शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

चाळीसगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

चाळीसगाव : गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने तासभर हजेरी लावल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. सद्य:स्थितीत हंगामासाठी पूर्व ...

चाळीसगाव : गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने तासभर हजेरी लावल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. सद्य:स्थितीत हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही भागांत मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली जात आहे. कृषी विभागाने या वर्षी ९० हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षी कपाशीचा पेरा वाढणार असून मक्याची लागवड १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल.

खरिपाच्या लागवडीसाठी शेती-शिवार सज्ज झाले असून मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या वर्षीही खरिपाच्या लागवडीत कपाशीचाच वरचश्मा राहणार असून मका लागवडीचे क्षेत्र १० ते १५ टक्क्यांनी घटणार आहे. २ लाख ८७ हजार ८५० कपाशी बियाणे पाकिटांचा पेरा केला जाणार आहे. या वर्षी रासायनिक खतांचा १० टक्के कमी पुरवठा होणार असल्याने टंचाई जाणवणार आहे.

गतवर्षीच्या खरिपात मका लागवडीचे क्षेत्र वधारले असले तरी ते कपाशीच्या तुलनेत कमीच होते. यंदाही मका लागवडीचे क्षेत्र आणखी घटणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. कोरडवाहू व बागायती कपाशीचे क्षेत्र मात्र वाढणार आहे. या वर्षीही बळीराजाची दारोमदार पांढऱ्या सोन्यावरच राहणार आहे.

९० हजार हेक्टरवर बहरणार खरिपाचा हंगाम

चाळीसगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख २१ हजार ९०४ हेक्टर इतके आहे. यापैकी ९० हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होणे अपेक्षित आहे.

१....मका लागवडीचे क्षेत्र घटणार असले तरी काही प्रमाणात भुईमूग, सोयाबीन पेऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

कांदा लागवडही कमी होण्याची शक्यता आहे.

काळ्या बाजारावर राहणार नजर,

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

बियाणे, खते आणि कीटकनाशके यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाची काळ्या बाजारावर करडी नजर राहणार आहे. यासाठी पंचायत समितीमध्ये तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवू शकतात. भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

चौकट

खतांची टंचाई जाणवणार, १० टक्के कमी पुरवठा

अनुदानित रासायनिक खतांचा १० टक्के कमी वापर या धोरणानुसार जिल्हास्तरावरून रासायनिक खतांच्या पुरवठ्याचे नियोजन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच खत टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

• एकूण २८ हजार ३८४ मेट्रिक टन खताची गरज यंदाच्या खरीप हंगामासाठी निर्धारित केली आहे.

.......

महत्त्वाची चौकट

गेल्या वर्षीची बनावट खतांची कारवाई गुलदस्त्यात

बनावट खते, बियाणे व कीटकनाशके देऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसगत केली जाते. हे दरवर्षीचे रडगाणे आहे. गेल्या वर्षी लाखो रुपये किमतीचा बनावट खतांचा साठा चाळीसगावी हस्तगत केला गेला. मात्र त्याबाबत काय कारवाई झाली, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच कोरोनाकाळात अगोदरच पिचलेल्या शेतकऱ्यांना बनावट खतांद्वारे लुबाडणूक होण्याची भीती वाटत आहे. कृषी विभागाने अलर्ट राहावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

..........

कृषी विभागाने पीकनिहाय पेऱ्याचे केलेले नियोजन (क्षेत्र : हेक्टरमध्ये)

कपाशी बागायती - २७ हजार २११

कपाशी कोरडवाहू - ३४ हजार ४३७

ज्वारी - १२५८

इतर पिके - ३५५१

उडीद - ९३२

तूर - ५२८

भुईमूग - ८२५

सोयाबीन - १५०

फळबाग - ३००

बाजरी - ३५५१

===Photopath===

290521\29jal_1_29052021_12.jpg

===Caption===

टाकळी प्र.दे - पिलखोड शिवारात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करताना. (छाया : अमोल सोनार)