शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

भाजप शासन सत्तेला लागलेली बोंडअळी : संग्राम कोते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:54 IST

राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.

ठळक मुद्देजामनेरला युवक कार्यकारिणी घोषितसत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करण्याचे आवाहनभाजपाकडून सत्तेचा होतोय दुरूपयोग

जामनेर : राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.जामनेर येथील मंगल कार्यालयात झालेल्या युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील होते. संग्राम पाटील यांनी सांगितले की, राज्यात सर्वत्र सत्तेचा दुरुपयोग होत आहे. तालुक्यात त्याचे प्रमाण जास्तच आहे. बुथकमेटी हा सत्ता प्राप्तीचा राजमार्ग असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांनी सांगितले की, मंत्री गिरीष महाजनांनी चार वर्षात तालुक्यात एकही नवीन सिंचन प्रकल्प आणला नाही. जिल्हा युवक अध्यक्ष ललित बागुल, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची भाषणे झाली.यावेळी युवक तालुकाध्यक्षपदी शैलेश पाटील, शहर अध्यक्षपदी कृष्णा माळी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. व्यासपीठावर भगवान पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, डिगंबर पाटील, युनुस खान, जावेद मुल्लाजी, प्रमोद पाटील, नाना पाटील, अभिषेक पाटील, कल्पिता पाटील, पप्पु पाटील, पुजा भडांगे, बंगालसिंग चितोडीया, अनिस पठाण, प्रल्हाद बोरसे, मनीषा पाटील, मिना शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचलन किशोर पाटील यांनी तर आभार सुनिल पाटील यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव