शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील गावांखेरीज १९ गावांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 3:50 PM

रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे११ ग्रामपंचायतींकडून अद्यापही प्रस्ताव नसल्याची शोकांतिका ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील प्रशासन मात्र ढिम्मच कूपनलिका व इंधन विहिरींची योजना थंड बस्त्यात

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली असून, त्या अतिरिक्त १९ गावांपैकी चक्क ११ ग्रामपंचायतकडून टंचाई आराखडा वा तातडीची टीपीडब्ल्यूएस योजनेकरिता अद्यापही प्रस्ताव सादर झाले नसल्याची शोकांतिका आहे.रावेर पंचायत समितीच्या प्रभारी कार्यकाळात ग्रामसेवक वा ग्रामविकास अधिकाऱ्यांची ग्रामीण स्तरावर पाणीटंचाईच्या ज्वलंत प्रश्नाबाबत असलेली उदासीनता व मनमानी कारभार यामुळे अधोरेखित होत असल्याची गंभीर टीका होत आहे.दरम्यान, ११ गावांकरीता मंजूर झालेल्या १४ योजनांमधील जुनोने व जानोरी येथील योजना पूर्णत्वास आल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मंजुरी मिळालेल्या अन्य ११ कूपनलिका व इंधन विहिरींची योजना थंड बस्त्यात असल्याने गटविकास अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचे गांभीर्य नसल्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. सायबूपाड्या, सिंगनूर, गोलवाडे, खिरवड, रमजीपूर, ऐनपूर, भाटखेडा, रोझोदा, तिड्या, अंधारमळी, रसलपूर, भोर, वाघोड, मोरगाव खुर्द, निरूळ व नेहता या अतिरिक्त गावांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.दरम्यान, तामसवाडी येथील ग्राम पंचायतींचा विहीर अधिग्रहण करण्याबाबत प्रस्ताव दाखल झाला आहे. मस्कावद बुद्रूक ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेचा भूजलस्त्रोत हरपल्याने मस्कावद खुर्द येथील कूपनलिकेपर्यंत पाईपलाईन करण्यासाठी पाणी टंचाई निर्मूलनासाठी तातडीची पाणीपुरवठा योजनेकरीता आजच प्रस्ताव दाखल केल्याची माहिती सूुत्रांनी दिली. शासनस्तरावरून पाणीटंचाई निर्मुलनासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जात असताना मात्र पंचायत समिती प्रशासन गंभीर नसल्याबाबत खंत व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर