शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भाजप हा आत्मघातकी पक्ष - संजय सावंत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:44 PM

सुरेशदादांच्या मोठेपणामुळे मनसेचा महापौर होवू शकतो तर शिवसेनेचा का नाही?

ठळक मुद्दे‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे दाखवून द्या गाफील न राहता काम करा

जळगाव : भाजपा हा आत्मघातकी पक्ष असून, त्यांच्यापासून सावध राहण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले होते. सुरेशदादा जैन यांनी आपल्या मनाचा मोठेपणा व शहराच्या विकासाच्या दृष्टीने युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपाने आपले मुळ गुणसुत्र दाखवत राजकारण केले. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या निर्णयाची वाट न पाहता स्वबळावर मनपा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले.शहरातील खान्देश कॉम्प्लेक्स मधील कार्यालयात शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय सावंत हे बोलत होते. यावेळी माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, चिमणराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर रमेशदादा जैन, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील तसेच शिवसेनेचे जि.प.सदस्य, पं.स.सदस्य देखील उपस्थित होते.‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे दाखवून द्याविरोधी पक्षाकडून साम, दाम, दंडचा वापर होवून,पैशांचा पाऊस पाडला जाईल. त्यामुळे त्यांच्या भुलथापांना कोणत्याही मतदाराला बळी पडू देवू नका. ‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे विरोधी पक्षाला दाखवून द्या. बाळासाहेब ठाकरेयांच्या शिवसैनिकांनी निश्चिय केलातर काय करू शकतात हे त्यांना दाखवून द्या, ‘एक भुल कमल का फुल’ हे जळगावकरांना पटवून द्या असेही सावंत म्हणाले.आता लढायची वेळ आहे, गाफील न राहता काम करा- आर.ओ. पाटीलमाजी आमदार आर.ओ.तात्या पाटील म्हणाले की, भाजपाची वृत्ती कशी आहे हे ओळखून या निवडणुकीत जोमानेकामकरावे. आता लढायची वेळ असून गाफील न राहता काम करा. माजी महापौर रमेशदादा जैन यांनी देखील निवडणुकीच्या आढावाबाबत माहिती देवून शिवसेनेचाच महापौर होणार असल्याची हमी यावेळी दिली. माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील यावेळी पदाधिकाºयांना मार्गदर्शन केले.अस्तित्वाची लढाई समजणाºयांनाजनता अस्तित्व दाखविणारमनपा निवडणूक ज्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई समजली आहे. त्यांना जळगावची जनता निवडणुकीनंतर आपले अस्तित्व दाखवून देईल असा इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पत्रपरिषदेत बोलताना दिला.पत्रपरिषदेस सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, कि शोर पाटील, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, चिमणराव पाटील, माजी महापौर रमेशदादा जैन, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक जितेंद्र मुंदडा आदी उपस्थित होते.पत्रपरिषदेत सावंत म्हणाले की, निवडणुकीआधी युतीबाबत सुरेशदादा जैन, रमेशदादा जैन यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपाने प्रतिसाद दिला नाही. शिवसेनेची तयारी पूर्ण होती. त्यानुसार आम्ही मैदानात उतरले असून जळगावकर शिवसेनेला साथ देतील.मनपावर शिवसेनेचा भगवा फडकविणारचसंजय सावंत बैठकीत म्हणाले की, सुरेशदादा जैन यांनी पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण घराघरात जायला हवे यासाठी यंदा खान्देश विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक न लढविता शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेनेवर टाकलेला हा विश्वास सर्व शिवसैनिकांनी सार्थ ठरवायचा असून, ३ आॅगस्टला मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवून जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचा पहिला महापौर बसविण्यासाठी मनापासून व पूर्ण ताकदीने प्रयत्न करावे, असे आवाहनही संजय सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले.कार्यकर्त्यांनी दिवस रात्र काम करावे !खान्देश विकास आघाडीचे मनपात वर्चस्व आहे.मनसेचे केवळ ११ नगरसेवक असताना सर्वांना सोबत घेत शहराच्या विकासासाठी सुरेशदादा जैन यांनी मनसेचा महापौर मनपात बसविला. सुरेशदादा यांनी शिवसेनेचाच महापौर बनविण्याचा आता चंग मनाशी बांधला असून, आता रात्र-दिवस विसरुन पक्षासाठी वेळ काढून प्रत्येक प्रभागात शिवसेनेसाठी काम करा असे आवाहन संजय सावंत यांनी केले.निष्ठावंतांना शिवसेना कधीही डावलत नाहीकोणत्याही निष्ठावंत उमेदवाराला डावलले नसून, शिवसेना निष्ठावंतांना न्याय देणारा पक्ष असल्याचेही सावंत म्हणाले. तसेच खान्देश विकास आघाडी ही देखील शिवसेनेची होती. सुरेशदादा जैन यांनी शहराचा विकासालाच महत्व देवून या आघाडीमध्ये इतर विचारांच्या उमेदवारांना घेतले होते. त्यामुळे खाविआ किंवा शिवसेना वेगवेगळे असे नव्हतेच. पक्षाचे चिन्ह आता घरोघरी जावे यासाठीच यंदा धनुष्यबाणावरच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही सावंत यांनी पत्रपरिषदेत दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव