शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सात गटशेती प्रस्तावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:40 IST

उद्दीष्टपूर्ती : मागील वर्षाच्या पाच पैकी केवळ दोन गटच कार्यरत

ठळक मुद्दे मिळणार ६० टक्के अनुदान

जळगाव : विविध कृषी विषयक योजनांचा प्राधान्याने लाभ देणाऱ्या गटशेती योजनेकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे यंदा या योजनेसाठी ६ गटशेती प्रस्ताव मंजुरीचे उद्दीष्ट असताना कृषी विभागाकडे प्रस्तावच येत नव्हता. अखेर ७ प्रस्तावांना मंगळवार, ८ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. मागील वर्षी नोंदणी झालेल्या ५ गटशेती प्रस्तावांपैकी आता केवळ दोनच गट गटशेती करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासकीय योजनांचा लाभ प्राधान्यानेगटशेतीसाठी विहीर, ठिबक असो की अन्य कोणतीही शेतकºयांसाठीची योजना. तिचा मूळ योजनेनुसारच अनुदानासह लाभ प्राधान्याने गटशेतीला दिला जातो. त्यासाठी जर १०० एकर जमिनीसाठी १ कोटी अनुदान शासन देणार असेल तर गटातील शेतकºयांना दीड कोटी रूपये स्वत: टाकावे लागतील. टप्प्याटप्प्याने देखील योजनांचा लाभ घेता येऊ शकेल.६ गट नोंदणीचे होते उद्दीष्टकृषी विभागाला २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यात गटशेतीचे ६ गट नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी ५ गटांची नोंदणी झाली होती. मात्र त्यास गळती लागत केवळ २ गट शिल्लक राहिले आहेत. यंदा ७ गटशेती प्रस्तावांना अखेर मंजूरी देण्यात आली. त्यात तिफण फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी भडगाव, भूमिपूत्र शेतकरी गट केकतनिंभोरा, तापी वंदन कृषीमंडळ, चिनावल, श्रीगुरूदेव दत्त कृषी समूह गट डोंगरकठोरा, आदर्श शेतकरी कृषी विज्ञान मंडळ सतखेडा, वसुंधरा कृषी मंडळ, वाघळूद, शिवसह्याद्री गट चाळीसगाव यांचा समावेश आहे.शेतकºयांच्या उन्नती साठी गटशेती आवश्यक-जिल्हाधिकारीशेतकºयांचा आत्मसन्मान वाढून त्यांची उन्नती व सबलीकरण होण्यासाठी पारंपारिक शेती न करता आधुनिकतेची कास धरून गटशेती केल्यास शेतकरी खºया अर्थाने शेतकरी राजा होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज केले.जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गटशेती करणारे शेतकरी, कृषि विभाग, पंचायत समितीचे अधिकारी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सर्व तालुका कृषि अधिकारी, गटशेती करणारे लाभार्थी शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर पुढे म्हणाले की, बँकांकडून अर्थ सहाय्य मंजूर होण्यासाठी काही अडचणी असतील त्यावर मार्ग काढण्यात येईल. नोंदणीकृत गटशेती करणाºया गटांनी २० टक्के वाट्याची तरतूद बँकेच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे.नोंदणी सोपी...गटशेतीसाठी किमान १५ शेतकºयांनी एकत्र येऊन गटनोंदणी करणे आवश्यक आहे. या गटनोंदणीचे प्रमाणपत्र गटशेती योजनेसाठीच्या प्रस्तावासाठी आवश्यक आहे. तसेच संबंधीत गटाचे बँक खाते हवे. गटातील सहभागी शेतकºयांचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक, शेतीचा उतारा देणे आव श्यक आहे. सर्व शेती सलग नसली तरीही एकाच शिवारात असणे आवश्यक आहे. तसेच गटशेती योजनेत सहभाग घेण्याबाबत गटाचा ठराव, तसेच विहीर, ठिबक, शेततळे, ट्रॅक्टर, डिझेल पंप यासारख्या औजारे व सुविधांपैकी तसेच पिक आल्यावर माल ठेवण्यासाठी गोडावून, कोल्ड स्टोअरेज, क्लिनींग-ग्रेडींग, तर प्रक्रियेसाठी मशिनरी, माल विक्रीसाठी वाहन यापैकी काय-काय हवे आहे? त्याची ठरावासह यादी देणेही आवश्यक आहे.६० टक्के अनुदानजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रारंभी गट शेती विषयी सर्व उपस्थितांना माहिती करून देतांना सांगितले की, यापुर्वी गटशेती आणि त्यांना लागणाºया साधनसामुग्रीला यापुर्वी विशेष प्रतिसाद नव्हता. परंतु आता शासनाकडून ६० टक्के अनुदान मिळत असल्याने गट शेती करणारे गट वाढत असून त्यांची गटशेती व शेती अवजारे, शेती यांत्रीकी अवजारे इ.खरेदी करण्यासाठी मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. २० टक्के शेतकºयांना स्वहिस्सा टाकावा लागणार असून २० टक्के रक्कम कर्जरूपात मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेती