शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

अमळनेरला कृषी विभागाने केली स्वच्छ भारत अभियानाची ऐसी तैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:27 PM

कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे.

अमळनेर, जि.जळगाव : येथील कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.कृषी विभागाच्या एकूणच कार्यप्रणालीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.येथील कृषी विभागाचे कार्यालय अनेक वर्षे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या न्यू प्लॉट भागातील डॉ.संदेश गुजराथी यांच्या रुग्णालयासमोरील इमारतीत होते. आता हे कार्यालय पटवारी कॉलनी भागातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ नुकतेच स्थलांतरित झाले आहे.स्थलांतर करताना कृषी विभागाने त्यांच्या जुन्या कार्यालयातील बी-बियाणे व खताच्या छोट्या अनेक पिशव्या, दस्तावेज, नियतकालिके, माहिती पत्रके आदींना कचरा कुंडीत न टाकता किंवा पालिकेच्या कचरा गाडीत न टाकता थेट रस्त्यावर टाकले. त्यास आग लावून निघून गेले. हा ढिगारा पूर्ण जळाला की नाही हे पाहण्याचाही त्रासही त्यांनी घेतला नाही. परिणामी या अर्धवट जळालेल्या ढिगाऱ्यातून अत्यंत घाणेरडा व आरोग्यासाठी हानिकारक असलेला वास आजूबाजूच्या नागरी वस्तीत पसरत आहे. येणाºया-जाणाऱ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होत आहे. ही बाब ११ रोजी सामाजिक कार्यकर्ते आशीष चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत कृषी विभागाला कळविले. मात्र अजूनही हा दुर्गंधीयुक्त ढिगारा ‘जैसे थे’ आहे.बियाणे व खतांची पाकिटे गरजू शेतकºयांना वाटण्याऐवजी त्यांना अशा पद्धतीने नष्ट का करण्यात आले? माहिती पत्रके व नियतकालिकांचे पुरेसे वाटप का झाले नाही? अनेकांच्या सह्या असलेले दस्तावेज अशाप्रकारे का नष्ट केले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAmalnerअमळनेर