शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

आपल्यातली नकारात्मकता काढून आनंदी रहा - अभिनेत्री नयना आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:38 IST

‘लोकमत’शी संवाद

जळगाव : स्पर्धेत कायम टिकून राहण्यासाठी चिकाटी आणि धीर हवा. प्रलोभनाच्या मागे धावू नका, हे आभासी जग आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या संधी शोधा. कामाला कमतरता नाही. पण संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. आपल्यातली नकारात्मकता काढून आनंदी रहा, असे मत ख्यातनाम अभिनेत्री नयना आपटे यांनी व्यक्त केले आहे. ७४ मराठी नाटके, २५ हून अधिक मराठी चित्रपट, विविध मालिका तसेच हिंदी, मराठी, गुजराथी रंगभूमी गाजवलेल्या पद्मश्री प्राप्त ज्येष्ठ कलावंत नयना आपटे या नुकत्याच ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘सुनेच्या राशीला सासू’ या नाटकाच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या. त्यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : आपण या क्षेत्रात कशा आल्याआपटे : आई शांता आपटे उत्तम अभिनेत्री आणि गायिका. आईनेच केलेल्या नाटकात सुरुवातीला बालकलावंत म्हणून वयाच्या चवथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. तिच माझी पहिली गुरू. तिच्याच इच्छेने कलेच्या प्रांतात आवड निर्माण होऊन याच क्षेत्राशी जोडले गेले.प्रश्न : वय वर्षे ४ ते आजतागयातच्या प्रवासा विषयी ?आपटे : कलेच्या प्रांतात करीअर करायच ठरवल्याने हा प्रवास सुखावणारा आहे. नकळत्या वयात रंगभूमीवर पदार्पण केले. विविध भूमिका साकारल्या. नृत्याचे शिक्षण पं.रोहिणी भाटे यांच्याकडून घेतले. घरातच गाणं असल्याने आईकडून गाणे शिकलो. नाटक, चित्रपट करत असतांना अनेक दिग्गज कलाकारांसमवेत भूमिका करायला मिळाल्या.उत्तम दिग्दर्र्शक लाभल्याने या प्रवासात खूप शिकायला मिळाले. अजूनही शिकत आहे.प्रश्न : एक कलावंत आणि एक गृहिणी यांचा मेळ कसा घालतात ?आपटे : कुटुंबाची मला पूर्ण साथ आहे. कला आणि कुटुंब यांचा सुंदर ताळमेळ साधते. प्रयोग संपल्यावर लगेचच मेकअप उतरून काही मिनीटात बाहेर पडते. घरी माझी मंडळी वाट पहात आहेत याची सतत जाणीव असते. पार्टी, लग्न, समारंभ यात जास्त जायला आवडत नाही. घरी असले की भाजी पोळी, वरण-भात, कोशिंबीर सगळं हाताने करते. गुळ टाकून केलेली पुरणपोळी मला छान करता येते. सकाळी ४ ला मला जाग येतेच. मग योगा, गाण्याचा रियाज, फिरायला जाणे नियमाने करते.सखींना काय सांगाल ? आणि सुनेच्या राशीला सासू नाटकाबद्दल ?भरपूर वाचन करा, वाचनाने विचारांची प्रगल्भता वाढते. चागलं ऐका, बोला पण कुणाशी ? तर बुद्धीमान लोकाशी. ते एखादा विषय कसा मांडतात त लक्षपूर्वक ऐका. आपलं आयुष्य आनंदी राहण्यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच प्रामुख्यानं आपल मानसिक अन शारीरिक आरोग्य आपल्यातील नकारात्मका काढून टाकत आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आहे.सध्याच्या मुला-मुलींना काय सांगू इच्छिता ?अभिनय, गाण, नृत्य अथवा कोणतीही कला ही उपजत असली तरी गुरूकडे राहून आत्मसाथ केली जावी. सध्या मुल रिअ‍ॅलिटी शो मधून बक्षीस मिळवून रातोरात स्टार होतात. पण या स्पर्धेत कायम टिकून राहण्यासाठी चिकाटी हवी, धीर हवा, प्रलोभनाच्या मागे धावू नका, हे आभासी जग आहे. मुंबर्ईचेच स्वप्न न पाहता आपल्या आजूबाजूला असणाºया संधी शोधा. कामाला कमतरता नाही. पण संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. प्रयोग उत्तम होण्यासाठी प्रेक्षकांचीही जबाबदारी असते.नाटक कसे करावे, याचे जसे शिबिर असते. तसेच नाटक कसे बघावे, यासाठीही शिबिर घ्यायला हवीत. - नयन आपटे

टॅग्स :Jalgaonजळगाव