शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

बारावीत नापास विद्यार्थिनीची आत्महत्या तर युवकाने मंदिरातील ध्वजाने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 17:31 IST

उज्ज्वलाचे आई, वडील शेतात कामाला गेले होते तर भाऊ स्वप्नील जैन कंपनीत रात्रपाळीला कामाला गेला होता.

जळगाव : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून उज्ज्वला भगवान अस्वार (21) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यातील शिरसोली, येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  तर दुसऱ्या घटनेत एका मुजर युवकाने मंदिरातील ध्वजाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

उज्ज्वला हिचे आई, वडील शेतात कामाला गेले होते तर भाऊ स्वप्नील जैन कंपनीत रात्रपाळीला कामाला गेला होता. सकाळी तो घरी आला असता बहिणीने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. स्वप्नीलने लागलीच आई, वडीलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर, उज्ज्वला हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. उज्ज्वलाच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे. मात्र, परिक्षेत अपयश आल्याने उज्ज्वलाने हे टोकाचे पाऊल उचललल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. मात्र, उज्ज्वलाच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात आहे.

जळगाव तालुक्यातील वाकडी येथील आनंदा बाजीराव गायकवाड (३२) या तरुणाने गावातील मंदिरातच तेथील ध्वजाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आनंदा गायकवाड हा तरुण मिळेत ते मजुरीचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. गुरुवारी तो कामावरुन घरी न जाता गावातील मंदिरातच गेला व तेथेच झोपला. सकाळी लोकांनी मंदिराच्या भगवा ध्वजाच्या सहाय्यानेच त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने त्याला खासगी डॉक्टरांकडे नेले,मात्र डॉक्टरांना त्यास मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गायकवाड याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालSuicideआत्महत्याJalgaonजळगावPoliceपोलिस