शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कोरोनाबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा -एकनाथराव खडसे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:48 IST

पालकमंत्री बैठकांपुरता मर्यादीत राहिले, प्रशासनावर हवा दबाव

मुक्ताईनगर : जिल्ह्याचे प्रशासन हे नेहमी मजबूत, सक्रीय आणि जागरुक असले पाहिजे, दुर्देवाने तसे झाले नाही. प्रशासनाला वेग नसल्याने आणि हलगर्जी झाल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली, अशी टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.रुग्णांचे अहवाल येण्यास चार - चार दिवस लागत असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे ते म्हणाले.शुक्रवारी मुक्ताईनगर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाला लक्ष्य केले.जिल्हा रुग्णालय शहरात आणावेकोविड रुग्णालय हे शहराबाहेर गोदावरी रुग्णालयात शिफ्ट करावे आणि जिल्हा रुग्णालय हे शहरात आणावे, म्हणजे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.सुरुवातील पीपीई किटची कमी होती. तपासणी करण्याची यंत्रणा नाही. एका रिपोर्टसाठी चार दिवस लागत आहे. धुळ्याला लॅब होऊ शकते मग आपल्याकडे का नाही? लॅब असती रुग्ण आटोक्यात असते.विधान परिषद निमित्ताने काही विषय निघाले आहेत. माझा संघर्ष हा व्यक्ती व पक्षाविरोधात तर मुळीच नाही. परंतु पक्षात लोकशाही असली पाहिजे हुकूमशाही नको, चारदोन लोक पक्ष चालवताहेत हे चित्र निर्माण झाले आहे. पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावे यासाठी प्रयत्न आहे.डीन आणि सिव्हील सर्जन यांच्यात बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने प्रशासनावरील पकड सैल झाली आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हस्तक्षेप करायला हवा.ज्यावेळी पहिला रुग्ण आढळला त्याचवेळी प्रशासनाने जागरुक व्हायला हवे होते. त्यावेळी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत. आपण ग्रीन झोनमध्ये आहोत. अशा भ्रमात हलगर्जीपणा झाला. अमळनेरच्या रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला.लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव असला पाहिजे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असेल तरच समस्येचा मुकाबला करता येईल. पालकमंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या पण ते स्वत: बैठकांपुरताच मर्यादीत राहिले.प्रशासनाने सक्रीय राहून आपुलकीने काम करण्याची गरज आहे.मृत्यू रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना ही राष्टÑीय आपत्ती समजून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाना मदत केली जावी. यासाठी शासनाने ५० लाखांचे वीमा संरक्षण दिले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव