शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाटणादेवी येथे नवसफेडीवर बंदी, पर्यावरणदिनापासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:54 IST

कायदा मोडणा-यांवर गुन्हे दाखल करणार

ठळक मुद्देपरिसराचे पर्यावरण दूषितकारवाई करणार

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. १६ - चाळीसगाव शहरापासून अवघ्या १६ किमी अंतरावर दक्षिणेला असणा-या गौताळा अभयारण्यातील पाटणादेवी मंदिर परिसरात ‘नवसफेडी’वर येत्या पर्यावरणदिनापासून (५ जून) बंदी आणण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.बी. पटवर्धन यांनी दिली. हा निर्णय पाटणादेवी परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्याबरोबरच वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.सातमाळा डोंगर रांगांच्या पायथ्याशी गौताळा अभयारण्यात पाटणादेवी मंदिर परिसर असून येथे वर्षभर राज्यासह परराज्यातील भाविकांचा राबता असतो. पुरातन हेमाडपंथीय चंडिकेच्या चरणी नवस कबूल करुन तो फेडण्यासाठीही भाविकांची वर्षभर गर्दी असते. यामुळे जंगल परिसरातील पर्यावरणाला हानी पोहचत आहे. वन्यजीवांच्या अधिवासालाही धोका निर्माण झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.एकुण ५ हजार ३५०हेक्टर परिसरात जंगलक्षेत्र असून जैवविविधतेसह दूर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांचा येथे अधिवास आहे. डोंगर रांगा, उसळी घेणारे धबधबे, हिरवीगार वनराई, ऐतिहासिक स्थळे अशी समृद्धी या परिसराला लाभल्याले भाविकांसह पर्यटक व वन्यजीव अभ्यासक येथे येतात. नवस फेडण्याच्या प्रथेमुळे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो. भाविक त्याची विल्हेवाट लावत नसल्याने परिसराचे पर्यावरण दूषित होत आहे.तिखट आणि गोड जेवणाचा नैवेद्य दाखवून देवीसमोर नवस फेडला जातो. परिसरातच चुली पेटवून अन्न शिजवले जाते. पत्रवाळ्या, प्लॅस्टिकचे द्रोण, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, उरलेले अन्न परिसरातच पडून असते.प्लॅस्टिक आणि कुजलेले अन्न खाण्यासाठी जंगली प्राणी येथे येतात. प्ल?स्टीक पोटात गेल्याने प्राण्यांचे मृत्यू ओढावले आहे. भाविकांना याबाबत वनविभागाने सुचना देऊनही उपयोग होत नसल्याने नवसफेडीवर बंदी आणण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.नवसफेडीसाठी बळी देण्यात येणा-या बोकडाची वाजतगाजत देवीच्या मंदिरापर्यंत मिरवणुक काढली जाते. जंगल परिसरात ध्वनिप्रदुषास बंदी असतानाही याचे उल्लंघन केले जाते.कारवाई करणारनवसफेडीवर येत्या पाच जून पर्यावरणदिनापासून बंदी करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. याबाबत सद्यस्थितीत वनविभागार्फत भाविकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. पाच जून नंतर मात्र वन्यजीव कायदा १९७२ अन्वये कारवाई करुन गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान वनविभागाच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी उफाळून येण्याची शक्यता काही भाविकांनी बोलून दाखवली आहे.पाटणादेवी जंगल परिसरात भाविकांकडून होत असलेल्या घाणीबाबत सुचना दिल्या आहेत. वन्यजीवांचा अधिवासाला होऊ पाहणारा धोका आणि पर्यावरणाचा उभा राहिलेला प्रश्न. उपाययोजना म्हणूनच नवसफेड बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंदिर व जंगल परिसराचे सौदर्य वाढून वन्यजीवांची सुरक्षा जपली जाणार आहे.- एम.बी.पटर्वधन, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, चाळीसगाव.नवस फेडण्यासाठी दिला जाणारा बोकडबळी, परिसरात होणारा प्ल?स्टीक कचरा ही समस्या आहे. वनविभागाने घेतलेला निर्णय योग्य असून भाविकांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपले पाहिजे.- बाळकृष्ण जोशी, व्यवस्थापक, पाटणादेवी मंदीर, चाळीसगाव.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव