शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खरचं, दप्तराचे ओझे कमी होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:11 IST

सागर दुबे जळगाव : केंद्र शासनाने नुकताच शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला़ पण या निर्णयाची ...

सागर दुबेजळगाव : केंद्र शासनाने नुकताच शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला़ पण या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणार का? असा सवाल आजही उपस्थित होत आहे़ अधिकाऱ्यांकडून शाळांना दप्तराच्या ओझे तपासणीसाठी भेटीच दिल्या जात नसून फक्त कागदावरच कमी ओझे दाखवले जाते़ त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करायचे असेल, तर शिक्षक, शिक्षणसंस्था आणि पालक या सर्वांच्याच मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे़दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना पाठीचा आजार लागतात़ त्यामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वीच राज्य शासनाकडून दप्तराच्या वजनासंदर्भात नियम लागू केले होते़ मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुध्दा यश आले नव्हते़ या काळातही अधिकाºयांकडून फक्त एकदाच शाळांना भेटी देऊन दप्तराचे ओझे तपासले होते़ आता केंद्रानेही दप्तर ओझे कमी करण्यासाठी नियमावली लागू केली आहे. दरम्यान, मुख्यत: हा निर्णय न मानण्यात प्रामुख्याने इंग्रजी आणि त्यानंतर मराठी शाळा आघाडीवर आहेत. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे अधिक असते तर अभ्यासाचा मानसिक ताण देखील त्यांना अधिक असतो़ त्यामुळे त्यांना हा निर्णय मानायला लावण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. ७० ते ८० टक्के शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना सर्व वह्या, पुस्तके आणायला लावतात, त्यामुळे दप्तराचे ओझे वाढते़ त्यांना आवश्यक तितक्याच वह्या आणायला लावल्या, तरच वजन कमी होईल. पहिली, दुसरीला दीड किलो तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तराचे वजन दोन ते तीन किलो सहावी ते सातवी चार आणि आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार किलो, दहावीला पाच किलोपेक्षा अधिक वजन नसावे, असे स्पष्ट केले निर्देश केंद्र शासनाने दिले आहे़ मात्र, या वजनांच्या दुपटीने विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे आज बघायला मिळत आहे़ अधिकाºयांच्या वेळकाढूपणामुळे या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे पुन्हा अपयश येण्याची शक्यता आहे़ निर्णय झाल्यापासून अद्याप शिक्षण विभागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची दप्तारांच्या ओझे तपासणीची कार्यवाही झालेली नाही़ या कार्यवाहीला कधी मुहूर्त मिळणार असा सवाल शिक्षणतज्ञांकडून उपस्थित केला जात आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव