कार अचानक पेटली
By Admin | Updated: June 1, 2014 00:50 IST2014-06-01T00:50:47+5:302014-06-01T00:50:47+5:30
: रेल्वेस्थानकासमोर चार चाकी गाडी उभी करीत असताना तीने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

कार अचानक पेटली
जळगाव : रेल्वेस्थानकासमोर चार चाकी गाडी उभी करीत असताना तीने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने अनर्थ टळला. शिव कॉलनीतील किसन वामनराव सोनवणे हे या गाडीचे मालक आहेत़ त्यांनी त्यांच्या मालकीच्या चार गाड्या स्टेट बँकेला भाड्याने दिलेल्या आहेत़ त्यापैकी एका कारने (एम़एच़१८,पी ४९१) चालक प्रकाश केदार हा स्टेट बँकेच्या अधिकार्यांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आला होता़ त्यांना सोडून रेल्वे स्थानकासमोर नो पार्किंगमध्ये गाडी लावत असताना इंजिनमध्ये अचानक शॉर्ट सर्कीट झाले़ त्यामुळे धूर निघू लागला़ हा प्रकार काही रिक्षा चालकांच्या लक्षात आला़ त्यांनी तातडीने कारचालकाच्या निदर्शनास आणून दिले़ त्यामुळे चालक कारच्या खाली उतरला़ कारच्या समोरच्या बाजूने आग लागलेली होती़ बोनटमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत होता़त्यामुळे रिक्षाचालकांनी बोनट तोडले़ समोरच्या हॉटेलमधून पाणी आणून इंजिनवर टाकण्यात आले़ आग पूर्णत: विझविल्यानंतर अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला होता़ या आगीत गाडीची बॅटरी, इंजिन व इतर सुटे भाग जळून खाक झाले आहेत़ एकलग्नजवळील अपघातात एक ठार एरंडोलला बहिणीच्या गावाला जात असताना एकलग्नजवळ टाटा ४०७ या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत रवींद्र सूर्यवंशी(२३) हा युवक ठार झाला असून महेंद्र ठाकुर,रा़विजयनगर, सुरत हा जखमी झाला आहे़ रवींद्र हा मूळचा जामनेर तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे़ रवींद्र आणि महेंद्र सुरतला मिस्त्रीचे काम करतात़ टाकळीला ते एका लग्नासाठी आलेले होते़ दुपारी १ वाजेच्या दरम्यान एरंडोलला जात असताना एकलग्नजवळ हिरव्या रंगाच्या मॅटॅडोरने दिलेल्या धडकेत रवींद्र ठार झाला़ तर महेंद्रला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़