शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

शहिदांच्या कुटुंबीयांना जळगावातून मदतीचा हात, आर्या फाऊंडेशनचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:38 IST

देशाच्या संरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे.

- विजयकुमार सैतवालजळगाव : देशाच्या संरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात असून, दीड वर्षात राज्यातील ठिकठिकाणच्या १० शहिदांच्या कुटुंबीयांना आर्या फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली आहे. यात आता ७ आॅगस्ट रोजी काश्मिरात शहीद झालेल्या कौस्तुभ प्रकाशकुमार राणे या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना ६५ हजारांचा धनादेश देण्यात येणार आहे.देशवासीय सुरक्षित राहावे म्हणून भारतीय सैनिक देशाच्या वेगवेगळ्या भागातील सीमांवर रात्रं-दिवस जीवाची बाजी लावून पहारा देत असतात. यात त्यांना वीरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फाऊंडेशन ही संस्था सरसावली असून, शहीद कुटुंबीयांना मदत म्हणून ६५ हजार रुपयांची मदत करीत आहे.राणे कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न७ आॅगस्ट रोजी पहाटे उत्तर काश्मीमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मीरा रोड (ठाणे) येथील रहिवासी असलेले कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आर्या फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्या वेळी दीडच दिवसात ६५ हजार रुपये जमा झाले व त्याचा धनादेश तयार करून डॉ. पाटील यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यानुसार हे पदाधिकारी शहिद कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करणार आहेत.यांना केली मदतसंदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, जि. नाशिक), विकास कुळमुथे (नेरळ, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती), चंद्रकांत गलंडे (जाशी, ता. माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव, ता. मिरज), सुमेध वामन गवई (लोणाग्रा, जि. अकोला), रवींद्र धनावडे (मोहटमेळा, जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार (म्हसरुळ, जि. नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाणे, जि. धुळे), कौस्तूभ राणे (मिरा रोड, ठाणे) या शहिदांच्या कुटुंबीयांना फाउंडेशनच्यावतीने मदत करण्यात आली आहे.राज्याच्या काना-कोप-यात पोहोचली मदतगेल्या दीड वर्षांपासून फाउंडेशनच्यावतीने ही मदत केली जात असून आता पर्यंत राज्यातील नाशिक, अमरावती, यवतमाळ, अकोला, नंदुरबार, शिंदखेडा इत्यादी ठिकाणच्या शहीद कुटुंबीयांच्या मदत करण्यात आली आहे.आवाहनाला दात्यांचा प्रतिसादकोणत्याही भागात जवान शहीद झाल्यानंतर ही भर कधीही निघू शकत नाही, मात्र शहिदांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील हे शहीद जवानाचे छायाचित्र व मदतीविषयीचा संदेश सोशल मीडियावर पाठवितात. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत दाते सढळ हाताने मदत करीत असल्याचा सुखद अनुभव फाऊंडेशनला येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. स्वखर्चाने पोहोचतात पदाधिकारी राज्यात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मदतीसाठी जावे लागले त्या ठिकाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी हे स्वखर्चाने पोहोचतात, हे विशेष.देशासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने आपण ही मदत देत असतो.- डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव