शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

सत्ता गेल्याचे भाजपचे सुतक अजून संपेना....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST

वार्तापत्र महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या भाजपला अवघ्या अडीच वर्षांत सत्तेपासून दूर जावे ...

वार्तापत्र

महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या भाजपला अवघ्या अडीच वर्षांत सत्तेपासून दूर जावे लागले आहे. हा धक्का भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते भाजपमधील सर्व नगरसेवकांना चांगलाच बसला आहे. महापालिकेतील सत्तांतर आला आता महिना झाला असून, अजूनही महापालिकेतील आता विरोधी पक्ष झालेल्या भाजपचे सत्ता गेल्याचे सुतक अजूनही संपलेले दिसून येत नाही. भाजपचे नगरसेवक जणू अज्ञात वासातच गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत नाही. तसेच भाजपमधील नगरसेवक देखील अजूनही सत्ता गेल्याचे दुःख पचवीत घरात आराम ठोकत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. शहरातील अनेक नागरिकांना बेड उपलब्ध होत नसून, बेडसाठी नागरिक वणवण फिरत आहेत. कुठे ऑक्सिजन उपलब्ध नाही तर कोणाला रेमेडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांची मदत करणे सोडत असूनही भाजपचे नगरसेवक दुःखात पूर्णपणे बुडालेले दिसून येत आहेत. महिनाभरात सत्ता गेल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फुटून गेलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी ज्या हालचाली केल्या त्या हालचाली नागरिकांना सुविधा देण्यासाठी केल्या असत्या तर कदाचित सत्तांतराची वेळ भाजपवर आली नसती. असो मात्र आता भाजप विरोधी पक्ष असताना देखील जी जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे, त्या जबाबदारीपासून देखील भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी दूर पडताना दिसून येत आहेत. राज्य पातळीवरून जे विषय येत आहेत तेवढेच विषय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात इतपत काम सध्या भाजपचे पदाधिकारी शहरात करताना दिसून येत आहेत. शहरातील रस्त्यांचा समस्यांसाठी भाजपने ७० कोटी रुपयांचा मनपा फंडातून कामे करण्याबाबत ठराव करून घेतला होता. यासाठी देखील आता कोणताही पाठपुरावा होताना दिसून येत नाही. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जणू महापालिकेवरच बहिष्कार टाकला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा खालावला असतानाही याबाबत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप नगरसेवक शांत बसलेले आहेत, नगरसेवक कैलास सोनवणे काही प्रमाणात किल्ला लढविताना दिसत असले तरी विरोधी पक्ष म्हणून भाजप अजूनही आपली भूमिका बजावताना दिसून येत नाही. केवळ भाजपचेच नाही तर शिवसेना व भाजपमधून फुटून शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांचा गट देखील नागरिकांवर आलेल्या संकटात दूर गेलेला दिसून येत आहे. महापौर जयश्री महाजन या काही प्रमाणात कोरोनाच्या संकटात आपली जबाबदारी पार पाडत असल्या तरी महापालिकेतील नगरसेवक या परिस्थितीत लॉकडाऊन झालेले दिसून येत आहेत. ठरावीक नगरसेवक या परिस्थितीतही काम करत असले तरी ही संख्या कमीच आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शहरातील विकास कामांवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी या समस्येवर मात करून शहरातील विकासाची मंदावलेली गती वाढवण्यासाठी काम करण्याची गरज आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला आता सत्तांतराचे दुःख पचवून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडून शहरातील नागरिकांना न मिळालेल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.