शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

अमळनेर पालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून खुर्चीला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:35 IST

पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा  पाणी चोरणाºया जीवनधाराची यंत्रणा सील

अमळनेर, जि.जळगाव : शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता पालिकेत सत्ताधारी गटातून बंडखोर नगरसेवकांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे पालिकेची परवानगी न घेता, अवैध पाणीपुरवठ्याचे कनेक्शन घेणाºया जीवनधारा कंपनीची यंत्रणा पालिकेने सील केली.शहरात पाण्याची टंचाई असताना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती तथा माजी आमदार साहेबराव पाटील त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी जनतेस वेठीस धरत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे सत्ताधारी गटातील नगरसेविका रत्नमाला साखरलाल महाजन, कमलबाई पीतांबर पाटील, शीतल राजेंद्र यादव, संगीता संजय पाटील, नूतन महेश पाटील, राधाबाई संजय पवार, प्रताप अशोक शिंपी, सुरेश आत्माराम पाटील, संतोष भगवान पाटील, घनश्याम जयंत पाटील, संजय महादू भिल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राजीनामा न दिल्यास प्रत्येक प्रभागातून मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी विरोधी गटाचे प्रवीण पाठक, श्याम पाटील, योगराज संदानशीव आदींनी भेट दिली.संतप्त नगरसेवकांनी सिंधी कॉलनी भागात जाऊन जीवनधारा प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी मुख्याधिकाºयांना तिथे बोलावले होते. ‘जीवनधारा’कडून याआधी विहिरीतील पाणी शुद्ध व थंड करून ते नागरिकांना देत असे. मात्र, नंतर न.पा.च्या पाईपलाईनवरून अवैध नळजोडणी केल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. दरम्यान, मुख्याधिकाºयांनी चौकशी केली असून स्थिती काय आहे हे जाणून न.पा.चे पाणी चोरून विकणाºया जीवनधारा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाºयांनी अभियंता हर्षल सोनवणे यांना दिले आहेत.या कारणावरून नगरसेवकांची खदखदपाण्याचे तिसरे आवर्तन मिळणार नाही हे नगराध्यक्षांना माहीत आहे, असे असतानाही त्यांनी उपाययोजना केली नाही. पाणीटंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजनेसाठी एकही ठराव पाठवला नाही. पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी जानेवारीपासून दोन दिवस वाढवण्यास सांगत होते. त्याचा विचार केला नाही. दुष्काळ असून, पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून १० ते १५ दिवसाआड नळांना पाणी येत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस पालिकेत येत नाही. मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजूर करून दिला. जीवनधारा या खासगी कंपनीला मुख्य जल वाहिनीवरून कनेक्शन देऊन तेथे ७० टक्के फील्टर केलेले पाणी वाया जात आहे. वैयक्तिक लाभासाठी अतिक्रमण रोखण्याचे चुकीचे ठराव करून सर्व नगरसेवकांचा बळी दिला. नगरसेवक स्वखर्चाने टँकर मागवून पाणी वाटप करत असून, पालिकेचे ट्रॅक्टर उभे करून ठेवणे, नगराध्यक्षांची पाण्याची एवढी बिकट परिस्थिती असतानाही एकही दिवस जळोद व कलाली येथे भेट नाही. यासह अनेक कारणे देत नगरसेवकांनी खदखद बाहेर काढली आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षAmalnerअमळनेर