शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा:यांनी लिलाव थांबविल्याने शेतक:यांचा संताप,सभापतींच्या दालनाची फोडली काच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:41 IST

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी व्यापा:यांनी लिलाव प्रक्रीया सुरू न केल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त केल्यानंतर पदाधिका:यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देलिलाव सुरू न झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांची झाली गर्दी.शेतकरी आणि व्यापा:यांमध्ये वादंग

लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.30 : पूर्वसूचना न देता सोमवारी येथील व्यापा:यांनी बाजार समितीत लिलाव प्रक्रिया थांबवल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त करून सभापती व उपसभापती दालनाची काच फोडली. तथापि दुपारी 2 वाजेला पदाधिका:यांच्या व अधिका:यांच्या मध्यस्थीने लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला. शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भाव देऊन व्यापा:यांनी शेतक:यांना लुटल्याची तक्रार गावरान जागल्या सेनेसह 67 शेतक:यांनी केली होती. मात्र महिना उलटूनही याबाबत चौकशी झाली नाही, म्हणून व्यापारी दोषी असतील तर शासन निर्णयाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याच्या सूचना उपसभापती अनिल पाटील यांनी केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याचा गैरअर्थ काढत सरसकट सर्व व्यापा:यांनी 30 रोजी लिलावाला सुरुवात न केल्याने 12 वाजेपयर्ंत बाजार समितीचे आवार कृषी माल आणलेल्या वाहनांनी भरले होते. त्यामुळे शेतक:यांमध्ये संतप्त भावना पसरली होती. तर दुसरीकडे व्यापा:यांनीही बाजार समितीने प्रतवारी करावी मग लिलाव करू अशी ठाम भूमिका घेतली. शासनच जर मूग -उडीद, तूर 3800 ते 4000 भावात विकत असेल तर आमचा माल कसा घेतला जाईल त्यामुळे हमी भावात माल घेणे परवडत नाही अशी भूमिका व्यापा:यांनी मांडली. धरणगाव, चोपडा येथे बाजार समिती लिलाव करते मात्र तेथे भाव कमी आहेत. तसेच आधारभूत किंमत काय आहे हे व्यापा:यांना माहीतच नाही, ते पत्रच दाखवण्यात आले नाही असे व्यापारी म्हणाले असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, सभापती उदय वाघ मुंबईला, उपसभापती अनिल पाटील नाशिकला तर सचिवही बाहेरगावी गेले होते. ब:याच वेळाने संचालक उदय पाटील, प्रफुल्ल पवार बाजार समितीत दाखल झाले. त्यांनी व्यापा:यांची अडचण समजावून प्रतवारी करण्यास येणा:या अडचणीमुळे सर्वांसाठी शक्य नाही. ज्यांना भाव कमी वाटत असल्यास त्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, त्याला न्याय दिला जाईल अशी भूमिका मांडण्याचा प्रय} केला. तेव्हा खेडीढोकचे शेतकरी प्रवीण राजपूत यांनी व्यापारी न सांगता शेतक:यांना वेठीस धरतात. लिलाव बंद पाडतात, याबाबत संचालकांनी शेतक:यांची बाजू घ्यावी असे सांगितले .तर रामकृष्ण पाटील यांनी मॉइश्चर मशिन खराब असल्याचा आरोप केला. यावेळी संतप्त शेतक:यांनी संचालकांनी व्यापा:यांची बाजू घेऊ नये आणि योग्य हमी भाव द्यायला सांगा असे खडसावून संगितले. लवकर लिलाव चालू होत नाही म्हणून संतापाच्या भरात अज्ञात शेतक:याने सभापती दालनाची काच फोडली. तर काही शेतक:यांनी माजी सभापती अनिल पाटील यांच्याकडेही तक्रारी केल्या . त्यावेळी त्यांनी गेल्या 10 वर्षात असा प्रकार घडला नाही, प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप त्यांनी केला . यावेळी सहायक निबंधक कार्यालयातील एन. के. पाटील यांनी व्यापा:यांना न सांगता लिलाव बंद केला आहे, कायद्याने हे चुकीचे आहे. व्यापारी ऐकत नसतील तर दंडाच्या नोटीसा द्याव्यात असे सांगितले तर उपसचिव मंगलगीर गोसावी यांनी व्यापा:यांना लेखी पत्र देऊ असे सांगितले. अखेर सभापती , उपसभापती आल्यानंतर संयुक्त बैठकीत योग्य निर्णय घेऊ. आज शेतक:यांना ताटकळत ठेवू नका आणि लिलाव चालू करा अशी भूमिका उदय पाटील व प्रफुल्ल पाटील, कर्मचारी सुनील शिसोदे यांनी मांडल्याने लिलावाला सुरुवात झाली.