शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

व्यापा:यांनी लिलाव थांबविल्याने शेतक:यांचा संताप,सभापतींच्या दालनाची फोडली काच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:41 IST

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी व्यापा:यांनी लिलाव प्रक्रीया सुरू न केल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त केल्यानंतर पदाधिका:यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देलिलाव सुरू न झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांची झाली गर्दी.शेतकरी आणि व्यापा:यांमध्ये वादंग

लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.30 : पूर्वसूचना न देता सोमवारी येथील व्यापा:यांनी बाजार समितीत लिलाव प्रक्रिया थांबवल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त करून सभापती व उपसभापती दालनाची काच फोडली. तथापि दुपारी 2 वाजेला पदाधिका:यांच्या व अधिका:यांच्या मध्यस्थीने लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला. शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भाव देऊन व्यापा:यांनी शेतक:यांना लुटल्याची तक्रार गावरान जागल्या सेनेसह 67 शेतक:यांनी केली होती. मात्र महिना उलटूनही याबाबत चौकशी झाली नाही, म्हणून व्यापारी दोषी असतील तर शासन निर्णयाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याच्या सूचना उपसभापती अनिल पाटील यांनी केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याचा गैरअर्थ काढत सरसकट सर्व व्यापा:यांनी 30 रोजी लिलावाला सुरुवात न केल्याने 12 वाजेपयर्ंत बाजार समितीचे आवार कृषी माल आणलेल्या वाहनांनी भरले होते. त्यामुळे शेतक:यांमध्ये संतप्त भावना पसरली होती. तर दुसरीकडे व्यापा:यांनीही बाजार समितीने प्रतवारी करावी मग लिलाव करू अशी ठाम भूमिका घेतली. शासनच जर मूग -उडीद, तूर 3800 ते 4000 भावात विकत असेल तर आमचा माल कसा घेतला जाईल त्यामुळे हमी भावात माल घेणे परवडत नाही अशी भूमिका व्यापा:यांनी मांडली. धरणगाव, चोपडा येथे बाजार समिती लिलाव करते मात्र तेथे भाव कमी आहेत. तसेच आधारभूत किंमत काय आहे हे व्यापा:यांना माहीतच नाही, ते पत्रच दाखवण्यात आले नाही असे व्यापारी म्हणाले असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, सभापती उदय वाघ मुंबईला, उपसभापती अनिल पाटील नाशिकला तर सचिवही बाहेरगावी गेले होते. ब:याच वेळाने संचालक उदय पाटील, प्रफुल्ल पवार बाजार समितीत दाखल झाले. त्यांनी व्यापा:यांची अडचण समजावून प्रतवारी करण्यास येणा:या अडचणीमुळे सर्वांसाठी शक्य नाही. ज्यांना भाव कमी वाटत असल्यास त्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, त्याला न्याय दिला जाईल अशी भूमिका मांडण्याचा प्रय} केला. तेव्हा खेडीढोकचे शेतकरी प्रवीण राजपूत यांनी व्यापारी न सांगता शेतक:यांना वेठीस धरतात. लिलाव बंद पाडतात, याबाबत संचालकांनी शेतक:यांची बाजू घ्यावी असे सांगितले .तर रामकृष्ण पाटील यांनी मॉइश्चर मशिन खराब असल्याचा आरोप केला. यावेळी संतप्त शेतक:यांनी संचालकांनी व्यापा:यांची बाजू घेऊ नये आणि योग्य हमी भाव द्यायला सांगा असे खडसावून संगितले. लवकर लिलाव चालू होत नाही म्हणून संतापाच्या भरात अज्ञात शेतक:याने सभापती दालनाची काच फोडली. तर काही शेतक:यांनी माजी सभापती अनिल पाटील यांच्याकडेही तक्रारी केल्या . त्यावेळी त्यांनी गेल्या 10 वर्षात असा प्रकार घडला नाही, प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप त्यांनी केला . यावेळी सहायक निबंधक कार्यालयातील एन. के. पाटील यांनी व्यापा:यांना न सांगता लिलाव बंद केला आहे, कायद्याने हे चुकीचे आहे. व्यापारी ऐकत नसतील तर दंडाच्या नोटीसा द्याव्यात असे सांगितले तर उपसचिव मंगलगीर गोसावी यांनी व्यापा:यांना लेखी पत्र देऊ असे सांगितले. अखेर सभापती , उपसभापती आल्यानंतर संयुक्त बैठकीत योग्य निर्णय घेऊ. आज शेतक:यांना ताटकळत ठेवू नका आणि लिलाव चालू करा अशी भूमिका उदय पाटील व प्रफुल्ल पाटील, कर्मचारी सुनील शिसोदे यांनी मांडल्याने लिलावाला सुरुवात झाली.