शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळतिये आगी घालिती उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 21:52 IST

माऊली ज्ञानेश्वर महाराज गीतेच्या नवव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकावर निरूपण करताना एका दृष्टांताच्या साहाय्याने विषय समजावून सांगत आहेत. स्वस्वरूपाचे ज्ञान ...

माऊली ज्ञानेश्वर महाराज गीतेच्या नवव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकावर निरूपण करताना एका दृष्टांताच्या साहाय्याने विषय समजावून सांगत आहेत. स्वस्वरूपाचे ज्ञान हे खरे ज्ञान आहे. ते फार कष्टसाध्य आहे असेही नाही. प्रत्येकाच्या आवाक्यात असणारे, सुखाचा अनुभव देणारे हे ज्ञान विकाररहीत असून एकदा प्राप्त झाले तर पुन्हा विसरले न जाणारे, कमी न होणारे, क्षय न पावणारे असे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे.लोकांच्या अनुभवातून ज्ञानासारखी ही श्रेष्ठ वस्तू कधी सुटली? अशी शंका अर्जुनाला येऊ शकते. तिचे उत्तर ही पुढे माऊली देतात. परंतु ही शंका उपस्थित करण्याच्या निमित्ताने मनुष्य स्वभावाचे लोक-रहाटीचे मोठे सुंदर वर्णन माऊलींनी या ओवींच्या पूर्वाधात केले आहे. लोक तरी कसे असतात. ‘एकोत्तराचिया वाढी । जळतिये आगी घालिती उडी । एक टक्का जास्त व्याज मिळत असेल तर सर्वस्व पणाला लावणारे जळत्या आगीत उडी घेणारे - थोड्याशा लाभासाठी काहीही करायला तयार होणारे !माझ्या स्टाफमध्ये एक सहकारी होते. कर्मचारी पतसंस्था सभासद हित लक्षात घेऊन अत्यल्प व्याजदराने कर्ज देत असे या सहकाºयाची आर्थिक स्थिती तशी बरी होती. कर्जाची त्यांना आवश्यकता नसायची. तरीही तो दर सहा माहिला मिळेल तितके कर्ज घेत. सहज चौकशी केली तेव्हा ते म्हणाले, ‘‘इथे सहा टक्के व्याजाने घेतलेले हे पैसे मी दुसºया पतसंस्थेत आठ टक्के व्याजाने मुदत ठेवीत टाकतो. हे कर्ज पगारातून फिटेल. मला काहीही न करता दोन टक्के व्याज अधिक मिळत असेल तर मी ते का सोडावे? अशा रितीने दोन लाखाची मुदतठेव केली आहे. दोन टक्के व्याज विनासायास मिळवण्यासाठी कर्ज घेणाºया त्या महात्म्याला मनोमन वंदन केले. पुढे झाले असे की अनियमित आर्थिक व्यवहार व विनातारण भरमसाठ कर्ज देणारी ती पतसंस्था पूर्णपणे बुडाली आणि त्याची सर्व रक्कम मुद्दलासह बुडीत झाली. आता तो ठेवीदार संघटनेचा सभासद होऊन मिळतील तितके पैसे मुद्दलात तोटा स्वीकारून चकरा मारतो आहे. म्हणून इथे माऊलींची ही ओवी आठवली. किंचित लाभासाठी लोक सर्वस्व पणाला लावतात. मोठा धोका पत्करतात.संतांनी अर्थ हा अनार्थासारखाच मानला आहे. तरी आपल्याला त्यांनी अर्थसावध होण्यासाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. हे व्यावहारिक शहाणपण शिकण्यासाठी तरी आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे.- प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव