शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

अबब...! कांद्याची पात, लांब दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 19:33 IST

गिरणा काठाने बहाळ सोडले म्हणजे जामदा रस्त्यावर एका कांद्याच्या शेतावर नजर जाताच शेतीतील आवड असणारा हमखास थांबत कांद्याची पात व पोसलेला कांदा पाहून तोंडात बोटं घालतो. ती शेती असते कापूस, केळी व कांदा असा तीन ‘क’चा वेड लागलेल्या जामदा येथील शेतीनिष्ट शेतकरी योगेंद्र धनसिंग पाटील यांची.

ठळक मुद्देजामदा येथील शेतकऱ्याचे धाडसदुष्काळात उपटली ‘केळी’पिकवला भरघोस ‘कांदा’

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : गिरणा काठाने बहाळ सोडले म्हणजे जामदा रस्त्यावर एका कांद्याच्या शेतावर नजर जाताच शेतीतील आवड असणारा हमखास थांबत कांद्याची पात व पोसलेला कांदा पाहून तोंडात बोटं घालतो. ती शेती असते कापूस, केळी व कांदा असा तीन ‘क’चा वेड लागलेल्या जामदा येथील शेतीनिष्ट शेतकरी योगेंद्र धनसिंग पाटील यांची.दुष्काळाने केला वांदा, लावला कांदाखरे तर योगेंद्र पाटील यांनी पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या ३० एकरावरील क्षेत्रात केळी लागवडीचे नियोजन केले होते. पाच लाखात तब्बल २० हजार केळीची रोपेही बूक केली होती. मात्र पावसाने दगा दिला. दुष्काळ पडला. १२ हजार रोपे फेकून द्यावी लागली आणि योगेंद्र पाटील यांनी आपला अनुभव लक्षात घेत नियोजन बदलवत कमी दिवसात, कमी पाण्यात येणाऱ्या कांद्याचे नियोजन केले.अन् वेहेळगावचे कांदा रोप संपविलेकांदा लागवडीसाठी रोपे तयार करण्यात दीड-दोन महिना घालविण्यापेक्षा त्यांनी आयते तयार रोप घेण्यासाठी नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव गाठले. तिकडेही दुष्काळामुळे लागवडीविना पडून असलेले रोप त्यांना मिळाले. ७५ हजारात झाडून साºया वेहेळगावातील रोपे आणली. नोव्हेंबर महिन्यात पाच एकरावर उन्हाळी कांदा लावला. खते, पाणी निगा राखली. तणनाशक वापरुन निंदणीचा खर्च वाचविला.गिरणा काठची कसदार जमीन, गिरणामाईचे अमृतावाणी पाणी, कांदा पीक असे पोसले की रस्त्याने जाणाºया-येणारी पावले शेतावर थांबू लागली. हिरवीगार दीड-दोन हात लांब पात, पावशेरापर्यत पोसलेला दगडी वजनाचा कांदा. अक्षरश: वाढलेली पात वाºयामुळे जमिनीवर लोळण घेत आहे. एकरी अडीचशे क्विंटलच्या वर उत्पादन येण्याची खात्री शेतकºयाला आहे.शेतीतील तीन ‘क’चा लळाकुणी चांगली म्हणावी, अशी नव्हे तर फायद्याची शेती कशी ठरेल यात आपण प्राधान्याने लक्ष घालत असल्याचे शेतकरी योगेंद्र पाटील सांगतात. केळी, कापूस व कांदा असा तीन ‘क’चा आपणास लळा लागला असून, दुसरे पीक घेत नसल्याचे ते अभिमानाने सांगतात.