शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

कोरोनाबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा -एकनाथराव खडसे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:48 IST

पालकमंत्री बैठकांपुरता मर्यादीत राहिले, प्रशासनावर हवा दबाव

मुक्ताईनगर : जिल्ह्याचे प्रशासन हे नेहमी मजबूत, सक्रीय आणि जागरुक असले पाहिजे, दुर्देवाने तसे झाले नाही. प्रशासनाला वेग नसल्याने आणि हलगर्जी झाल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली, अशी टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.रुग्णांचे अहवाल येण्यास चार - चार दिवस लागत असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे ते म्हणाले.शुक्रवारी मुक्ताईनगर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाला लक्ष्य केले.जिल्हा रुग्णालय शहरात आणावेकोविड रुग्णालय हे शहराबाहेर गोदावरी रुग्णालयात शिफ्ट करावे आणि जिल्हा रुग्णालय हे शहरात आणावे, म्हणजे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.सुरुवातील पीपीई किटची कमी होती. तपासणी करण्याची यंत्रणा नाही. एका रिपोर्टसाठी चार दिवस लागत आहे. धुळ्याला लॅब होऊ शकते मग आपल्याकडे का नाही? लॅब असती रुग्ण आटोक्यात असते.विधान परिषद निमित्ताने काही विषय निघाले आहेत. माझा संघर्ष हा व्यक्ती व पक्षाविरोधात तर मुळीच नाही. परंतु पक्षात लोकशाही असली पाहिजे हुकूमशाही नको, चारदोन लोक पक्ष चालवताहेत हे चित्र निर्माण झाले आहे. पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावे यासाठी प्रयत्न आहे.डीन आणि सिव्हील सर्जन यांच्यात बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने प्रशासनावरील पकड सैल झाली आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हस्तक्षेप करायला हवा.ज्यावेळी पहिला रुग्ण आढळला त्याचवेळी प्रशासनाने जागरुक व्हायला हवे होते. त्यावेळी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत. आपण ग्रीन झोनमध्ये आहोत. अशा भ्रमात हलगर्जीपणा झाला. अमळनेरच्या रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला.लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव असला पाहिजे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असेल तरच समस्येचा मुकाबला करता येईल. पालकमंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या पण ते स्वत: बैठकांपुरताच मर्यादीत राहिले.प्रशासनाने सक्रीय राहून आपुलकीने काम करण्याची गरज आहे.मृत्यू रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना ही राष्टÑीय आपत्ती समजून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाना मदत केली जावी. यासाठी शासनाने ५० लाखांचे वीमा संरक्षण दिले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव