शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून खुर्चीला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:35 IST

पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा  पाणी चोरणाºया जीवनधाराची यंत्रणा सील

अमळनेर, जि.जळगाव : शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता पालिकेत सत्ताधारी गटातून बंडखोर नगरसेवकांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे पालिकेची परवानगी न घेता, अवैध पाणीपुरवठ्याचे कनेक्शन घेणाºया जीवनधारा कंपनीची यंत्रणा पालिकेने सील केली.शहरात पाण्याची टंचाई असताना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती तथा माजी आमदार साहेबराव पाटील त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी जनतेस वेठीस धरत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे सत्ताधारी गटातील नगरसेविका रत्नमाला साखरलाल महाजन, कमलबाई पीतांबर पाटील, शीतल राजेंद्र यादव, संगीता संजय पाटील, नूतन महेश पाटील, राधाबाई संजय पवार, प्रताप अशोक शिंपी, सुरेश आत्माराम पाटील, संतोष भगवान पाटील, घनश्याम जयंत पाटील, संजय महादू भिल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राजीनामा न दिल्यास प्रत्येक प्रभागातून मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी विरोधी गटाचे प्रवीण पाठक, श्याम पाटील, योगराज संदानशीव आदींनी भेट दिली.संतप्त नगरसेवकांनी सिंधी कॉलनी भागात जाऊन जीवनधारा प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी मुख्याधिकाºयांना तिथे बोलावले होते. ‘जीवनधारा’कडून याआधी विहिरीतील पाणी शुद्ध व थंड करून ते नागरिकांना देत असे. मात्र, नंतर न.पा.च्या पाईपलाईनवरून अवैध नळजोडणी केल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. दरम्यान, मुख्याधिकाºयांनी चौकशी केली असून स्थिती काय आहे हे जाणून न.पा.चे पाणी चोरून विकणाºया जीवनधारा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाºयांनी अभियंता हर्षल सोनवणे यांना दिले आहेत.या कारणावरून नगरसेवकांची खदखदपाण्याचे तिसरे आवर्तन मिळणार नाही हे नगराध्यक्षांना माहीत आहे, असे असतानाही त्यांनी उपाययोजना केली नाही. पाणीटंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजनेसाठी एकही ठराव पाठवला नाही. पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी जानेवारीपासून दोन दिवस वाढवण्यास सांगत होते. त्याचा विचार केला नाही. दुष्काळ असून, पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून १० ते १५ दिवसाआड नळांना पाणी येत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस पालिकेत येत नाही. मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजूर करून दिला. जीवनधारा या खासगी कंपनीला मुख्य जल वाहिनीवरून कनेक्शन देऊन तेथे ७० टक्के फील्टर केलेले पाणी वाया जात आहे. वैयक्तिक लाभासाठी अतिक्रमण रोखण्याचे चुकीचे ठराव करून सर्व नगरसेवकांचा बळी दिला. नगरसेवक स्वखर्चाने टँकर मागवून पाणी वाटप करत असून, पालिकेचे ट्रॅक्टर उभे करून ठेवणे, नगराध्यक्षांची पाण्याची एवढी बिकट परिस्थिती असतानाही एकही दिवस जळोद व कलाली येथे भेट नाही. यासह अनेक कारणे देत नगरसेवकांनी खदखद बाहेर काढली आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षAmalnerअमळनेर