शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

केळी उत्पादकांचा रावेर तालुका कृषी अधिकाऱ्याविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:32 IST

केळी उत्पादन घेणाºया रावेर तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या शासन योजना पोहोचवून त्यांच्या व्यथा वेदना जाणून थेट शासनापर्यंत पोहचवण्यासाठी असलेले तालुका कृषी अधिकारी पद मात्र वर्ष दीड वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे शासनाने केळी उत्पादक शेतकरी वाºयावर सोडल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरावेर : एक ते दीड वर्षापासून सुरू आहे ‘प्रभारी राज’जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या केळी उत्पादकांचा तालुका कृषी अधिकारी विना वाºयावर

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : जागतिक वातावरणाच्या बदलात केळीबागा जगवणे व टिकवणे व शाश्वत उत्पादन घेणे हे एक कडवे आव्हान पेलत तावून सुलाखून निघत व्यापारीवर्गाच्या नफेखोरीला बळी पडत असलेला केळी उत्पादक हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा मानला जातो. मात्र असे असले तरी केळी उत्पादन घेणाºया रावेर तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या शासन योजना पोहोचवून त्यांच्या व्यथा वेदना जाणून थेट शासनापर्यंत पोहचवण्यासाठी असलेले तालुका कृषी अधिकारी पद मात्र वर्ष दीड वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे शासनाने केळी उत्पादक शेतकरी वाºयावर सोडल्याचे चित्र आहे.शासनाच्या तालुका कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी पदावरील सुधाकर एस. पवार यांची दीड वर्षांपूर्वी बदली झाल्यापासून या पदावर प्रभारी कार्यभार वाहिला जात आहे. त्यांच्या बदलीनंतर प्रभारी तालुका कृषी अधिकारी म्हणून रूजू झालेले मंडळाधिकारी एस.आर.साळुंखे सेवानिवृत्त झाले. त्यांच्यानंतर आता मंडळाधिकारी एम.आर.भामरे यांनी पदभार स्वीकारला आहे.रावेर तालुक्यात सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली असते. दरम्यान, काही प्रयोगशील शेतकरी डाळींब, पेरू फळबागांसह हळद, अद्रक मसाले पिकांचे उत्पादन घेतात. जागतिक पर्यावरण बदलाचा फटका दिवसेंदिवस केळी उत्पादनाला बसत आहे. केळी उत्पादन हे कमालीचे संवेदनशील झाले आहे. लागवडीपासून कुक्कूंबर मोझॅक व्हायरस असो हिवाळ्यातील कमी तापमानाचा फटका असो, विषम व दमट हवामानातील करपा वा चरका असो तथा अति उष्ण तापमानात होरपळणाºया केळीबागांचा प्रश्न असो. केळी उत्पादनाला कडवे आव्हान देणाºया या संकटात शेतकºयांना आधार ठरणारी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत मिळणाºया संरक्षित विम्याच्या रकमेपासून वंचित राहण्याचे संकट शेतकºयांवर घोंघावत आहे. असे असताना मात्र शासन व शेतकरीवर्गाचा दुवा असलेला सक्षम तालुका कृषी अधिकारी तालुक्याला नसल्याने केळी उत्पादक वाºयावर सुटला आहे.तालुक्यातील केळी उत्पादकांसह लोकप्रतिनिधींची हवामानावर आधारित फळपीक विमा योजना शेतकरी हिताची नव्हे तर विमा कंपन्यांची गल्लाभरू योजना असल्याचे निर्णायक मत प्रशासकीय पातळीवरून शासनस्तरावर पोहचवून तत्संबंधी तगादा लावण्यासाठी सक्षम तालुका कृषी अधिकारी नियुक्त होण्याची गरज आहे. मात्र असे असताना मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची विदारक स्थिती आहे. तत्संबंधी, जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.जिल्ह्याच्या अर्थकारणाचा पाया असलेल्या केळी उत्पादकांच्या रावेर तालुक्याला सक्षम तालुका कृषी अधिकारी नसल्याने तालुक्यातील केळी उत्पादकांच्या जीवनमरणाच्या समस्या आ’वासून आहेत. तत्संबंधी शासनाने तातडीने तालुका कृषी अधिकारी नियुक्त करून केळी उत्पादकांच्या समस्यांना वाचा फोडण्याची गरज आहे.-अमोल गणेश पाटील, केळी उत्पादक शेतकरी, केºहाळे बुद्रूक, ता.रावेर

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर