शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तीन साखर कारखान्यांच्या कर्जाची शासनाकडे ४४ कोटीची थकहमी; सहकार मंत्र्यांनी बोलावली बैठक

By सुनील पाटील | Updated: January 25, 2024 17:32 IST

सहकार मंत्र्यांनी बोलावली बैठक, शून्य टक्के व्याजदराच्या वसुलीचाही प्रस्ताव.

सुनील पाटील, जळगाव : कर्जोद,ता.रावेर सहकारी साखर कारखाना, बेलगंगा व संत मुक्ताबाई या तीन साखर कारखान्यांना राज्य शासनाने दिलेल्या थकहमीची ४३ कोटी ७७ लाख रुपये जिल्हा बँकेचे शासनाकडे घेणे आहे. जिल्ह्यातील विकासोंच्या अनिष्ठ तफावतीची ६०० कोटीची रक्कम मिळणे व जिल्हा परिषदेच्या ७०० कोटीच्या ठेवी जिल्हा बँकेत ठेवणे यासंदर्भात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी २७ जानेवारी रोजी नाशिक येथे बैठक बोलावली आहे.

जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांना जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा केलेला आहे. राज्य शासनाने या कर्जाची हमी घेतली आहे. आता तीनही कारखान्यांची विक्री झालेली आहे. रावेर सहकारी साखर कारखान्याकडे २७ कोटी ३ लाख, भोरस, ता.चाळीसगाव येथील बेलगंगा साखर कारखान्याकडे ७ कोटी ४६ लाख व संत मुक्ताबाई, घोडसगाव, ता.मुक्ताईनगर या कारखान्याकडे ९ कोटी २७ लाख रुपये जिल्हा बँकेचे घेणे आहे. या कारखान्यांची हमी शासनाने घेतलेली असल्याने शासनाला देणी लागते. जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ही रक्कम मिळणे आवश्यक असल्याने जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बँकेच्या स्थितीबाबत चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंती केली. पवार यांनी लगेच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना यात मार्ग काढण्यासाठी अधिकारी व बँकेच्या संचालकांची बैठक घेण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार वळसे पाटील यांनी २७ जानेवारी रोजी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर दुपारी दोन वाजता बैठक आयोजित केली. सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सहकार आयुक्त, उपसचिव, साखर संचालक, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह जिल्हा बँकेचे सर्व संचालक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावSugar factoryसाखर कारखाने