शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

Video : 'ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच मंदीऐवजी तेजी येईल', मुख्यमंत्री प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 12:04 IST

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

ठळक मुद्देदेशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली.

भुसावळ (जळगाव) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान जळगाव दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महाजनादेश यात्रेला लोकांचं समर्थन मिळत आहे. सरकारने केलेल्या कामांमुळेच लोकांचा पाठिंबा मिळत आहे. यापुढेही शेतकरी, पाणी, दुष्काळ, बेरोजगारी यासंदर्भातील कामे सरकारकडून प्राध्यान्याने सोडविण्यात येत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे आलेल्या मंदीच्या परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले.  

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बँकांना 70 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणे असेल, अतिरिक्त संसाधनातून बँकांना 5 लाख कोटी रुपये देऊन त्यातून मोठ्या प्रमाणात इक्विटीडी आणण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे उद्योगांना आणि व्यापाराला मोठा फायदा मिळेल. व्याजाचे दर रेपोरेटशी जोडण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करते. तरीही, बँकांकडून व्याजाचा दर कमी करण्यात येत नाही. गेल्या 9 वर्षातील सर्वात कमी रेपो रेट आज रिझर्व्ह बँकेने केलाय. ऑटोमोबाईल सेक्टरसाठी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. आता, ऑटोमोबाईल श्रेत्रात मंदीऐवजी तेजी येताना दिसेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. कन्झ्युमर सेक्टरमध्ये मोठा बदल दिसेल, असे म्हणत देशातील मंदीच्या स्थितीबाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.  

मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. भुसावळमधील स्थानिक मुद्द्यांपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यापर्यंतच्या विषयांना स्पर्श केला. तसेच, विरोधकांवर हल्लाबोल करताना, नेहमीप्रमाणे मोदींचं कौतुकही मुख्यमंत्र्यानी केले. तसेच, विधानसभा निवडणुकांमध्येही महायुतील मोठं यश मिळेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन