शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादकांचा रावेर तालुका कृषी अधिकाऱ्याविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:32 IST

केळी उत्पादन घेणाºया रावेर तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या शासन योजना पोहोचवून त्यांच्या व्यथा वेदना जाणून थेट शासनापर्यंत पोहचवण्यासाठी असलेले तालुका कृषी अधिकारी पद मात्र वर्ष दीड वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे शासनाने केळी उत्पादक शेतकरी वाºयावर सोडल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरावेर : एक ते दीड वर्षापासून सुरू आहे ‘प्रभारी राज’जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या केळी उत्पादकांचा तालुका कृषी अधिकारी विना वाºयावर

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : जागतिक वातावरणाच्या बदलात केळीबागा जगवणे व टिकवणे व शाश्वत उत्पादन घेणे हे एक कडवे आव्हान पेलत तावून सुलाखून निघत व्यापारीवर्गाच्या नफेखोरीला बळी पडत असलेला केळी उत्पादक हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा मानला जातो. मात्र असे असले तरी केळी उत्पादन घेणाºया रावेर तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या शासन योजना पोहोचवून त्यांच्या व्यथा वेदना जाणून थेट शासनापर्यंत पोहचवण्यासाठी असलेले तालुका कृषी अधिकारी पद मात्र वर्ष दीड वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे शासनाने केळी उत्पादक शेतकरी वाºयावर सोडल्याचे चित्र आहे.शासनाच्या तालुका कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी पदावरील सुधाकर एस. पवार यांची दीड वर्षांपूर्वी बदली झाल्यापासून या पदावर प्रभारी कार्यभार वाहिला जात आहे. त्यांच्या बदलीनंतर प्रभारी तालुका कृषी अधिकारी म्हणून रूजू झालेले मंडळाधिकारी एस.आर.साळुंखे सेवानिवृत्त झाले. त्यांच्यानंतर आता मंडळाधिकारी एम.आर.भामरे यांनी पदभार स्वीकारला आहे.रावेर तालुक्यात सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली असते. दरम्यान, काही प्रयोगशील शेतकरी डाळींब, पेरू फळबागांसह हळद, अद्रक मसाले पिकांचे उत्पादन घेतात. जागतिक पर्यावरण बदलाचा फटका दिवसेंदिवस केळी उत्पादनाला बसत आहे. केळी उत्पादन हे कमालीचे संवेदनशील झाले आहे. लागवडीपासून कुक्कूंबर मोझॅक व्हायरस असो हिवाळ्यातील कमी तापमानाचा फटका असो, विषम व दमट हवामानातील करपा वा चरका असो तथा अति उष्ण तापमानात होरपळणाºया केळीबागांचा प्रश्न असो. केळी उत्पादनाला कडवे आव्हान देणाºया या संकटात शेतकºयांना आधार ठरणारी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत मिळणाºया संरक्षित विम्याच्या रकमेपासून वंचित राहण्याचे संकट शेतकºयांवर घोंघावत आहे. असे असताना मात्र शासन व शेतकरीवर्गाचा दुवा असलेला सक्षम तालुका कृषी अधिकारी तालुक्याला नसल्याने केळी उत्पादक वाºयावर सुटला आहे.तालुक्यातील केळी उत्पादकांसह लोकप्रतिनिधींची हवामानावर आधारित फळपीक विमा योजना शेतकरी हिताची नव्हे तर विमा कंपन्यांची गल्लाभरू योजना असल्याचे निर्णायक मत प्रशासकीय पातळीवरून शासनस्तरावर पोहचवून तत्संबंधी तगादा लावण्यासाठी सक्षम तालुका कृषी अधिकारी नियुक्त होण्याची गरज आहे. मात्र असे असताना मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची विदारक स्थिती आहे. तत्संबंधी, जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.जिल्ह्याच्या अर्थकारणाचा पाया असलेल्या केळी उत्पादकांच्या रावेर तालुक्याला सक्षम तालुका कृषी अधिकारी नसल्याने तालुक्यातील केळी उत्पादकांच्या जीवनमरणाच्या समस्या आ’वासून आहेत. तत्संबंधी शासनाने तातडीने तालुका कृषी अधिकारी नियुक्त करून केळी उत्पादकांच्या समस्यांना वाचा फोडण्याची गरज आहे.-अमोल गणेश पाटील, केळी उत्पादक शेतकरी, केºहाळे बुद्रूक, ता.रावेर

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर