शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जळगाव जिल्ह्यात १५ तारखेनंतर पुन्हा पावसाचा दणका!

By विलास बारी | Updated: September 12, 2023 19:15 IST

सप्टेंबरच्या दुसरा टप्प्यात वरुणराजा बरसणार जाेरदार

जळगाव: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. दरम्यान,१५ ते १७ सप्टेंबरदरम्यान पुन्हा या महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाची शक्यता आधी वर्तविली जात असताना, सप्टेंबरमधील पाऊस ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाचा खंड व जोरदार पाऊस असा बदललेला पावसाचा पॅटर्न दिसून येत आहे. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली, त्यानंतर जुलै महिन्यात सरासरी पेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तर सप्टेंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान १०९ मिमी पाऊस झाला. तर आता १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान पुन्हा ९० ते १०० मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे. जर एवढा पाऊस झाला तर जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस एलनिनोचा परिणाम असतानाही होऊ शकतो.

पुन्हा तयार होतोय कमी दाबाचे क्षेत्र

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्यामुळे जिल्ह्यात पाऊस झाला होता. आता पुन्हा काही दिवसांच्या खंडानंतर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. १४ सप्टेंबरपासून हे क्षेत्र ओडिशामार्गे छत्तीसगड, विदर्भ करत उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे १५ ते १७ दरम्यान जळगाव जिल्ह्यासह नंदुरबार, मालेगाव, धुळे जिल्ह्यातील काही भागात कन्नड परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असल्याची सध्या स्थिती आहे. १५ नंतर कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे ओसरेल, त्यामुळे पुन्हा जळगाव जिल्ह्यात पावसाचे आगमन होऊ शकते. त्यानंतर सप्टेंबर अखेरीस परतीचा पाऊस सुरू होऊन, १५ ते २० ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस थांबू शकतो.- प्रा. सुरेश चोपणे, हवामान तज्ज्ञ.

 

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव