शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भुसावळ-जळगाव चौथ्या रेल्वे मार्गाचे काम ७० टक्के पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 10:04 IST

Bhusawal-Jalgaon railway line : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वे, रस्ते व शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प लोकसभा निवडणुकांपूर्वी पूर्ण करण्याचे ठरविले आहे.

जळगाव : गेल्या वर्षी जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर, भुसावळरेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भुसावळ दरम्यान पुन्हा चौथ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२२ पर्यंत या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या निर्माण विभागातर्फे देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वे, रस्ते व शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प लोकसभा निवडणुकांपूर्वी पूर्ण करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रात असे एक लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आहेत. यामध्ये भुसावळ रेल्वे विभागातील भुसावळ-जळगाव तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचा समावेश आहे. मात्र, हा प्रकल्प गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पूर्ण झाला असून, या तिसऱ्या मार्गांवरून रेल्वेची वाहतुकही सुरू झाली आहे. 

रेल्वे मार्गाचा हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते जळगाव दरम्यान गेल्या वर्षापासून चौथ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने २. ६१ कोटींचा निधी मंजुर केला असून, आतापर्यंत १. ८० कोटींचा खर्च या कामावर झाला आहे.

डिसेंबर पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्टरेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव ते भुसावळ या चौथ्या रेल्वे मार्गातील जळगाव ते भादली दरम्यान कामाला सुरूवात करण्यात आली होती. हे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तर भादली ते भुसावळ दरम्यानही ५० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होऊन, संपूर्ण हा रेल्वे मार्ग डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या वर्षी जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर, आता जळगाव ते भुसावळ दरम्यान पुन्हा चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत हा मार्गही पूर्ण करण्याचे नियोजन आहे.- पंकज डावरे, उप मुख्य अभियंता, रेल्वे निर्माण विभाग

टॅग्स :Jalgaonजळगावrailwayरेल्वेBhusawalभुसावळ