शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर घेतली भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 15:15 IST

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीत प्रगती केल्याचे राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले रुईखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ठळक मुद्देबारावीनंतर वळलो शेतीकडेउद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले शेतकरी चंद्रशेखर बढे यांची मुलाखत

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीत प्रगती केल्याचे राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले रुईखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.येत्या १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘उद्यान पंडित’ पुरस्कार देण्यात येणार आहे. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : शेती या व्यवसायाकडे तुम्ही कसे वळले? आणि यामध्ये तुम्हाला आवड कशी निर्माण झाली?उत्तर : वयाच्या विसाव्या वषार्पासून मी शेती करायला सुरुवात केली आमच्याकडे 17 एकर पारंपारिक शेती होती व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास मी सुरुवातीपासूनच प्रवृत्त झालो.नवनिर्मितीची कल्पना व आधुनिक तंत्रज्ञान यांच्या बळावर शेतीत फार मोठी भरारी घेता येऊ शकते हा मला विश्वास होता म्हणुन बारावीचे शिक्षण झाल्यानंतर आणि शेती व्यवसायाकडे वळले.प्रश्न : आधुनिक तंत्रज्ञान व शेतीतील नवनवीन प्रयोग करण्यासाठी तुम्ही स्वत: कोणते प्रयत्न केले?उत्तर : मूळातच शेती हा माझा आवडता विषय असल्याने मी अनेक कृषी मेळावे कृषी चर्चासत्र परिसंवाद ह्यात मी स्वत: सम्मिलित होऊन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं व बाजारपेठेची गरज लक्षात घेता पीक पद्धतीमध्ये कशा प्रकारचे बदल केले जावे याचे मी तंत्रज्ञान यातून शिकलो. भारतातील विविध कृषी विद्यापीठे व संस्था तसेच संशोधन केंद्रांना देखील मी स्वत: भेटी देऊन विविध प्रयोगातून यशाचे शिखर काबीज केले आहे.प्रश्न : हळद आणि आले या पिकांकडे तुम्ही कशा प्रकारे ओढले गेले?उत्तर : हळद आणि आले हे चांगला पैसा देणारे पीक आहे त्या काळात जळगाव जिल्ह्यात कोणीही आनंदाची किंवा आल्याची लागवड विशेषत: करत नसेल मी स्वत: नांदेड भागात जाऊन हळदीची माहिती घेतली व सर्वात प्रथम हळदीचे बेणे मुक्ताईनगरला रुईखेडा क्षेत्रामध्ये आणून लागवड केली त्यासाठी सेलम ही जात निवडली चांगले उत्पादन घेतले परंतु ओली हळद विकल्या गेल्याने त्यावर घरीच प्रक्रिया करून मला ती विकावी लागली. त्यातून चांगला नफा मिळाला व शेतकº्यांसमोर पारंपरिक पिकांपेक्षा एक वेगळा पर्याय उभा केला. त्यासाठी गांडूळ खत, शेणखत, लेंडीखत व जैविक तंत्रज्ञान या वापरासोबतच हा भाग दुष्काळी असल्याने व हळदीसाठी कमी पाणी लागत असल्याने खर्चदेखील माझा निम्म्यावर आलेला होता व हीच बाब आल्यासाठी सुद्धा लागू पडली. हळद आणि आल्या सोबतच बाजारपेठेची गरज लक्षात घेत सिताफळ व शिमला मिरचीची शेती करून तीदेखील आपण यशस्वी केली आहे.प्रश्न : पॉलिहाऊस या संकल्पनेबद्दल काय सांगाल?उत्तर : खऱ्या अथार्ने पॉलीहाऊस ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रातील आहे २०१४ मध्ये मी पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध भागात जाऊन माहिती घेऊन माझ्या शेतीमध्ये पॉलिहाऊस उभारले व त्यामध्ये शिमला मिरची गुन्हा टमाटे काकडी यासारखी भरघोस पिके घेऊन उत्पन्न मिळवले मुक्ताईनगरमध्ये हे तंत्रज्ञान यशस्वी करून दाखवण्यासाठी सालबर्डी, कोथळी, मुक्ताईनगर अंतुलीं या भागात पॉलिहाऊसची उभारणी करण्यात मी स्वत: शेतकºयांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये अत्यंत उष्ण वातावरण व पाण्याची कमतरता अशा अनेक संकटांवर मात करून पॉलिहाऊस हे यशस्वी उत्पादन देते हे माझ्या प्रयोगाने सिद्ध केले आहे.प्रश्न : गुलाबाची शेती हा देखील एक नवीनच प्रयोग याची सुरुवात कशी झाली?उत्तर : २०१४-१५ ला मी शेतीविषयक मासिक वाचत असताना गुलाब शेती हा विषय माझ्या मनात आला. त्याच वर्षी मी शेतात पॉली हाउसची निवड करत त्यात गुलाबाची शेती करायला सुरुवात झाली. केवळ पाच महिन्यांनंतरच मला गुलाबाच्या शेतीतून उत्पादन मिळायला सुरुवात झाली. ही फुले मी नागपूर इंदूर, मध्य प्रदेश येथील मार्केटला पाठवले. गुलाब पिकांमधून मला साधारणपणे वर्षाकाठी चार लाख फुले मिळतात आणि प्रति फूल तीन ते चार रुपये प्रति फूल याप्रमाणे वर्षाकाठी मला गुलाबापासून जवळपास बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळते. थोडीशी काळजी घेणे या शेतीसाठी महत्त्वपूर्ण आहे मात्र त्यातून उत्पादन नक्कीच मोठ्या प्रमाणावर मिळते.प्रश्न : उद्यान पंडित पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्ही शेतकºयांना काय संदेश द्याल?उत्तर : शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय असून शेतीतूनच आधुनिक तंत्रज्ञान व नवनवीन संकल्पना राबवून आपण स्वत:चा विकास करू शकतो. कमी पाणी आणि जास्त उत्पादन हे तंत्रज्ञान प्रत्येकाने वापरले पाहिजे माज्या अनुभवाचा फायदा मी परिसरातील शेतकºयांना करून दिला आहे. मिरची आणि गुलाब उत्पादनासाठी शेतकºयांचा स्वत:च एक ग्रुप तयार करून माहितीची देवाणघेवाण आम्ही करत असतो. अर्धा एकर मध्ये कृषी विभागाच्या साह्याने शेततळे मी बांधून घेतली. त्याची क्षमता सात लाख लीटर पाण्याची आहे. त्यामध्ये पाणी माझ्या शेतीसाठी दोन ते तीन महिने पुरवले जाते. अशाप्रकारे आधुनिक शेतीचा पर्याय स्वीकारून शेतकºयांनी शेतीसोबतच स्वत:लाही समृद्ध करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :interviewमुलाखतMuktainagarमुक्ताईनगर