शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

संतांचे संगती मनोमार्ग गती... अकळावा श्रीपती येणे पंथे...., नशिराबादचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:52 IST

भाव- भक्ती रमले भाविक, अबालवृध्दांचाही सहभाग, अध्यात्माची ३२ वर्षे अखंड तेवणारी ज्योत

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद : सामाजिक व धार्मिक एकात्मतेचे दर्शन व सहिष्णुतेचे प्रतीक असलेल्या नशिराबाद येथील अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळाला ३२ वर्षांची अखंड परंपरा असून नशिराबादसह पंचक्रोशीतील भाविक या महोत्सवात तल्लीन होऊन भक्तीचा आनंद घेतात. शेकडो महिला पुरुष व पारायण वाचन करीत आहे. या उत्सवाला ग्रामोत्सव किंवा लोकमहोत्सव म्हणून संबोधले जाते.नशिराबादला पूर्वी वाड्यावाड्यात भागवत कथा सप्ताहाचे आयोजन होत होते. एक गाव एक कथा सप्ताह व्हावा, या उद्देशाने वैकुंठवासी सुरेश महाराज यांच्या पुढाकाराने तत्कालीन सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवत गाव सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली. सन १९८१मध्ये या उत्सवाची सुरुवात झाली. विठ्ठल मंदिरात वैकुंठवासी सुरेश महाराज यांनी प्रथम या महोत्सवाला सुरुवात केली.गावात गीतेचा प्रचार व प्रसाराचे धर्म जागृतीचे कार्य त्यांनी केले. अध्यात्माची गोडी वृद्धिंगत झाल्याने नशिराबादला हजार महिलांच्या मुखी भगवद्गीता तोंडीपाठ झाली. पारायण सोहळाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता आठवडा बाजाराच्या प्रांगणात पारायण सोहळा महोत्सव सन १९८७पासून बहरला. त्या दिवसापासून ही गौरवशाली परंपरा आजतागायत सुरू आहे, अशी माहिती ज्येष्ठ वारकरी मिठाराम पाटील व सामाजिक कार्यकर्ते गणपत सोमा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सामूहिक पारायण वाचनाची मुहूर्तमेढ सुरेश महाराजांनी केली. त्यांना भरत महाराज यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची साथ मिळाल्याने महोत्सवाची रंगत वर्षागणिक वाढत गेली व पंचक्रोशीतील भाविक यात तल्लीन होऊ लागले. विद्यार्थ्यांना धार्मिकतेची ओढ लागावी व संस्कृतीची जपणूक व्हावी, यासाठी भगवद्गीता विविध सूक्तचे पठाणाची उपक्रम स्पर्धा घेण्यात येते. गतवर्षी सामाजिक कार्यकर्ते गणपत सोमा पाटील यांनी या महोत्सवाचा संपूर्ण खर्च करून एक नवा आदर्श पायंडा निर्माण केला.महिलांची लक्षणीय उपस्थितीपारायण वाचनाला महिलांची लक्षणीय उपस्थिती असते. बोचºया व अंगाला झोंबणारा वाढत्या थंडीतही महिला-पुरुष भाविक उत्साहात उपस्थित राहून पहाटेला काकडआरती, पारायण वाचन व रात्री कीर्तन श्रवणाचा लाभ घेत आहेत. यंदा प्रभाकर महाराज पारायण वाचनाचे नेतृत्व करीत आहे.पन्नास ते साठ क्विंटलचा महाभंडाराउत्सवाच्या सांगतेनिमित्त सुमारे पन्नास ते साठ पोते गव्हाच्या पोळ्या, शेकडो क्विंटल वांगीची भाजी, तीन क्चिंटल वरण अशा भंडाºयाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्यासाठी ग्रामस्थ व भाविक स्वत:हून धान्य वस्तू व रोख स्वरूपात देणगी देऊन महाभंडारासाठी हातभार लावतात. आठ दिवसाच्या महोत्सवाला दैनंदिन नाश्ता, जेवण, चहा आदी कार्याची सुविधा देण्यासाठी भाविकांची मोठी चढाओढ लागलेली असते.स्वयंपाकींना नारळ टोपी चा मानस्वयंपाकासाठी गावातील सुमारे ४५ ते ५० स्वयंपाकी स्वत:हून उपस्थित राहून सहकार्य करतात. या स्वयंपाकींना नारळ टोपीचा मान देऊन सन्मानित करण्यात येते, अशी माहिती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी दिली. उत्सवात पंक्ती वाढण्यासाठी गावातील गणेश, दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी होऊन कार्य करीत असतात.शोभायात्रेचे आकर्षणउत्सवाच्या संगती निमित्त गावातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात येते. त्यात सर्वधर्मीय भाविक सहभागी होऊन उत्सवाला एकात्मतेचा रंग भरतात. नोकरी शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेलेले नशिराबाद येथील नागरिक, तरुण, माहेरवाशीण महिला या उत्सवाकरिता येतात आणि उत्सवात हिरीरिने सहभाग घेतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव