शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:39 IST

जळगाव : दरवर्षी जून महिन्याच्या पहिला आठवडा शालेय साहित्य खरेदीच्या लगबगीने सुरू होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शालेय साहित्य खरेदीला ...

जळगाव : दरवर्षी जून महिन्याच्या पहिला आठवडा शालेय साहित्य खरेदीच्या लगबगीने सुरू होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शालेय साहित्य खरेदीला घरघर लागली आहे. वह्या, पुस्तके रजिस्टरची विक्री मंदावली असून याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे़ शाळा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असल्यामुळे फ क्त दहा ते पंधरा टक्के शालेय साहित्यांची विक्री झाल्याची माहिती शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली़

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू होते. यामध्ये काही प्रमाणात शिथिलता सुध्दा देण्यात आली आहे. दरवर्षी जून महीन्याच्या सुरूवातीला शालेय साहीत्य खरेदीसाठी बाजारात मोठी उलाढाल व्हायची. शालेय साहित्य, बॅग, वह्या, पुस्तके, रजिस्टर, नवीन गणवेश, शूज, रेनकोट, छत्री या सारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळायची, व्यापारी वर्ग सुध्दा शालेय साहीत्याचा मोठा जमा करून ठेवत असायचे. मात्र, यंदा कोरोनाने थैमान घातल्यामुळे मार्च महिन्यांपासूनच शाळा, महाविद्यालय बंद झाली़ अन् अद्याप ती उघडलेली नाही़इतर किंमती ‘जैसे थे’, मात्र बारावींच्या पुस्तकांच्या किंमतीत वाढमुलांना आवडणारे दप्तर, कंपास बॉक्स, छत्री, रेनकोट या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. आॅनलाईन शिक्षणामुळे अजूनही ग्राहक बाजारात फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे पहिली ते अकरावीच्या पुस्तकांसह वही, पेन व इतर शालेय साहित्यांच्या किंमती ‘जैसे थे’ आहेत़ मात्र, बारावीचा अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे नवीन पुस्तकांच्या किंमतीमध्ये पाच ते सहा टक्के वाढ झालेली आहे़ आॅनलाईन शिक्षणामुळे पालक पुस्तक खरेदीसाठी येत आहेत, मात्र इतर वस्तु खरेदीसाठी पालकांची गर्दी होत नसल्याचे पहायला मिळाले़ट्रान्सपोर्ट बंदमुळे पूर्ण माल मिळेना!पहिली ते दहावी पर्यंतची सर्व पुस्तके ही दुकानांमध्ये उपलब्ध झाली आहे़ अजूनही ट्रान्सफोर्ट नियमित सुरू नसल्यामुळे अवांतर विषयांची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. लॉकडाऊनमुळे पुस्तक विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसला असून अजूनही शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नसल्यामुळे ग्राहकांनी शालेय साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सम-विषम प्रमाणात दुकाने सुरू असल्यामुळे याचाही परिणाम जाणवत आहे.शालेय साहित्यांची पंधरा ते वीस टक्के विक्री झालेली आहे़ ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे अपूर्णच शालेय साहित्य उपलब्ध झालेले आहे़ त्यात सम-विषम प्रमाणात दुकान सुरू असल्यामुळे ग्राहकांनीही पाठ फिरविली आहे़ बारावीची पुस्तके वगळता इतर साहित्यांच्या किंमतींमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही़ लॉकडॉऊनमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे़ - सुबोध नेवे, शालेय साहित्य विक्रेता

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव