शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अमळनेर पालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून खुर्चीला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:35 IST

पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा  पाणी चोरणाºया जीवनधाराची यंत्रणा सील

अमळनेर, जि.जळगाव : शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता पालिकेत सत्ताधारी गटातून बंडखोर नगरसेवकांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे पालिकेची परवानगी न घेता, अवैध पाणीपुरवठ्याचे कनेक्शन घेणाºया जीवनधारा कंपनीची यंत्रणा पालिकेने सील केली.शहरात पाण्याची टंचाई असताना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती तथा माजी आमदार साहेबराव पाटील त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी जनतेस वेठीस धरत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे सत्ताधारी गटातील नगरसेविका रत्नमाला साखरलाल महाजन, कमलबाई पीतांबर पाटील, शीतल राजेंद्र यादव, संगीता संजय पाटील, नूतन महेश पाटील, राधाबाई संजय पवार, प्रताप अशोक शिंपी, सुरेश आत्माराम पाटील, संतोष भगवान पाटील, घनश्याम जयंत पाटील, संजय महादू भिल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राजीनामा न दिल्यास प्रत्येक प्रभागातून मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी विरोधी गटाचे प्रवीण पाठक, श्याम पाटील, योगराज संदानशीव आदींनी भेट दिली.संतप्त नगरसेवकांनी सिंधी कॉलनी भागात जाऊन जीवनधारा प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी मुख्याधिकाºयांना तिथे बोलावले होते. ‘जीवनधारा’कडून याआधी विहिरीतील पाणी शुद्ध व थंड करून ते नागरिकांना देत असे. मात्र, नंतर न.पा.च्या पाईपलाईनवरून अवैध नळजोडणी केल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. दरम्यान, मुख्याधिकाºयांनी चौकशी केली असून स्थिती काय आहे हे जाणून न.पा.चे पाणी चोरून विकणाºया जीवनधारा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाºयांनी अभियंता हर्षल सोनवणे यांना दिले आहेत.या कारणावरून नगरसेवकांची खदखदपाण्याचे तिसरे आवर्तन मिळणार नाही हे नगराध्यक्षांना माहीत आहे, असे असतानाही त्यांनी उपाययोजना केली नाही. पाणीटंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजनेसाठी एकही ठराव पाठवला नाही. पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी जानेवारीपासून दोन दिवस वाढवण्यास सांगत होते. त्याचा विचार केला नाही. दुष्काळ असून, पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून १० ते १५ दिवसाआड नळांना पाणी येत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस पालिकेत येत नाही. मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजूर करून दिला. जीवनधारा या खासगी कंपनीला मुख्य जल वाहिनीवरून कनेक्शन देऊन तेथे ७० टक्के फील्टर केलेले पाणी वाया जात आहे. वैयक्तिक लाभासाठी अतिक्रमण रोखण्याचे चुकीचे ठराव करून सर्व नगरसेवकांचा बळी दिला. नगरसेवक स्वखर्चाने टँकर मागवून पाणी वाटप करत असून, पालिकेचे ट्रॅक्टर उभे करून ठेवणे, नगराध्यक्षांची पाण्याची एवढी बिकट परिस्थिती असतानाही एकही दिवस जळोद व कलाली येथे भेट नाही. यासह अनेक कारणे देत नगरसेवकांनी खदखद बाहेर काढली आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षAmalnerअमळनेर