शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशच्या खाद्य संस्कृतीचे वेगळेपण अधोरेखित करणारे पुस्तक ‘दालगंडोरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:17 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात साहित्यिक अशोक कोतवाल लिखित ‘दाल गंडोरी’ या पुस्तकाचा रवींद्र मोराणकर यांनी करून दिलेला थोडक्यात परिचय.

मराठीत स्त्रियांना स्वयंपाकात मार्गदर्शन करणारी काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. परंतु जळगाव येथील साहित्यिक अशोक कोतवाल लिखित ‘दालगंडोरी’ या पुस्तकात खान्देशातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्य पदार्थांबद्दल, त्यांच्या चवीबद्दल, त्यांच्या आस्वादाबद्दल लिखाण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष स्वादाचा अनुभवच येथे शब्दरूपाने अनुभवायला मिळतो. एक वैशिष्ट्य म्हणजे खान्देशातील आगळ्या-वेगळ्या पदार्थांची कृतीही त्यांनी सविस्तर सांगितली आहे. म्हणजे कोणते पदार्थ किती घ्यावेत, ते कसे भाजावेत, पुढे काय करावे हे त्यांनी इतक्या सविस्तरपणे सांगितले की, लेखकाच्या हातचे किंवा त्यांच्या सल्ल्याने हे पदार्थ आपण खाल्लेच पाहिजेत, अशी तीव्र भावना होते. येथे ते त्या पदार्थांच्या स्वादाचे निराळेपण सांगतातच, परंतु संपूर्ण कृतीही (रेसीपी) सांगतात. पदार्थांची चव, त्यांचे अनोखेपण, त्याचे दिसणे, त्याचा गंध, त्याचा स्पर्श अशा विविध अंगांनी तो पदार्थ आपल्या अनुभवाचा विषय होऊन जातो. पुस्तकाच्या प्रारंभीच लेखक म्हणतो की, आपले आयुष्य खाण्यामध्ये तर संपणार नाही ना? या मिष्कील वाक्यापासून सुरू होणारे हे मुक्त गद्य पदार्थांच्या रस, रंग-गंधासह प्रत्यक्ष चवीचा अनुभव देते. प्रत्येक पदार्थाची सामग्री आणि कृतीही सविस्तरपणे दिली आहे. तीही ललित भाषेत वर्णन केली आहे. तांत्रिक भाषेत नाही. खान्देशातील काही पदार्थ फक्त खान्देशातच तयार होणारे आणि त्या मागे काही कहाण्याही आहेत. उदा. फौजदारी डाळ अशीच अपघाताने तयार झालेली आणि पुढे लोकप्रिय झालेली. रस्त्याने येणारा जाणारा एक फौजदार एका घरात शिरतो आणि कोंबडी करण्याची आज्ञा देतो. घरातील पुरुष मंडळी कोंबडी आणायला जातात. कोंबडी मिळत नाही. तेव्हा घरातील बायकांनी आपली प्रतिभा वापरून काही डाळी एकत्र करून डाळ केली. फौजदार तृप्त झाला आणि तेव्हापासून ‘फौजदारी डाळ’ असे नामाभिधान प्राप्त केलेली डाळ अतिशय लोकप्रिय झाली. याशिवाय ‘सातपुडी पाटोड्या’ खाऊन दरोडेखोर कसा तृप्त होतो व दरवर्षी पाटोड्याची खंडणी कशी वसूल करतो याची हकीकतही लेखकाने रंजकपणे मांडली आहे. थोडक्यात, ग्रामीण भागातील मनोविश्वावर प्रकाशझोत टाकणारे ‘दालगंडोरी’ हे पुस्तक महिलावर्गासोबत सर्वांना आपलेसे करेल, असे वाटते.लेखक : अशोक कोतवाल, पृष्ठे : ९८, मूल्य २०० रुपये