शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

आरक्षणाच्या नावावर भाजपची राजकीय दुकानदारी; रोहीत पवार यांची टीका

By सुनील पाटील | Updated: September 2, 2023 14:11 IST

देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा, येत्या ५ सप्टेंबर रोजी शरद पवार यांची जळगावात सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहीत पवार शनिवारी जळगावात दाखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजपला आरक्षण नको आहे, पण आरक्षणाच्या मुद्यावर मात्र राजकारण करायचे आहे. आता केंद्राने पाच दिवसाचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, असेल हिंमत तर याच अधिवेशनात मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी भाजपला दिले आहे. जालन्यात आंदोलकांवर लाठीमार हा गृहमंत्रालयाच्याच आदेशाने झालेला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याला सर्वस्वी जबाबदार असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

येत्या ५ सप्टेबर रोजी शरद पवार यांची जळगावात सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहीत पवार शनिवारी जळगावात दाखल झाले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप व सरकारवर टिका केली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, पालघर जिल्ह्यातील विक्रमगढचे आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. राज्यात ४० टक्केपेक्षा कमी पाऊस आहे. दुबार पेरणीसह पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. शेती मुख्य व्यवसाय असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा आम्ही दुष्काळ जाहिर करण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

जालन्यात आधी पोलिसांकडून लाठीचार्जजालन्यात आधी दगडफेक झाली व नंतर लाठी चार्ज झाला असे सरकार सांगत आहे. आपण आज पहाटे २.३० वाजता जालन्यात जाऊन जे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसले होते, त्यांच्या कुटूंबियांची आपण भेट घेतली. तेथील परिस्थितीची माहिती घेतली. येत्या ८ सप्टेबर रोजी जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघडू शकतो म्हणून मुंबईत महायुतीच्या बैठक सुरु असताना पोलिसांना निरोप आला व त्यांनी  आंदोलनकर्त्यांना उचलले. त्यातून वाद झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली, त्यानंतर दगडफेक झाली. यात छऱ्याचा वापर झालेला आहे. अनेकांच्या छातीत, पोटात व शरीरात छरे आढळून आले. हा कोणता प्रकार आहे. याआधी असा प्रकार कधीच घडलेला नाही. जालन्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नसताना अमानुषपणे लाठीचार्ज होतो. गृहमंत्रालयाच्या आदेशानेच पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. या घटनेचा आपण निषेध करीत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRohit Pawarरोहित पवार