शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

मेहरूण तलावातील जैव विविधता बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 13:03 IST

अजय पाटील । जळगाव : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे पर्यावरणात फार मोठे बदल झालेले पहायला मिळत ...

अजय पाटील ।जळगाव : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे पर्यावरणात फार मोठे बदल झालेले पहायला मिळत आहेत. प्रदूषणाचा स्तर कमी होऊन वन्यप्राण्यांचाही वावर आता सर्वत्र होताना दिसू लागला आहे. शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाच्या ठिकाणीही मानवी वावर कमी झाल्याने तलावातील जैव विविधता आता बहरू लागली आहे.कधीकाळी मेहरूण तलाव परिसरात पट्टेदार वाघांचेही अस्तित्व होते. मात्र, काही वर्षांपासून जळगाव शहराचे वाढत जाणारे क्षेत्र, तलाव परिसरात होणारे अतिक्रमण, तलावात आजूबाजुच्या भागातील घरांचे जाणारे सांडपाणी व तलाव परिसरात वाढत जाणारा मानवी वावर यामुळे तलावातील समृध्द जैव विविधता धोक्यात आली आहे. विदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन असलेल्या मेहरूण तलावात काही वर्षांपासून पक्ष्यांचेही आगमन कमी होऊ लागले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून मानवी जीवनावर कोरोना सारख्या आजाराने घातक परिणाम केला असताना, कोरोनामुळे मेहरूण तलाव भागात मानवी वावर कमी झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांचे थवेच्या थवे मेहरूण तलाव परिसरात आढळून येत आहेत. यासह फुलापाखरांचा वावर मेहरूण तलाव परिसरात वाढला आहे. यासह मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने तलावातील मासेमारीदेखील थांबली आहे. त्यामुळे ५ प्रकारचे मासे सापडणाऱ्या माशांनाही यामुळे जीवदान मिळत आहे. जिल्ह्यासह शहराच्या दृष्टीनेदेखील मेहरूण तलावाचे मोठे महत्त्व आहे. तलाव परिसरातील जैव विविधता लक्षात घेता भविष्यात या ठिकाणी रिसर्च सेंटर सुरू करता येऊ शकते. यासह मनपाकडून या परिसरात बटरफ्लाय गार्डनदेखील प्रस्तावित आहे. पर्यावरणप्रेमींसाठी हे अभ्यासासाठी विद्यापीठ ठरू शकते.मानवी वावर कमी झाल्याने फायदा- मेहरुण तलावाच्या ६२ हेक्टरमध्ये एकेकाळी ५८ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आज प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे नष्ट होत आहे. येथे १५ ते २० सर्पांच्या प्रजातींचा अधिवास आहे. ४० प्रकारची फुलपाखरे, ११८ प्रकारचे विविध किटक , २३ प्रकारच्या गवताळ वनस्पती, ५ प्रकारचे मासे यांचा तलावावर अधिवास आहे़ शेकडो पान वनस्पतींचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.- तलावाकाठावर गुरांना धुण्यासाठी येणाºयांचेही प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण थांबले आहे. मात्र, अजूनही आजूबाजुच्या परिसरातून सांडपाणी थेट तलावात जात आहे. यावर बंदोबस्त केला तर जलप्रदूषणदेखील थांबणार आहे. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.तरुण मुलांची संख्या मेहरूण तलावात अधिक असायची, त्यात अनेक युवक तलावात दगडदेखील मारायचे यामुळे पक्ष्यांना हा अधिवास धोकेदायक वाटू लागत होता. मात्र,आता मानवी वर्दळ कमी झाल्याने त्याचा परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर झाला आहे. भविष्यात याच प्रकारे वर्दळ कमी झाली तर जैव विविधता आणखीन बहरू शकते.-राजेंद्र गाडगीळ,पक्षी निरीक्षकलॉकडाउनमुळे जैव विविधता बहरली असली तरी हे केवळ लॉकडाउनच्या काळापुरतीच राहील, आता लॉकडाउनमुळे जी जैव विविधता बहरली आहे. ती कायम वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तलावात येणारे सांडपाणी रोखणे गरजेचे आहे. तसेच तलाव परिसरात वाहनांना बंदी घालावी यामुळे भविष्यातही ही जैव विविधता कायम राहिल.-सुजाता देशपांडे, अध्यक्षा, भारती फाउंडेशन.

टॅग्स :environmentपर्यावरणJalgaonजळगाव