शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शहिदांच्या कुटुंबीयांना जळगावातून मदतीचा हात, आर्या फाऊंडेशनचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:38 IST

देशाच्या संरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे.

- विजयकुमार सैतवालजळगाव : देशाच्या संरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात असून, दीड वर्षात राज्यातील ठिकठिकाणच्या १० शहिदांच्या कुटुंबीयांना आर्या फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली आहे. यात आता ७ आॅगस्ट रोजी काश्मिरात शहीद झालेल्या कौस्तुभ प्रकाशकुमार राणे या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना ६५ हजारांचा धनादेश देण्यात येणार आहे.देशवासीय सुरक्षित राहावे म्हणून भारतीय सैनिक देशाच्या वेगवेगळ्या भागातील सीमांवर रात्रं-दिवस जीवाची बाजी लावून पहारा देत असतात. यात त्यांना वीरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फाऊंडेशन ही संस्था सरसावली असून, शहीद कुटुंबीयांना मदत म्हणून ६५ हजार रुपयांची मदत करीत आहे.राणे कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न७ आॅगस्ट रोजी पहाटे उत्तर काश्मीमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मीरा रोड (ठाणे) येथील रहिवासी असलेले कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आर्या फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्या वेळी दीडच दिवसात ६५ हजार रुपये जमा झाले व त्याचा धनादेश तयार करून डॉ. पाटील यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यानुसार हे पदाधिकारी शहिद कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करणार आहेत.यांना केली मदतसंदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, जि. नाशिक), विकास कुळमुथे (नेरळ, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती), चंद्रकांत गलंडे (जाशी, ता. माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव, ता. मिरज), सुमेध वामन गवई (लोणाग्रा, जि. अकोला), रवींद्र धनावडे (मोहटमेळा, जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार (म्हसरुळ, जि. नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाणे, जि. धुळे), कौस्तूभ राणे (मिरा रोड, ठाणे) या शहिदांच्या कुटुंबीयांना फाउंडेशनच्यावतीने मदत करण्यात आली आहे.राज्याच्या काना-कोप-यात पोहोचली मदतगेल्या दीड वर्षांपासून फाउंडेशनच्यावतीने ही मदत केली जात असून आता पर्यंत राज्यातील नाशिक, अमरावती, यवतमाळ, अकोला, नंदुरबार, शिंदखेडा इत्यादी ठिकाणच्या शहीद कुटुंबीयांच्या मदत करण्यात आली आहे.आवाहनाला दात्यांचा प्रतिसादकोणत्याही भागात जवान शहीद झाल्यानंतर ही भर कधीही निघू शकत नाही, मात्र शहिदांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील हे शहीद जवानाचे छायाचित्र व मदतीविषयीचा संदेश सोशल मीडियावर पाठवितात. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत दाते सढळ हाताने मदत करीत असल्याचा सुखद अनुभव फाऊंडेशनला येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. स्वखर्चाने पोहोचतात पदाधिकारी राज्यात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मदतीसाठी जावे लागले त्या ठिकाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी हे स्वखर्चाने पोहोचतात, हे विशेष.देशासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने आपण ही मदत देत असतो.- डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव