शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

चाळीसगावला कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 22:47 IST

चाळीसगाव शहर व तालुका परिसरात कोरोना आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिलासादायक राहिले आहे.

ठळक मुद्देमृत्यूसंख्या शंभरीपार : अवघ्या ५० दिवसांत २० कोरोनाबळी

लोकमत न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव : शहर व तालुका परिसरात कोरोना आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिलासादायक राहिले आहे. तथापि, दुसऱ्या लाटेतील गेल्या ५० दिवसांतही कोरोनाशी फाइट करून पुन्हा स्वगृही परतणाऱ्या नागरिकांचे प्रमाण बाधितांपेक्षा वाढले आहे. ही गूड न्यूज असली तरी, गेल्या ५० दिवसांतच २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ही संख्या शंभरीपार होऊन १०१ एवढी झाली आहे. सद्य:स्थितीत उपचार घेणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांची स्थिती पाहता ही संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे.

चाळीसगाव हे तीन जिल्ह्यांच्या सीमांना स्पर्श करते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या सार्वजनिक टाळेबंदीनंतर येथे कोरोना रुग्णांचा स्फोट होईल. अशी भीती व्यक्त केली गेली होती. मात्र, कडकोट सीमाबंदी झाल्याने येथे कोरोनाचा शिरकाव धीम्या गतीने झाला. सुरुवातीला ११ बाधित आढळले. त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने त्यांनी कोरोनाला हरविले. चाळीसगाव कोरोनामुक्तही झाले. मात्र, हा आनंद अल्पावधीतच हरवला. यानंतर सातत्याने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या फुगत गेली. शुक्रवारअखेर ६७२९ एवढे बाधित असून ६६७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या ५० दिवसांचा ताळेबंद पाहिल्यास बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

५० दिवसात २० मृत्यू 

पाच मार्च ते २३ एप्रिल या ५० दिवसांत मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पाच मार्च अखेर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८१ होती. २३ अखेर मृत्यूंची शंभरीपार होऊन १०१ संख्या झाली आहे. गत आठवड्यात एकाच दिवशी पाच बाधितांचे मृत्यू झाले. कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. हे दिलासादायक असले तरी, मृत्यूंची साखळीही खंडित होणे गरजेचे आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा रुग्ण या आजारातून बरे होण्याचा आलेख उंचावला आहे. बाधित रुग्णांनी तात्काळ उपचार घेऊन शासकीय आचारसंहितेचे पालन केल्यास रिझल्ट चांगला मिळतो. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत. लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क वापरण्याबरोबरच सुरक्षित अंतरही पाळणे अत्यावश्यक आहे. 

- डॉ. देवराम लांडे,  तालुका वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू