शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

अबब...! कांद्याची पात, लांब दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 19:33 IST

गिरणा काठाने बहाळ सोडले म्हणजे जामदा रस्त्यावर एका कांद्याच्या शेतावर नजर जाताच शेतीतील आवड असणारा हमखास थांबत कांद्याची पात व पोसलेला कांदा पाहून तोंडात बोटं घालतो. ती शेती असते कापूस, केळी व कांदा असा तीन ‘क’चा वेड लागलेल्या जामदा येथील शेतीनिष्ट शेतकरी योगेंद्र धनसिंग पाटील यांची.

ठळक मुद्देजामदा येथील शेतकऱ्याचे धाडसदुष्काळात उपटली ‘केळी’पिकवला भरघोस ‘कांदा’

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : गिरणा काठाने बहाळ सोडले म्हणजे जामदा रस्त्यावर एका कांद्याच्या शेतावर नजर जाताच शेतीतील आवड असणारा हमखास थांबत कांद्याची पात व पोसलेला कांदा पाहून तोंडात बोटं घालतो. ती शेती असते कापूस, केळी व कांदा असा तीन ‘क’चा वेड लागलेल्या जामदा येथील शेतीनिष्ट शेतकरी योगेंद्र धनसिंग पाटील यांची.दुष्काळाने केला वांदा, लावला कांदाखरे तर योगेंद्र पाटील यांनी पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या ३० एकरावरील क्षेत्रात केळी लागवडीचे नियोजन केले होते. पाच लाखात तब्बल २० हजार केळीची रोपेही बूक केली होती. मात्र पावसाने दगा दिला. दुष्काळ पडला. १२ हजार रोपे फेकून द्यावी लागली आणि योगेंद्र पाटील यांनी आपला अनुभव लक्षात घेत नियोजन बदलवत कमी दिवसात, कमी पाण्यात येणाऱ्या कांद्याचे नियोजन केले.अन् वेहेळगावचे कांदा रोप संपविलेकांदा लागवडीसाठी रोपे तयार करण्यात दीड-दोन महिना घालविण्यापेक्षा त्यांनी आयते तयार रोप घेण्यासाठी नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव गाठले. तिकडेही दुष्काळामुळे लागवडीविना पडून असलेले रोप त्यांना मिळाले. ७५ हजारात झाडून साºया वेहेळगावातील रोपे आणली. नोव्हेंबर महिन्यात पाच एकरावर उन्हाळी कांदा लावला. खते, पाणी निगा राखली. तणनाशक वापरुन निंदणीचा खर्च वाचविला.गिरणा काठची कसदार जमीन, गिरणामाईचे अमृतावाणी पाणी, कांदा पीक असे पोसले की रस्त्याने जाणाºया-येणारी पावले शेतावर थांबू लागली. हिरवीगार दीड-दोन हात लांब पात, पावशेरापर्यत पोसलेला दगडी वजनाचा कांदा. अक्षरश: वाढलेली पात वाºयामुळे जमिनीवर लोळण घेत आहे. एकरी अडीचशे क्विंटलच्या वर उत्पादन येण्याची खात्री शेतकºयाला आहे.शेतीतील तीन ‘क’चा लळाकुणी चांगली म्हणावी, अशी नव्हे तर फायद्याची शेती कशी ठरेल यात आपण प्राधान्याने लक्ष घालत असल्याचे शेतकरी योगेंद्र पाटील सांगतात. केळी, कापूस व कांदा असा तीन ‘क’चा आपणास लळा लागला असून, दुसरे पीक घेत नसल्याचे ते अभिमानाने सांगतात.