शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चाळीसगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

चाळीसगाव : गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने तासभर हजेरी लावल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. सद्य:स्थितीत हंगामासाठी पूर्व ...

चाळीसगाव : गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने तासभर हजेरी लावल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. सद्य:स्थितीत हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही भागांत मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली जात आहे. कृषी विभागाने या वर्षी ९० हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षी कपाशीचा पेरा वाढणार असून मक्याची लागवड १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल.

खरिपाच्या लागवडीसाठी शेती-शिवार सज्ज झाले असून मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या वर्षीही खरिपाच्या लागवडीत कपाशीचाच वरचश्मा राहणार असून मका लागवडीचे क्षेत्र १० ते १५ टक्क्यांनी घटणार आहे. २ लाख ८७ हजार ८५० कपाशी बियाणे पाकिटांचा पेरा केला जाणार आहे. या वर्षी रासायनिक खतांचा १० टक्के कमी पुरवठा होणार असल्याने टंचाई जाणवणार आहे.

गतवर्षीच्या खरिपात मका लागवडीचे क्षेत्र वधारले असले तरी ते कपाशीच्या तुलनेत कमीच होते. यंदाही मका लागवडीचे क्षेत्र आणखी घटणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. कोरडवाहू व बागायती कपाशीचे क्षेत्र मात्र वाढणार आहे. या वर्षीही बळीराजाची दारोमदार पांढऱ्या सोन्यावरच राहणार आहे.

९० हजार हेक्टरवर बहरणार खरिपाचा हंगाम

चाळीसगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख २१ हजार ९०४ हेक्टर इतके आहे. यापैकी ९० हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होणे अपेक्षित आहे.

१....मका लागवडीचे क्षेत्र घटणार असले तरी काही प्रमाणात भुईमूग, सोयाबीन पेऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

कांदा लागवडही कमी होण्याची शक्यता आहे.

काळ्या बाजारावर राहणार नजर,

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

बियाणे, खते आणि कीटकनाशके यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाची काळ्या बाजारावर करडी नजर राहणार आहे. यासाठी पंचायत समितीमध्ये तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवू शकतात. भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

चौकट

खतांची टंचाई जाणवणार, १० टक्के कमी पुरवठा

अनुदानित रासायनिक खतांचा १० टक्के कमी वापर या धोरणानुसार जिल्हास्तरावरून रासायनिक खतांच्या पुरवठ्याचे नियोजन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच खत टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

• एकूण २८ हजार ३८४ मेट्रिक टन खताची गरज यंदाच्या खरीप हंगामासाठी निर्धारित केली आहे.

.......

महत्त्वाची चौकट

गेल्या वर्षीची बनावट खतांची कारवाई गुलदस्त्यात

बनावट खते, बियाणे व कीटकनाशके देऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसगत केली जाते. हे दरवर्षीचे रडगाणे आहे. गेल्या वर्षी लाखो रुपये किमतीचा बनावट खतांचा साठा चाळीसगावी हस्तगत केला गेला. मात्र त्याबाबत काय कारवाई झाली, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच कोरोनाकाळात अगोदरच पिचलेल्या शेतकऱ्यांना बनावट खतांद्वारे लुबाडणूक होण्याची भीती वाटत आहे. कृषी विभागाने अलर्ट राहावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

..........

कृषी विभागाने पीकनिहाय पेऱ्याचे केलेले नियोजन (क्षेत्र : हेक्टरमध्ये)

कपाशी बागायती - २७ हजार २११

कपाशी कोरडवाहू - ३४ हजार ४३७

ज्वारी - १२५८

इतर पिके - ३५५१

उडीद - ९३२

तूर - ५२८

भुईमूग - ८२५

सोयाबीन - १५०

फळबाग - ३००

बाजरी - ३५५१

===Photopath===

290521\29jal_1_29052021_12.jpg

===Caption===

टाकळी प्र.दे - पिलखोड शिवारात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करताना. (छाया : अमोल सोनार)