शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

केमिकल्स कंपनीत अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 11:47 IST

शेजारील दोन कंपन्याही जळून खाक: बालंबाल बचावले कामगार

जळगाव : रिअ‍ॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने केमिकल्स निर्मिती करणाऱ्या एमआयडीसीतील रवी इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट होऊन अचानक आग लागली. यात सुदैवाने काम करणारे कामगार बालंबाल बचावले असून या स्फोटामुळे दोन कंपन्या आगीत खाक झाल्या आहेत. या घटनेत जीवत हानी झालेली नसली तरी कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील जी सेक्टर ४५ मध्ये रवींद्र पाटील यांच्या मालकीची रवी इंडस्ट्रीज ही केमिकल्स निर्मिती करणारी कंपनी आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता कंपनीत रिअ‍ॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने अचानक स्फोट झाला. त्यामुळे कंपनीतील केमिकल्स निर्मितीच्या एका पाठोपाठ सहा स्फोट झाले. त्यात तीन टाक्या फुटून आगीच काही मिनिटात भीषण आगीत रुपांतर झाले. काही वेळातच रवी इंडस्ट्रीज या कंपनीसह तिच्या बाजूची अविजिता इंटरप्रायझेस ही प्लास्टिकचे पीव्हीसी पाईप बनविणारी कंपनीच्या आगीत सापडली.आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्नजैन कंपनी, महापालिका तसेच मेरीको या कंपनीतील अग्निशमन बंब तसेच १५० फोमच्या कॅन मागविण्यात आल्या होत्या. सर्व जवानांनी जीव धोक्यात घालून आग नियंत्रणात आणली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संभाव्य धोका लक्षात घेता कंपनीच्याजवळपास कोणालाही जावू दिले जात नव्हते. दरम्यान, या घटनेत नेमके किती नुकसान झाले, कोणाला इजा झाली का? याबाबत अधिकृत बोलायला कोणीही तयार नव्हते.गीतांजली कंपनीच्या आठवणी ताज्यागेल्या वर्षी एमआयडीसीत गितांजली केमिकल्स या कंपनीतही रिअ‍ॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने स्फोट होऊन सहा ते सात कामगार भाजून मृत्यूमुखी पडले होते. या कंपनीत अगदी तसाच स्फोट झाला. कामगार किती होते व कोण होते याबाबत माहिती दिली जात नव्हती. या घटनेच्या निमित्ताने गितांजली केमिकल्स कंपनीच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.विना परवानगी कंपनी सुरु असल्याचा आरोपजी सेक्टर ४५ मध्ये असलेल्या रवी इंडस्ट्रीज या कंपनीला परवानगी नाही. तरीही या कंपनीत केमिकलचे रिफायनरींग केले जात असल्याचा आरोप शेजारील कंपनी मालकांनी केला. त्यांनी कामगारांना सोबत घेऊन रात्री साडे नऊ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून विना परवानगी कंपनी सुरु असल्याची माहिती दिली. या कंपनीतील तीन हजार लिटरची टाकी फुटली तर संपूर्ण जी सेक्टर खाक होईल, अशी ही भिती येथील उपस्थित कामगारांकडून व्यक्त केली जात होती.तीनशे मीटरपर्यंत गटारीत आगया स्फोटामुळे रस्त्यावरील गटारीतून केमिकल्स वाहू लागल्याने त्यासोबतच आगही होती.तब्बल तीनशे मीटरपर्यंत नालीतून आग वाहत होती. या स्फोटामुळे परिसरातील कंपनीतील कामगार पळत सुटले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. शहर व परिसरातील कंपन्या व मनपाचे अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. चार तासानंतर आग आटोक्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव