शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच मंदीऐवजी तेजी येईल', मुख्यमंत्री प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 12:04 IST

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

ठळक मुद्देदेशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली.

भुसावळ (जळगाव) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान जळगाव दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महाजनादेश यात्रेला लोकांचं समर्थन मिळत आहे. सरकारने केलेल्या कामांमुळेच लोकांचा पाठिंबा मिळत आहे. यापुढेही शेतकरी, पाणी, दुष्काळ, बेरोजगारी यासंदर्भातील कामे सरकारकडून प्राध्यान्याने सोडविण्यात येत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे आलेल्या मंदीच्या परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले.  

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बँकांना 70 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणे असेल, अतिरिक्त संसाधनातून बँकांना 5 लाख कोटी रुपये देऊन त्यातून मोठ्या प्रमाणात इक्विटीडी आणण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे उद्योगांना आणि व्यापाराला मोठा फायदा मिळेल. व्याजाचे दर रेपोरेटशी जोडण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करते. तरीही, बँकांकडून व्याजाचा दर कमी करण्यात येत नाही. गेल्या 9 वर्षातील सर्वात कमी रेपो रेट आज रिझर्व्ह बँकेने केलाय. ऑटोमोबाईल सेक्टरसाठी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. आता, ऑटोमोबाईल श्रेत्रात मंदीऐवजी तेजी येताना दिसेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. कन्झ्युमर सेक्टरमध्ये मोठा बदल दिसेल, असे म्हणत देशातील मंदीच्या स्थितीबाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.  

मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. भुसावळमधील स्थानिक मुद्द्यांपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यापर्यंतच्या विषयांना स्पर्श केला. तसेच, विरोधकांवर हल्लाबोल करताना, नेहमीप्रमाणे मोदींचं कौतुकही मुख्यमंत्र्यानी केले. तसेच, विधानसभा निवडणुकांमध्येही महायुतील मोठं यश मिळेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन