळे पाणी वाहण्याचा वेग मंदावतो. यावर्षी शतकी सलामी देणाऱ्या मन्याड मध्येही ३० टक्केच जलसाठा उरला आहे.

गिरणा धरण निम्मे : ५०.२३ टक्के जलसाठा

२१५०० दलघफू जलसाठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणात गुरुवार अखेर १२२९३.४५ जलसाठा असून यातील तीन हजार दलघफू मृतसाठा वगळल्यास ९२९३.४५ जलसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५०.२३ अशी आहे. उपयुक्त जलसाठा १८५०० दलघफू गणला जातो. धरणातून मालेगाव, चाळीसगाव व नांदगावसह दहीवाळ तसेच २५ गावे याबरोबरच जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १५४ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. गतवर्षी १६ सप्टेंबर रोजी गिरणा धरणाने सेंच्युरी ठोकली होती. यानंतर गत सहा महिन्यात धरणातील ४९.७७ टक्के जलसाठा संपला असून सद्यस्थितीत ५०.२३ जलसाठा उरला आहे. या साठ्यावर अजून पुढचे चार महिने अवलंबून आहे.

मन्याड ३० टक्क्यांवर

१९०५ दलघफू साठवण क्षमता असणाऱ्या मन्याड धरणात गुरुवार अखेर ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ४८३ दलघफू जलसाठा मृतसाठा म्हणून गणला जातो. या धरणाचा परिसरातील ३० गावांना मोठा फायदा होतो. २०१६ नंतर तब्बल तीन वर्षांनी म्हणजेच २०१९ मध्ये मन्याड ओव्हरफ्लो झाले होते. गेल्यावर्षी दोन ऑगस्ट रोजी त्याने शतकी सलामी दिली. गत सात महिन्यात या धरणातील ७० टक्के जलसाठा वापरला गेला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने

गिरणा धरणावर अवलंबित्व असणाऱ्या मोठ्या शेती क्षेत्राला सिंचनाचे या वर्षातील तीन आवर्तने यापूर्वीच दिली गेली असून यापुढे पिण्याच्या पाण्यासाठीच दोन आवर्तने सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत आहे. तापमानातही वाढ होत असून येत्या काळात पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. आवर्तन सोडल्यानंतरही उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावwater shortageपाणीकपात