शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पहिल्या दिवशी ८२९६६ विद्यार्थ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 20:56 IST

दहा महिन्यांचा खंड : पाचवी ते आठवीच्या १९७८ शाळा सुरू

जळगाव : तब्बल दहा महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी ३ लाख ३४ हजार ८६२ विद्यार्थ्यांपैकी ८२ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये हजेरी लावली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या २ हजार ५८ शाळांपैकी बुधवारी पहिल्या दिवशी १९७८ शाळा सुरू होवून ८२ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करून व त्यांचे तापमान मोजून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. त्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र सुध्दा विद्यार्थ्यांकडून गोळा करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनी एक दिवसाआधी वर्गांमध्ये निर्जुतुकीकरण फवारणी करून वर्ग स्वच्छ केले होते. बुधवारी मोठ्या आनंदात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दीर्घ कालावधीनंतर मित्र-मैत्रिण भेटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावर सुध्दा आनंद झळकत होता.- पहिल्या दिवशी उपस्थितीविद्यार्थी - ८२९६६शिक्षक - ११९६९शाळा सुरू - १९७८पहिला दिवस मज्जेचातब्बल दहा महिन्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी शाळेत प्रवेश केला. त्यामुळे खूप दिवसांपासून मित्र-मैत्रिण न भेटल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.शाळा सुटल्यावर एकमेकांची आरोग्याबाबत विचारणा करताना सुध्दा चिमुकले विद्यार्थी दिसून आले.८० शाळा उघडल्याच नाही...जिल्ह्यात २०५८ शाळांपैकी १९७८ शाळा उघडल्या.मात्र, ८० शाळा पहिल्या दिवशी उघडल्याच नाही.प्राथमिक विभागातंर्गत ११९२ पैकी ११८५ तर माध्यमिक विभागातंर्गत असलेल्या पाचवी ते आठवीच्या ८६६ शाळांपैकी ७८९ शाळा सुरू सुरू झाल्या आहेत़ तसेच माध्यमिक विभागातंर्गत येणाऱ्या शाळांमधील ६ हजार ११४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.आतापर्यंत ३ शिक्षक व १ शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटीव्ही आढळून आला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव