शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भुसावळात गँगवार, भाजप नगरसेवकासह कुटुंबातील चार जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 06:29 IST

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले सह भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

भुसावळ (जि.जळगाव) : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर त्यांच्या निवासस्थानी अज्ञातांकडून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन जणांचा जागीच तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हल्लेखोर कोण आहेत, हे मात्र अजून समजू शकलेले नाहीत.

रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर आज रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या अंगणात येऊन अंदाधुंद गोळीबार केला. यात त्यांचे बंधू भाऊ सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) ठार झाले आहेत. गोळीबारानंतर जखमी रवींद्र खरात यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेत त्यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा रितेश याच्यासह अन्य एक असे चार जण गंभीर जखमी आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले सह भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी एकच धावपळ केली. या प्रकरणातील रवींद्र खरात याच्यावर पूर्वी काही गुन्हे आहेत. त्याच्यावर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई देखील झालेली होती.

राज अख्तर खान व राजा मोघे, मयुर सुरवाडे या तिघांसह चौघांनी हल्ला केल्याचे रवींद्र खरात यांचा मुलगा रितेश याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपीना ताब्यात घेतले असून ते देखील जखमी झाले आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळMurderखूनCrime Newsगुन्हेगारी