शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून मदतीची केवळ घोषणा, निधी तर सोडा अद्याप आदेशही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:36 IST

राज्याच्या निधीचेही वाटप धिम्यागतीने : जिल्हा प्रशासनाने नोंदविली होती ८१२ कोटींंची मागणी

जळगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक जिल्ह्यात असतानाच केंद्र सरकारकडून राज्यासाठी ६०० कोटी रुपयांनी मदत जाहीर केली. या घोषणेला तीन दिवस उलटले तरी निधी तर दूरच, अद्याप जिल्हा प्रशासनाला या बाबत आदेशही प्राप्त झालेले नाही. दुसरीकडे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मिळालेल्या पहिल्या हप्त्याच्या १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपयांच्या निधीचेही धिम्या गतीने वाटप सुरू आहे.दरम्यान, नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकसानीच्या भरपाईसाठी ८१२ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता असून शासनाकडून १७९ कोटी ९८ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याचे सांगितले होते.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख ४१ हजार ३४५ शेतकऱ्यांचे ७ लाख १८ हजार १२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले व या नुकसानी पोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून पहिला हप्ता २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत करण्यात आला. पाच दिवस उलटले तरी शेतकºयांपर्यंत ही मदत पोहचू शकलेली नाही. त्याची आकडेवारीदेखील उपलब्ध नाही.पथकाच्या अहवालावर भिस्तजिल्ह्यातून नुकसानीची पाहणी करून केंद्रीय समितीचे पथक तर गेले, मात्र या पथकाला पहिल्या दिवशी व दुसºया दिवशीही उशिर झाल्याने जिल्ह्यातील सर्व गावांची पाहणी करता आली नव्हती. त्यात अनेक ठिकाणी बांधावर दोन ते पाच मिनिटे थांबून केलेल्या चर्चेतून पथकाला बळीराजाच्या तोंडचा गेलेला घास कसा समजेल, असा सवालही उपस्थित होत असल्याने पथक त्यांचा अहवाल काय देते, यावर सर्व भिस्त आहे. त्यामुळे बळीराजाच्या पदरी किती मदत मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.अजून ६२२ कोटी २२ लाख रुपये मदतीची आवश्यकताकेंद्रीय समितीचे पथक जिल्ह्यात आले असताना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. त्यात त्यांनी जिल्ह्यातील पिकाचे खरीप व रब्बी हंगामाचे क्षेत्र, पीक परिस्थिती, लागवड केलेले क्षेत्र, बाधित क्षेत्र, पावसाची सरासरी तसेच पीक काढणीच्यावेळीच पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस, केळी, लिंबूबागा, ऊस या पीकांचे जिल्ह्यातील ६ लाख ४१ हजार ३४५ शेतकºयांचे ७ लाख १८ हजार १२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे नमूद केले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी २०१९-२०मध्ये ८१२ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता असून शासनाकडून १७९ कोटी ९८ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असल्याचे सांगितले होते. अजून ६२२ कोटी २२ लाख रुपये मदतीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले होते.केंद्राकडून ६०० कोटींची मदत जाहिर मात्र हातात दमडीही नाहीजिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय समितीचे पथक जिल्ह्यात असतानाच केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी ६०० कोटी रुपये देण्याचे ठरविले असल्याची घोषणा राज्यसभेत केली होती. त्यालादेखील चार दिवस उलटले तरी अद्याप त्याबाबत आदेशही आलेले नाही. त्यामुळे ही मदत कधी मिळेल व शेतकºयाला रब्बीसाठी पैसा कसा उभा करता येईल, या चिंतेत बळीराजा आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव