शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

खरचं, दप्तराचे ओझे कमी होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:11 IST

सागर दुबे जळगाव : केंद्र शासनाने नुकताच शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला़ पण या निर्णयाची ...

सागर दुबेजळगाव : केंद्र शासनाने नुकताच शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला़ पण या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणार का? असा सवाल आजही उपस्थित होत आहे़ अधिकाऱ्यांकडून शाळांना दप्तराच्या ओझे तपासणीसाठी भेटीच दिल्या जात नसून फक्त कागदावरच कमी ओझे दाखवले जाते़ त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करायचे असेल, तर शिक्षक, शिक्षणसंस्था आणि पालक या सर्वांच्याच मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे़दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना पाठीचा आजार लागतात़ त्यामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वीच राज्य शासनाकडून दप्तराच्या वजनासंदर्भात नियम लागू केले होते़ मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुध्दा यश आले नव्हते़ या काळातही अधिकाºयांकडून फक्त एकदाच शाळांना भेटी देऊन दप्तराचे ओझे तपासले होते़ आता केंद्रानेही दप्तर ओझे कमी करण्यासाठी नियमावली लागू केली आहे. दरम्यान, मुख्यत: हा निर्णय न मानण्यात प्रामुख्याने इंग्रजी आणि त्यानंतर मराठी शाळा आघाडीवर आहेत. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे अधिक असते तर अभ्यासाचा मानसिक ताण देखील त्यांना अधिक असतो़ त्यामुळे त्यांना हा निर्णय मानायला लावण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. ७० ते ८० टक्के शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना सर्व वह्या, पुस्तके आणायला लावतात, त्यामुळे दप्तराचे ओझे वाढते़ त्यांना आवश्यक तितक्याच वह्या आणायला लावल्या, तरच वजन कमी होईल. पहिली, दुसरीला दीड किलो तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तराचे वजन दोन ते तीन किलो सहावी ते सातवी चार आणि आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार किलो, दहावीला पाच किलोपेक्षा अधिक वजन नसावे, असे स्पष्ट केले निर्देश केंद्र शासनाने दिले आहे़ मात्र, या वजनांच्या दुपटीने विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे आज बघायला मिळत आहे़ अधिकाºयांच्या वेळकाढूपणामुळे या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे पुन्हा अपयश येण्याची शक्यता आहे़ निर्णय झाल्यापासून अद्याप शिक्षण विभागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची दप्तारांच्या ओझे तपासणीची कार्यवाही झालेली नाही़ या कार्यवाहीला कधी मुहूर्त मिळणार असा सवाल शिक्षणतज्ञांकडून उपस्थित केला जात आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव