शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘कोरोना’ काळात मिळतोय योगाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 22:00 IST

डिगंबर महाले । अमळनेर : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची खूपच गरज आहे. एवढेच नाही तर ज्यांना हा आजार झाला ...

डिगंबर महाले ।अमळनेर : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची खूपच गरज आहे. एवढेच नाही तर ज्यांना हा आजार झाला आहे, त्यांना या आजारातून बरे होण्यासाठीही योगासनांचीही मोठी मदत होत आहे.येथे योगाचा हा लाभ चांगला घेतला जात आहे. एवढेच नाही तर यापूर्वीही अनेक वर्षांपासून येथे योग चळवळ चांगली रुजली आहे. पतंजली योग समितीची स्थापना ५ जानेवारी २०१० ला झाल्यापासून ते आजपर्यंत समितीने शहर आणि ग्रामीण भागामध्ये योगाचा प्रचार आणि प्रसाराचे जोमदार कार्य केलेले आहे.वॉर्डावॉर्डात जाऊन योग वर्ग सुरू करणे, महिलांसाठी स्वतंत्र योग वर्ग सुरू करणे आदींवर समितीचा अधिक भर राहिलेला आहे. शहरात नवीन नवीन ठिकाणी नवीन ग्रुप तयार होत आहेत. त्या ग्रुपला जाऊन भेटणे आणि त्या ठिकाणी योग वर्ग सुरू करणे हे काम समितीने अतिशय उत्तम पद्धतीने सुरू केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील समिती विशेष जनजागृती करीत आहे. कोरोनापासून लांब राहायचे असेल, कोरोनामुक्ती हवी असेल तर योग किती आवश्यक आहे याबाबतदेखील समितीचे कार्य सुरू आहे.दिलीप बहिरम यांची१३ वर्षांपासून मोफत सेवायेथील सेवानिवृत्त शिक्षक दिलीप बहिरम हे गेल्या १३ वर्षांपासून अव्याहतपणे योग शिक्षक म्हणून सेवारत आहेत. कोणताही मोबदला न घेता ते ही सेवा देत आहेत. सात वर्ष त्यांनी मराठा मंगल कार्यालयात अनेकांना योगाचे धडे दिले आहे. आता गेल्या सहा वर्षांपासून ते समर्थ नगर मधील दत्त मंदिर येथे योग शिक्षक म्हणून सेवारत आहेत. रोज सकाळी सव्वापाच ते सव्वासहा असा एक तास अनेक स्त्री-पुरुष एकत्रितरीत्या त्यांच्याकडून योगाचे धडे घेतात. प्रारंभी वार्म-अप त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम, टप्प्याटप्प्याने चार वेळा सूक्ष्म व्यायाम, टप्प्याने दोनदा कपालभाती व दोनदा अनुलोम विलोम, सर्व अवयवांचे व्यायाम, शवासन, टाळ्या, हास्यासन, आणि शेवटी १५ सूर्यनमस्कार असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो. गेली १३ वर्षे हे कार्य सुरू असून क्वचितच बाहेर गावी गेले तरच त्यांच्या सेवेत खंड पडतो अन्यथा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये अव्याहत रित्या ते योग प्रशिक्षण सेवा देत आहेत. सध्या कोरोनामुळे मात्र निर्बंध आले आहे.