शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

लोकअदालतमधील तडजोडीने फुलला पुन्हा संसार; ३५०५ प्रकरणे निकाली

By विजय.सैतवाल | Updated: March 3, 2024 23:38 IST

विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने रविवार, ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.  

जळगाव : प्रेम विवाह होऊन काही दिवस एकत्र राहिलेल्या दाम्पत्यात मतभेद झाले आणि दोघांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये घटस्फोटासाठी अर्जही दाखल झाले. त्यात रविवार, ३ मार्च रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हे प्रकरण ठेवण्यात आले होते. मात्र लोकअदालतमध्ये दोघांचेही समुपेदशन करण्यात आले आणि दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने रविवार, ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण अधिनियमानुसार दाखल प्रकरणातील पती-पत्नी हे पॅनल प्रमुख न्या. एन. जी. देशपांडे यांच्या समोर आले. २१ एप्रिल २०२२रोजी या पती-पत्नीचा प्रेम विवाह झाला. नंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागल्यामुळे त्यांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला. 

रविवारी हे दोघे पती-पत्नी राष्ट्रीय लोक न्यायालयात हजर झाले त्यावेळी न्या. एन. जी. देशपांडे यांनी सदर दांपत्यांना वैवाहिक जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले व मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्याचे पती-पत्नीने ठरविले व सदर प्रकरण आपसात मिटले. तसेच या दाम्पत्यांनी एकमेकाच्या संमतीने दाखल केलेले घटस्फोटाचे प्रकरणही काढून घेत घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला.   प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एमक्यूएसएम शेख यांचे लोकअदालतसाठी मार्गदर्शन लाभले. न्या. एस. एन. राजूरकर, न्या. बी.एस. वावरे, न्या. एस.आर. पवार, न्या. न्या. जे.जे मोहिते, न्या. पी.पी. नायगावकर, न्या. एन.जी. देशपांडे, न्या. आय.वाय. खंडारे, न्या. आर.आय. सोनवणे, न्या. वसीम देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस.पी. सय्यद, जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रमाकांत पाटील, उपाध्यक्ष ॲड. अनिल पाटील, सचिव ॲड. कल्याण पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे अधीक्षक सुभाष पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

३५०७ प्रकरणे निकालीलोकअदालतमध्ये दाखलपूर्व २६४५ व प्रलंबित ८६२ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यामाध्यमातून १६५ कोटी ६० लाख ३६ हजार ३०१ रुपये वसूल करण्यात आले. तसेच या पूर्वी घेण्यात आलेल्या विशेष ड्राईव्हमध्ये ७०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अर्जदारातर्फे ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. श्रेयस चौधरी, ॲड. हेमंत जाधव, ॲड. सुनील चव्हाण यांनी काम पाहिले.

तीन महिन्यांच्या बाळाच्या अपघाताचा दावा निकालीतीन महिन्यांच्या बाळाच्या अपघातीमृत्यू संदर्भात मोटार अपघात दावा प्रधिकरणाकडे अपघाती नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल होता. लोकअदालतमध्ये याप्रकरणी चर्चेअंती तीन लाख ५० हजार रुपयांमध्ये दावा निकाली काढण्याचे ठरवण्यात आले.  अर्जदारातर्फे ॲड.महेंद्र चौधरी, ॲड. श्रेयस चौधरी, ॲड. हेमंत जाधव, ॲड. सुनील चव्हाण यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव