शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Load Shedding In Maharashtra: राज्यात होत असलेल्या भारनियमनाला केंद्र सरकार जबाबदार, गुलाबराव पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 11:17 IST

Load Shedding In Maharashtra: राज्यात होत असलेल्या भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्य सरकारमंधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 

जळगाव - राज्यात होत असलेल्या भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्य सरकारमंधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नसल्याने राज्य सरकारवर भारनियमन करण्याची वेळ आली आहे. भारनियमनामुळं शेतकऱ्यांचं, उद्योजकांचं जे काही नुकसान होत आहे, त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे, असे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीं केंद्र सरकारवर टीका करताना म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी केंद्र सरकारने राज्याला कोळसा पुरवठा थांबवला आहे, त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

भारनियमनाच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी भाजपने काढलेल्या आक्रोश मोर्चात खासदार उमेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. खासदार पाटील यांनी केलेल्या टीकेचाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. खासदार उन्मेष पाटील यांनी इकडे बोंबा मारण्यापेक्षा केंद्राकडून कोळसा मिळावा म्हणून प्रयत्न केले असते, तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता. अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी उन्मेष पाटलांना फटकारले आहे. हा पठ्ठ्या राहिला नसता तर उन्मेष पाटील दिल्लीदरबारी गेले नसते, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलelectricityवीजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेना