शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

"एकेकाळी कापसाला ७ हजार भाव मागणारे महाजन, आज मंत्री असताना फॉरेनला फिरतायंत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 16:30 IST

कपाशीला ७ हजार भाव मागणारे गिरीश महाजन आता कुठे गेले, असा सवाल केला. 

जळगाव - जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात सातत्याने खटके उडत असतात. एकनाथ खडसेंकडूनगिरीश महाजनांवर टीका केली जाते, तर महाजनही त्या टीकेला पलटवार करताना दिसून येते. आता, पुन्हा एकदा खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विदेश दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका केलीय. जामनेर येथील शेतकऱ्यांच्या विविध पिकाला हमीभाव मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. यावेळी, कपाशीला ७ हजार भाव मागणारे गिरीश महाजन आता कुठे गेले, असा सवाल केला. 

शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, कांद्याला पाच हजार रुपये हमीभाव देण्यात यावा पिक विमा कंपनीकडून मदत मिळावी, वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. महावितरणा करून शेतकऱ्यांचे वीज तोडणी थांबवण्यात यावी, शेती पंपाला दिवसा बारा तास सुरळीत देण्यात यावी, अशा मागण्यासाठी एक दिवशी लक्ष उपोषण राष्ट्रवादीतर्फे जामनेर येथे करण्यात आले आहे.           आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यामध्ये ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघे एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे जवळचे असून त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाच्या हमीभावासाठी बोललं पाहिजे. कारण, जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कपाशी पिकाला भाव मिळत नाही, एकेकाळी गिरीश महाजन यांनी सात हजार रुपये कपाशीला भाव मिळण्यासाठी आंदोलन केले होते. मग, आता गेले कुठे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते फॉरेन दौऱ्यावर फिरत आहेत, अशी टीकाही खडसे यांनी केली. 

आज शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही कपाशीला भाव नाही, ज्वारीला भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील  झाला असून उद्या नवीन कपाशी पिकाची लागवड होणार आहे. मात्र कपाशीला भाव नसल्यामुळे आजही मागच्या वर्षाची कपाशी घरात पडून आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे अशी प्रतिक्रिया जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आलेल्या एकदिवसीय लक्षणिक उपोषण प्रसंगी बोलताना एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनFarmerशेतकरी