प्रशासनाचा कारभार बिबट्यांच्या जीवाशी

By Admin | Updated: July 1, 2014 14:45 IST2014-07-01T14:45:44+5:302014-07-01T14:45:44+5:30

वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत.

Administration of the administration of leopards | प्रशासनाचा कारभार बिबट्यांच्या जीवाशी

प्रशासनाचा कारभार बिबट्यांच्या जीवाशी

आता बिबटे बनले लक्ष्य
वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत. वाघांची संख्या कमी झाल्याने बिबट्याच्या कातडीला बाजारात चांगली मागणी आहे. शौकीन यासाठी मागेल ती किंमत मोजायला तयार असतात. जळगाव : जिल्ह्यातील बिबट्यांचा अधिवास प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात सापडला आहे. कातडीच्या तस्करीसाठी यांची शिकार होत असून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर वन विभागाने तातडीने संवर्धन मोहीम हाती घेतली पाहिजे, अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. 
या महिन्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे जिल्ह्यातील यावल अभयारण्य, यावल वनविभाग, मुक्ताईनगर वनविभाग आणि चोपडा वनक्षेत्रातील बिबट्यांचा अधिवास धोक्यात सापडला असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.
वन्यजीवांच्या संवर्धन आणि विकासाकरिता वन विभाग उदासिन असल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासनाचा नाकर्तेपणा मुक्या जीवांवर बेतत असून वरिष्ठ अधिकारीदेखील याची दखल घ्यायला तयार दिसत नाही. स्थानिक अधिकर्‍यांना वरिष्ठांचा धाक नसल्याने ते आपला मनमानी कारभार करीत आहेत. अशीच अवस्था कायम राहिल्यास जिल्ह्यातील वन्यजीवांचे अस्तित्व कायमचे नामशेष होईल. 
प्रशासनाने वेळोवेळी आपली भूमिका निभावण्याचे टाळल्याने यावल अभयारण्य आणि यावल वनविभागाची वाट लागली. तसेच व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील डोलारखेडा येथे मोठी वृक्षतोड झाली. या सर्व घडामोडी ताज्या असतानाच गुरुवारी चोपडा तालुक्यातील मेलाणे या गावात एका गुन्हेगारास बिबट्याच्या कातडीसह अटक केली. वन विभागाची उदासिन कारभाराचे हे उत्तम उदाहरण ठरेल. याअगोदर याच महिन्यात १२ जून रोजी यावल तालुक्यात एकला बिबट्याच्या कातडीसह पकडले होते.
वन आणि वन्यजीवांची अनास्था पर्यावरण विकास आणि संवर्धनाला हानीकारक आहे. अपवाद वगळता स्थानिक आदिवासी आणि राजकीय नेत्यांच्या रोष स्वत:वर ओढवून घेण्याची हिम्मत वन विभागाने दाखविलेली नाही. त्यामुळे आज बिबट्याचा अधिवास धोक्यात आला आहे. 
आजरोजी यावल अभयारण्य, यावल वनविभाग, मुक्ताईनगर वन विभाग आणि चोपडा वनक्षेत्रात जवळ-जवळ २५ ते ३0 बिबटे आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न न झाल्यास कातडी तस्करीच्या घटना घडत राहतील हे निश्‍चित.
 
या आहेत कमतरता
■ गस्त घालण्यात कामचुकारपणा 
■ सुस्त अधिकारी
■ अप्रशिक्षित कर्मचारी
 ■ कर्मचार्‍यांची रिक्त पदे
■ मागासलेले तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती
 
आता बिबटे बनले लक्ष्य
वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत. वाघांची संख्या कमी झाल्याने बिबट्याच्या कातडीला बाजारात चांगली मागणी आहे. शौकीन यासाठी मागेल ती किंमत मोजायला तयार असतात. 

 

Web Title: Administration of the administration of leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.