शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असताना सीसीआयने थांबविली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:13 IST

महिनाभरात दुसऱ्यांदा थांबविली खरेदी : कापसाच्या विक्रीवर ‘कोरोना’ची संक्रात कायम

जळगाव : शेतकºयांकडे एकीकडे ५० टक्के माल शिल्लक असताना सीसीआय ने शनिवारपासून खरेदी थांबविली आहे. महिनाभरातच सीसीआयने दुसºयांदा खरेदी थांबवली असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खासगी खरेदी केंद्रावर शेतकºयांचा माालाला भाव मिळत नाही तर शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खान्देशात कापसाची लागवड १० ते २० टक्क्यांनी अधिक झाली होती. डिसेंबरमध्ये खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर कापसात ओलावा असल्याने बहूतेक शेतकºयांनी आपला माल विक्रीसाठी बाजारात आणला नाही. त्यानंतर संक्रातीनंतर बाजारात तेजी येईल व भाव वाढतील ही आशा देखील फोल ठरल्याने शेतकºयांनी फेब्रुवारी मध्यापर्यंत कापूस विक्रीसाठी आणलाच नाही. मात्र, आता भाव वाढीची आशा मावळल्याने शेतकºयांकडून कापूस खरेदी केंद्रावर माल आणला जात असताना दुसरीकडे सीसीआयने खरेदी थांबविल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून, सीसीआयने पुन्हा केंद्र सुुरु न केल्यास कमी भावात शेतकºयांना आपला माल विक्री करावा लागणार आहे.माल ठेवण्यास जागा नसल्याने खरेदी थांबवलीसीसीआयने देशभरात १ लाख गाठी खरेदी करण्याचे उदिष्ठ ठेवले आहे. आतापर्यंत ७० लाख गाठींची खरेदी सीसीआयने केली आहे. सीसीआयने १५ मार्चपर्यंत खरेदी थांबविल्याचे सांगितले जात आहे. सीसीआयच्या गोडावून मध्ये माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने तात्पुरती खरेदी थांबविण्यात आली असल्याची माहिती प्रदीप जैन यांनी दिली. दरम्यान, सीसीआयच्या अध्यक्ष पी.अलीराणी यांनी एका कार्यक्रमात दिलेल्या यंदा सप्टेंबरपर्यंत खरेदी सुरु राहील अशी माहिंती दिली.दरम्यान, सीसीआयने खरेदी थांबवली असली तरी पणन महासंघाकडून खरेदी सुरु आहे. तर खासगी खरेदी केंद्रावर खरेदी सुरु असली त्याठिकाणी भाव कमी मिळत आहे.शेतकºयांचा मालाला आता कमी भाव भेटत असला तरी शासकीय खरेदी बंद झाल्याने खासगी केंद्रावर कापसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.देशभरातून ८० लाख तर खान्देशात १२ लाख गाठींची खरेदीसीसीआय व खासगी जिनींग मिळून २९ फेब्रुवारीपर्यंत देशभरात एकूण ८० लाख गाठींची खरेदी झाली आहे. तर खान्देशात १२ लाख गाठींची खरेदी झाल्याची माहिती खान्देश जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी ‘लोकमत’ ला दिली. खान्देशात दरवर्षी १५ ते १६ लाख गाठींची खरेदी होत असते. मात्र, यंदा कापसाची लागवड जास्त असल्याने यंदा २० लाख गाठी खरेदी होण्याचा अंदाज आहे.कोरोनामुळे कापूस बाजारावर संक्रात-चीन मध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारताहून चीनला जाणारा माल पुर्णपणे थांबला आहे. आता भारतापाठोपाठ अमेरिकेनेही चीन मधील निर्यात थांबविली आहे. त्यामुळे आंतराराष्टÑीय बाजारावर परिणाम झाला आहे.-कापसाचा जागतिक भाव ठरविणाºया न्युयॉर्क ट्रेडमध्ये सेंट चा भाव ७० वरून ६१ वर आला आहे.-त्यामुळे खंडीच्या भावातही मोठी घट झाली आहे. आठवडाभरापुर्वी ३९ हजार भाव असलेल्या खंडीचे भाव ३७ हजारवर आले आहेत. सरकीच्या भावातही चारशे रुपयांची घट झाली आहे.सीसीआयने खरेदी तात्पुरती थांबवली आहे. सीसीआयच्या गोडावूनमध्ये माल ठेवण्यास जागा उपलब्ध नाही. त्यामुळे काही दिवस खरेदी थांबविली असावी. मात्र, सीसीआयच्या अध्यक्षा पी.अलीराणी यांनी सप्टेंंबरपर्यंत खरेदी केंद्र सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शेतकºयांनी घाबरण्याची गरज नाही.-प्रदीप जैन, अध्यक्ष,खान्देश जिनींग असोसिएशनकोरोना व्हायरसचा कापूस बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. खंडी, सरकीच्या भावातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. भविष्यातही हीच स्थिती कायम राहिल्यास खासगी जिनर्सला माल जास्त भावात खरेदी करणे परवडणारे नाही. यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो.-हर्षल नारखेडे, जिनर्स व कापूस बाजाराचे तज्ज्ञ

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव