शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

जळगाव व रावेर दोन्ही जागा राष्ट्रीवादीकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 12:08 IST

अजित पवार यांची माहिती

ठळक मुद्देउमेदवारी बाबत अद्याप काहीही ठरलेले नाहीअ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही

जळगाव : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निश्चतच असून राज्यातील ४८ पैकी पुणे, औरंगाबाद, जालना आणि रत्नागिरी या चार जागा सोडल्या तर इतर ४४ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. यानुसार जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडेच राहतील, असा निर्वाळा दिला. तसेच या ठिकाणी उमेदवारी बाबत अद्याप काहीही ठरले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीच्या ‘परिवर्तन’ यात्रेच्या निमित्ताने हे नेते जळगावात शुक्रवारी आले होते. शनिवारी दुपारी चोपड्याकडे रवाना झाले, तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यालयात शनिवारी सकाळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होत. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, राज्य महिलाध्यक्षा फौजिया खान, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महानगर अध्यक्ष नामदेवराव पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी, सविता बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.अजित पवार यांनी सांगितले की, आघाडी झालीच आहे फक्त इतर आणखी कोणत्या पक्षांचा समावेश यात करायचा हे ठरायचे बाकी आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याच्या प्रयत्न असून इतर सोबत येणाऱ्या पक्षांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून त्यांना जागा देतील. दरम्यान खडसे हे भाजपातच असल्याने त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांनाा उमेदवारी देण्याबाबत काहीही विचार करण्याचा प्रश्नच नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी होणाºया चर्चेबाबत दिले.ईश्वरलाल जैन यांचे मत हे पक्षाचे मत नाहीजामनेर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी खासदार यांनी भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या, यासंदर्भात पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जैन यांचे वक्तव्य किंवा मत हे पक्षाचे नसून त्यांचे वैयक्तीक आहे.त्या वक्तव्याला फारसे महत्व नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.बोंड अळीच्या नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करणारबोंड अळीमुळे झालेली नुकसान भरपाई ही देण्यात आली आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली असली तरी जिल्ह्यात अनेकांना ही भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी आपण मंत्रालयात याचा पाठपुरावा करु, असेही अजित पवार यांनी सांगितले.शेवटच्या क्षणी युती होण्याची शक्यताभाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता जरी भांडत असले तरी त्यांना माहीत आहे, की आपण स्वतंत्र लढलो तर काही खरे नाही. यामुळे हे दोन्ही पक्ष ऐन निवडणुकीच्या दरम्यान एकत्र येतील व युती करतील, अशी शक्यता पवार यांनी वर्तवली.आता अनेक घोषणा होतीलयावेळी पवार म्हणाले की, भाजपाचे आतपासूनच चुनावी जुमले सुरु झाले आहेत. वेगवेगळ्या महामंडळांना ७०० कोटी त्यांनी जाहीर केले मात्र अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मान्यता मिळाल्यावरच ते देता येतील परंतु तो पर्यंत आचारसंहिता लागू होईल. यामुळे हे पैसे देतातच येणार नाही. अशाच प्रकारे आता अनेक घोषणा आता होतील.‘ते’ भारतीय कसले- भुजबळभाजपाने मुस्लीम, दलित आदी समाजांचा द्वेषच केला आहे. भारतीय संविधान आणि संस्कृती हे शिकवत नाही, त्यामुळे ते भारतीय कसेले? असा सवालही छगन भुजबळ यांनी करीत भाजपाने या समाजांवर अन्यायच केला असल्याचा आरोप केला.महिला आघाडी मुख्यमंत्र्यांना घुंगरु पाठविणारराज्य सरकाने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानेच राज्यात डान्सबारला न्यायालयाकडून परवानगी दिली असून यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील. सरकार आणि डान्सबारचालक यांची मिलिभगत असल्याचा आरोप करीत याचा निषेध म्हणून महिला आघाडीतर्फे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना कुरिअरने घुंघरु पाठविणार असल्याचे फौजिया खान यांनी पत्रपरिषदेत सांगितले.रावेरची जागा मिळण्याची काँग्रेसला खात्रीजिल्ह्यातील दोन जागांपैकी एकेक जागा दोन्ही पक्षाला मिळाल्यास ते दोन्ही पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर राहील व रावेरची जागा काँग्रससाठीच घेतली जाईल, असे आश्वासन आम्हाला वरिष्ठांनी दिले आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी अजित पवार यांच्या विधानासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना दिली. या जागेसाठी त्यांच्यापेक्षा चांगले उमेदवार आमच्याकडेच असल्याचेही ते म्हणाले.अ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाहीजळगाव लोकसभा मतदार संघासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने विचार केल्यावर आमच्याकडे उमेदवार नाहीत का? असा अर्थ काढला जाणे चुकीचे आहे. अनेकदा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना संधी दिली जाते. त्यानुसारच आमचा हा प्रयत्न आहे. ही उमेदवारी स्वीकारण्याबाबत अ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.आरक्षणाबाबत बनवाबनवी५० टक्के पेक्षा आरक्षण देता येणार नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी मागे म्हटले असताना आता सवर्णांना आरक्षण जाहीर केले आहे, तर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ते न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगत शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही परवानगीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने हा विषयही ताटकळला असल्याचा आरोप पवार यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण