शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

भाजप शासन सत्तेला लागलेली बोंडअळी : संग्राम कोते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:54 IST

राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.

ठळक मुद्देजामनेरला युवक कार्यकारिणी घोषितसत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करण्याचे आवाहनभाजपाकडून सत्तेचा होतोय दुरूपयोग

जामनेर : राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.जामनेर येथील मंगल कार्यालयात झालेल्या युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील होते. संग्राम पाटील यांनी सांगितले की, राज्यात सर्वत्र सत्तेचा दुरुपयोग होत आहे. तालुक्यात त्याचे प्रमाण जास्तच आहे. बुथकमेटी हा सत्ता प्राप्तीचा राजमार्ग असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांनी सांगितले की, मंत्री गिरीष महाजनांनी चार वर्षात तालुक्यात एकही नवीन सिंचन प्रकल्प आणला नाही. जिल्हा युवक अध्यक्ष ललित बागुल, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची भाषणे झाली.यावेळी युवक तालुकाध्यक्षपदी शैलेश पाटील, शहर अध्यक्षपदी कृष्णा माळी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. व्यासपीठावर भगवान पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, डिगंबर पाटील, युनुस खान, जावेद मुल्लाजी, प्रमोद पाटील, नाना पाटील, अभिषेक पाटील, कल्पिता पाटील, पप्पु पाटील, पुजा भडांगे, बंगालसिंग चितोडीया, अनिस पठाण, प्रल्हाद बोरसे, मनीषा पाटील, मिना शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचलन किशोर पाटील यांनी तर आभार सुनिल पाटील यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव