शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

केंद्राकडून मदतीची केवळ घोषणा, निधी तर सोडा अद्याप आदेशही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:36 PM

राज्याच्या निधीचेही वाटप धिम्यागतीने : जिल्हा प्रशासनाने नोंदविली होती ८१२ कोटींंची मागणी

जळगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक जिल्ह्यात असतानाच केंद्र सरकारकडून राज्यासाठी ६०० कोटी रुपयांनी मदत जाहीर केली. या घोषणेला तीन दिवस उलटले तरी निधी तर दूरच, अद्याप जिल्हा प्रशासनाला या बाबत आदेशही प्राप्त झालेले नाही. दुसरीकडे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मिळालेल्या पहिल्या हप्त्याच्या १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपयांच्या निधीचेही धिम्या गतीने वाटप सुरू आहे.दरम्यान, नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकसानीच्या भरपाईसाठी ८१२ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता असून शासनाकडून १७९ कोटी ९८ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याचे सांगितले होते.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख ४१ हजार ३४५ शेतकऱ्यांचे ७ लाख १८ हजार १२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले व या नुकसानी पोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून पहिला हप्ता २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत करण्यात आला. पाच दिवस उलटले तरी शेतकºयांपर्यंत ही मदत पोहचू शकलेली नाही. त्याची आकडेवारीदेखील उपलब्ध नाही.पथकाच्या अहवालावर भिस्तजिल्ह्यातून नुकसानीची पाहणी करून केंद्रीय समितीचे पथक तर गेले, मात्र या पथकाला पहिल्या दिवशी व दुसºया दिवशीही उशिर झाल्याने जिल्ह्यातील सर्व गावांची पाहणी करता आली नव्हती. त्यात अनेक ठिकाणी बांधावर दोन ते पाच मिनिटे थांबून केलेल्या चर्चेतून पथकाला बळीराजाच्या तोंडचा गेलेला घास कसा समजेल, असा सवालही उपस्थित होत असल्याने पथक त्यांचा अहवाल काय देते, यावर सर्व भिस्त आहे. त्यामुळे बळीराजाच्या पदरी किती मदत मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.अजून ६२२ कोटी २२ लाख रुपये मदतीची आवश्यकताकेंद्रीय समितीचे पथक जिल्ह्यात आले असताना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. त्यात त्यांनी जिल्ह्यातील पिकाचे खरीप व रब्बी हंगामाचे क्षेत्र, पीक परिस्थिती, लागवड केलेले क्षेत्र, बाधित क्षेत्र, पावसाची सरासरी तसेच पीक काढणीच्यावेळीच पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस, केळी, लिंबूबागा, ऊस या पीकांचे जिल्ह्यातील ६ लाख ४१ हजार ३४५ शेतकºयांचे ७ लाख १८ हजार १२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे नमूद केले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी २०१९-२०मध्ये ८१२ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता असून शासनाकडून १७९ कोटी ९८ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असल्याचे सांगितले होते. अजून ६२२ कोटी २२ लाख रुपये मदतीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले होते.केंद्राकडून ६०० कोटींची मदत जाहिर मात्र हातात दमडीही नाहीजिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय समितीचे पथक जिल्ह्यात असतानाच केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी ६०० कोटी रुपये देण्याचे ठरविले असल्याची घोषणा राज्यसभेत केली होती. त्यालादेखील चार दिवस उलटले तरी अद्याप त्याबाबत आदेशही आलेले नाही. त्यामुळे ही मदत कधी मिळेल व शेतकºयाला रब्बीसाठी पैसा कसा उभा करता येईल, या चिंतेत बळीराजा आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव