शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

अमळनेर पालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून खुर्चीला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:35 IST

पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा  पाणी चोरणाºया जीवनधाराची यंत्रणा सील

अमळनेर, जि.जळगाव : शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता पालिकेत सत्ताधारी गटातून बंडखोर नगरसेवकांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे पालिकेची परवानगी न घेता, अवैध पाणीपुरवठ्याचे कनेक्शन घेणाºया जीवनधारा कंपनीची यंत्रणा पालिकेने सील केली.शहरात पाण्याची टंचाई असताना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती तथा माजी आमदार साहेबराव पाटील त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी जनतेस वेठीस धरत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे सत्ताधारी गटातील नगरसेविका रत्नमाला साखरलाल महाजन, कमलबाई पीतांबर पाटील, शीतल राजेंद्र यादव, संगीता संजय पाटील, नूतन महेश पाटील, राधाबाई संजय पवार, प्रताप अशोक शिंपी, सुरेश आत्माराम पाटील, संतोष भगवान पाटील, घनश्याम जयंत पाटील, संजय महादू भिल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राजीनामा न दिल्यास प्रत्येक प्रभागातून मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी विरोधी गटाचे प्रवीण पाठक, श्याम पाटील, योगराज संदानशीव आदींनी भेट दिली.संतप्त नगरसेवकांनी सिंधी कॉलनी भागात जाऊन जीवनधारा प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी मुख्याधिकाºयांना तिथे बोलावले होते. ‘जीवनधारा’कडून याआधी विहिरीतील पाणी शुद्ध व थंड करून ते नागरिकांना देत असे. मात्र, नंतर न.पा.च्या पाईपलाईनवरून अवैध नळजोडणी केल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. दरम्यान, मुख्याधिकाºयांनी चौकशी केली असून स्थिती काय आहे हे जाणून न.पा.चे पाणी चोरून विकणाºया जीवनधारा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाºयांनी अभियंता हर्षल सोनवणे यांना दिले आहेत.या कारणावरून नगरसेवकांची खदखदपाण्याचे तिसरे आवर्तन मिळणार नाही हे नगराध्यक्षांना माहीत आहे, असे असतानाही त्यांनी उपाययोजना केली नाही. पाणीटंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजनेसाठी एकही ठराव पाठवला नाही. पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी जानेवारीपासून दोन दिवस वाढवण्यास सांगत होते. त्याचा विचार केला नाही. दुष्काळ असून, पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून १० ते १५ दिवसाआड नळांना पाणी येत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस पालिकेत येत नाही. मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजूर करून दिला. जीवनधारा या खासगी कंपनीला मुख्य जल वाहिनीवरून कनेक्शन देऊन तेथे ७० टक्के फील्टर केलेले पाणी वाया जात आहे. वैयक्तिक लाभासाठी अतिक्रमण रोखण्याचे चुकीचे ठराव करून सर्व नगरसेवकांचा बळी दिला. नगरसेवक स्वखर्चाने टँकर मागवून पाणी वाटप करत असून, पालिकेचे ट्रॅक्टर उभे करून ठेवणे, नगराध्यक्षांची पाण्याची एवढी बिकट परिस्थिती असतानाही एकही दिवस जळोद व कलाली येथे भेट नाही. यासह अनेक कारणे देत नगरसेवकांनी खदखद बाहेर काढली आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षAmalnerअमळनेर