शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोनाबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा -एकनाथराव खडसे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:48 IST

पालकमंत्री बैठकांपुरता मर्यादीत राहिले, प्रशासनावर हवा दबाव

मुक्ताईनगर : जिल्ह्याचे प्रशासन हे नेहमी मजबूत, सक्रीय आणि जागरुक असले पाहिजे, दुर्देवाने तसे झाले नाही. प्रशासनाला वेग नसल्याने आणि हलगर्जी झाल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली, अशी टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.रुग्णांचे अहवाल येण्यास चार - चार दिवस लागत असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे ते म्हणाले.शुक्रवारी मुक्ताईनगर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाला लक्ष्य केले.जिल्हा रुग्णालय शहरात आणावेकोविड रुग्णालय हे शहराबाहेर गोदावरी रुग्णालयात शिफ्ट करावे आणि जिल्हा रुग्णालय हे शहरात आणावे, म्हणजे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.सुरुवातील पीपीई किटची कमी होती. तपासणी करण्याची यंत्रणा नाही. एका रिपोर्टसाठी चार दिवस लागत आहे. धुळ्याला लॅब होऊ शकते मग आपल्याकडे का नाही? लॅब असती रुग्ण आटोक्यात असते.विधान परिषद निमित्ताने काही विषय निघाले आहेत. माझा संघर्ष हा व्यक्ती व पक्षाविरोधात तर मुळीच नाही. परंतु पक्षात लोकशाही असली पाहिजे हुकूमशाही नको, चारदोन लोक पक्ष चालवताहेत हे चित्र निर्माण झाले आहे. पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावे यासाठी प्रयत्न आहे.डीन आणि सिव्हील सर्जन यांच्यात बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने प्रशासनावरील पकड सैल झाली आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हस्तक्षेप करायला हवा.ज्यावेळी पहिला रुग्ण आढळला त्याचवेळी प्रशासनाने जागरुक व्हायला हवे होते. त्यावेळी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत. आपण ग्रीन झोनमध्ये आहोत. अशा भ्रमात हलगर्जीपणा झाला. अमळनेरच्या रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला.लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव असला पाहिजे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असेल तरच समस्येचा मुकाबला करता येईल. पालकमंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या पण ते स्वत: बैठकांपुरताच मर्यादीत राहिले.प्रशासनाने सक्रीय राहून आपुलकीने काम करण्याची गरज आहे.मृत्यू रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना ही राष्टÑीय आपत्ती समजून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाना मदत केली जावी. यासाठी शासनाने ५० लाखांचे वीमा संरक्षण दिले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव